शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कोल्हापूर उत्तरमधील भाजपचा विजय सोपा, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 13:27 IST

कोल्हापूर : काँग्रेस सरकारच्या काळात जैन, साधू आणि मुनींवर हल्ले झाले आहेत. जातीपातीत आणि समाजात संघर्ष निर्माण करायचा आणि ...

कोल्हापूर : काँग्रेस सरकारच्या काळात जैन, साधू आणि मुनींवर हल्ले झाले आहेत. जातीपातीत आणि समाजात संघर्ष निर्माण करायचा आणि राजकीय पोळी भाजून घ्यायची, ही काँग्रेसची आजवरची नीती आहे. सध्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत, विरोधकांनी दहशत आणि दबावाचे राजकारण सुरू केले आहे. यामुळे उत्तरमधील भाजपचा विजय सोपा झाला आहे, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.शुभंकरोती हॉलमध्ये रविवारी चाय पे चर्चा कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपचे उमेदवार सत्यजित नाना कदम यांच्या प्रचारासाठी फडणवीस यांनी थेट मंगळवार पेठ, बेलबाग परिसरातील जैन बांधवांशी संवाद साधला. सत्यजित कदम यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. विरोधकांकडून सत्तेचा आणि पदाचा कितीही गैरवापर केला, तरी कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या करवीरनगरीची कुस्तीपंढरी म्हणून ओळख आहे. येथे तालमी चालतील, पण दहशत चालणार नाही. कोल्हापूरची जनता दहशत झुगारून देत, सत्यजित कदम यांनाच विजयी करतील.ललित गांधी म्हणाले, समाजाच्या जडणघडणीत जैन समाजाचा मोठा वाटा आहे. जैन समाजाने स्वतःच्या हिमतीवर एकी आणि प्रगती साधली आहे. त्यामुळे भाजपच्या विकासाची ध्येयधोरणे या समाजाला पटली आहेत. त्यामुळे भाजपच्या पाठीशी जैन समाजाचे पाठबळ आहे.या वेळी माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी, उमेदवार सत्यजित कदम, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांचीही भाषणे झाली. कदम यांच्या प्रचारासाठी पुण्याहून भाजप जैन समाज प्रतिष्ठानच्या महिला सदस्या कोल्हापुरात आल्या आहेत. या प्रतिष्ठानच्या प्रदेशाध्यक्षा जयश्री मोदी, तृप्ती चोभारकर यांनी नियोजन केले. कार्यक्रमाला भरत गांधी, हितेश ओसवाल, किरण नकाते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस