उजळाईवाडीतील तरुणीचा मृतदेह राजाराम तलवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:23 IST2021-05-24T04:23:37+5:302021-05-24T04:23:37+5:30
कोल्हापूर : येथील उजळाईवाडी (ता. करवीर) म्हाडा कॉलनीतील बेपत्ता तरुणीचा मृतदेह रविवारी सकाळी राजाराम तलावात पाण्यावर तरंगताना मिळून आला. ...

उजळाईवाडीतील तरुणीचा मृतदेह राजाराम तलवात
कोल्हापूर : येथील उजळाईवाडी (ता. करवीर) म्हाडा कॉलनीतील बेपत्ता तरुणीचा मृतदेह रविवारी सकाळी राजाराम तलावात पाण्यावर तरंगताना मिळून आला. ऐश्वर्या बाळकृष्ण चव्हाण (वय २२) असे तिचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ऐश्वर्या चव्हाण ही तरुणी शनिवारी रात्रीपासून बेपत्ता होती. त्याबाबत तिच्या वडिलांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात रात्रीच बेपत्ताची तक्रार नोंदवली होती. शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तिने वडिलांच्या डोळ्यात औषधांचा ड्राप घातला. त्यानंतर ती अभ्यास करण्याचे निमित्त काढून आतील खोलीत गेली, पण रात्री झोपताना ती घरी नसल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. त्यांनी रात्री शोधाशोध केली, पण ती न आढळल्याने वडील बाळकृष्ण चव्हाण यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रार नोंदवली. रविवारी सकाळी तिचा मृतदेह राजाराम तलावात पाण्यावर तरंगताना पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी पंचनामा करून तो बाहेर काढला. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ, दोन आत्या असा परिवार आहे. तिने आत्महत्या केली की तिचा घातपात करण्यात आला याबाबत पोलीस तपास करत आहेत.