शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

Kolhapur- जोतिबा डोंगर विकासाचं 'चांगभलं: सुंदर जोतिबा प्रकल्प फक्त नावालाच

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 18, 2025 19:39 IST

आजवरचे दोन आराखडे अपूर्ण, ३० वर्षानंतरही बाधितांना मिळेना न्याय

वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील श्री जोतिबा देवस्थानच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाने १७०० कोटींचा आराखडा तयार केला असून त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जोतिबा प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केली आहे. जोतिबा, पन्हाळ्याचा विकास व्हावा याला कुणाचाच विरोध नाही. मात्र आजवर झालेले विकासाचे प्रयत्न पाहता लोकांच्या मनात अनेक प्रश्न व भीती आहे. त्याचा वेध घेणारी वृत्तमालिका...

इंदुमती गणेशकोल्हापूर : जोतिबा डोंगराचा कायापालट करण्यासाठी आजवर राबविलेले दोन्ही आराखडे दोन्ही प्रकल्प अपूर्ण आहेत. गुंडाळलेल्या सुंदर जोतिबा प्रकल्पातील सेंट्रल प्लाझा, व्यापारी संकुलचे खंडर झाले आहे. सुंदरतेची माहिती नाही पण बेकायदेशीर टपऱ्या, कमालीचा कचरा, फेरीवाले यामुळे परिसराचे विद्रुपीकरण नक्की झाले आहे. बाधितांची नावे अजूनही सातबारावर लागलेली नाहीत. देवस्थानच्या प्रकल्पातील दर्शन मंडप आणि दोन स्वच्छतागृहे पाच वर्षानंतरही अपूर्ण आहेत.

जोतिबा मंदिर परिसराचा विकास व्हावा ही सगळ्यांची भावना आहे. पण एकदा प्रकल्प हाती घेतला की तो तडीस नेणे, नागरिकांचे समाधानी पुनर्वसन करणे गरजेचे असते. परंतु प्रत्यक्षातील अनुभव तसा नाही. लोकानुनयी घोषणा मोठ्याने होतात, त्यासाठी पुढे पुरेसा निधी होत नाही. आराखड्यांचे सादरीकरण चकचकीत कागदावर होते परंतु प्रत्यक्ष कृतीत त्यातील काही उतरत नाही असाच अनुभव यापूर्वीचा आहे. त्यात प्राधिकरण वगैरे मोठे शब्द वापरले की लोकांच्या मनात धडकीच भरते.

ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळी सन १९९०-९१ ला लोकसहभागातून सुंदर जोतिबा प्रकल्प राबवला गेला. या अंर्तगत रस्ते मोठे करून प्रवेशद्वारासमोर सेंट्रल प्लाझा बांधला गेला. सेंट्रल प्लाझाचा बगिचा राहिला दूरच कचरा काेंडाळा जास्त झाला आहे. कचरा, बेकायदेशीर टपऱ्या, हातगाड्या, फेरीवाले, किरकोळ विक्रेते यांनीच परिसर भरला आहे.सेंट्रल प्लाझा येथील २८ विस्थापित व्यावसायिकांना त्या शेजारच्या मोकळ्या जागेत दुकानगाळे बांधून दिले गेले. पण ते मुख्य मंदिरापासून बाजूला असल्याने व्यवसाय बंद पडले. मालकांवर वणवण करण्याची वेळ आली. बंद दुकानगाळ्यांमध्ये अवैध धंदे चालू लागले. आता इमारतींचे खंडर, गंजलेले, फुटलेले पत्र्याचे दरवाजे, हातभर वाढलेले गवत अशी स्थिती आहे.

देवस्थानचा ५० कोटींचा आराखडा अपूर्णदेवस्थान समितीने दहा वर्षापूर्वी तयार केलेल्या जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी शासनाने ५० कोटी मंजूर केले. त्यापैकी २५ कोटी रुपये आले. त्यातून दर्शन मंडप आणि महिला तसेच पुरुषांसाठी स्वच्छतागृहे ही दोनच कामे हाती घेतली. या तीनही इमारतींचे काम अजून अपूर्ण आहेत.

सातबाऱ्यावर नाव नाहीसुंदर जोतिबा प्रकल्पावेळी ३०० लोक बाधित झाले. त्यापैकी १५० मिळकतधारकांची नावे अजून सातबारा व प्रापर्टी कार्डला लागलेली नाहीत. त्याचे सन २०१५-१७ च्या दरम्यान महसूल विभागाने सर्व्हेक्षण केले. मिळालेल्या प्लॉटवरच बांधकाम करून राहिलेले, खरेदी-विक्री झालेले व अदलाबदली झालेले प्लॉट अशी वर्गवारी करून पंचनामा केला गेला, पण त्यावर पुढे कार्यवाही झाली नाही.

भौगोलिक परिस्थिती, स्थानिकांचा उदरनिर्वाह, भाविकांना सुविधा, गुरव-भाविकातील नातेसंबंध, धार्मिक विधी यांचा विचार करून, सर्वांशी चर्चा करून प्रकल्प राबवला पाहिजे. पण याआधीचा अनुभव वाईट असल्याने पूर्वानुभवाची भीती आहे, विकासाला विरोध नाही. - जयवंत शिंगे, शिक्षक, ग्रामस्थ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा