शहरं
Join us  
Trending Stories
1
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना; अपघात कॅमेऱ्यात कैद
2
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
3
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
4
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
5
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
6
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
7
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
8
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
9
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
10
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
11
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
12
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
13
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
14
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
15
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
16
लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
17
अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
18
३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 
19
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
20
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेवरून पायउतार होताच भाजप रस्त्यावर : ‘शिवाजी महाराज’ योजनेतील ४१ हजार शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 14:08 IST

एकाच अध्यादेशात फारशा अटी-शर्तीमध्ये कर्जमाफीत न अडकवता कर्जमाफी योजना राबविण्याचा मानस तरी या सरकारचा दिसतो. त्यातून किती शेतकºयांना लाभ होतो, हा नंतरचा भाग आहे. याउलट देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जून २०१७ मध्ये राज्यातील मार्च २०१६ पूर्वीचे दीड लाखापर्यंतची थकीत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देअडीच वर्षे घेणाऱ्यांकडून महिन्यात कर्जमाफीची अपेक्षा दृष्टिक्षेपात शिवाजी महाराज कर्जमाफी, कोल्हापूर जिल्हा : कर्जमाफीसाठी आलेले अर्ज लाभ मिळालेले खातेदार रक्कम पात्र मात्र वंचित २, ५०, ७५८ १, ८२, ००० ३३६.७९ कोटी ४१ हजार

राजाराम लोंढेकोल्हापूर : सत्तेवरून पायउतार होताच भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्यास सुरुवात केली. ज्या कर्जमाफीच्या प्रश्नांसाठी ते रस्त्यावर उतरले, त्याच कर्जमाफीचे गुºहाळ भाजप सरकारचे अडीच वर्षे सुरू होते. कर्जमाफीची प्रक्रिया आणि निकषाच्या चाळणीने शेतकरी मेटाकुटीला आला होता. त्यातूनही पात्र ठरलेले ४१ हजार शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. कर्जमाफी अडीच वर्षे घेणाºया भाजप नेत्यांकडून मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांनी महिन्यात कर्जमाफी करण्याची अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न शेतकऱ्यांमधूनच व्यक्त होत आहे.

राज्यातील नव्या महाविकास आघाडीच्या सरकारने २७ डिसेंबर २०१९ रोजी दोन लाखांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. महिन्याभरात विकास संस्थांकडून सप्टेंबर २०१९ अखेर थकीत पीक कर्जाच्या याद्या मागविल्या. त्या याद्यांची लेखापरीक्षकांकडून पडताळणीचे कामही पूर्ण झाले. या याद्या अपलोड केल्यानंतर योजनेच्या निकषानुसार पात्र, अपात्र ठरवले जातील आणि पात्र शेतकºयांच्या खात्यावर थेट कर्जमाफीची रक्कम वर्ग होणार आहे.

एकाच अध्यादेशात फारशा अटी-शर्तीमध्ये कर्जमाफीत न अडकवता कर्जमाफी योजना राबविण्याचा मानस तरी या सरकारचा दिसतो. त्यातून किती शेतकºयांना लाभ होतो, हा नंतरचा भाग आहे.याउलट देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जून २०१७ मध्ये राज्यातील मार्च २०१६ पूर्वीचे दीड लाखापर्यंतची थकीत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ या नावाने कर्जमाफी सुरू केली; पण निकष, ‘पिवळी’, ‘लाल’ व ‘हिरवी’ याद्यांचा घोळांमुळे गेली अडीच वर्षे कर्जमाफीचे गुºहाळ सुरू राहिले. एकूणच प्रक्रियेने शेतकरी मेटाकुटीला आले होते. कर्जमाफीसाठी ढीगभर निकष राहिल्याने राबवायची कशी? असा पेच सरकारी यंत्रणेसमोर होता. त्यातूनच पात्र, अपात्र याद्यांचा घोळ शेवटपर्यंत राहिला; त्यामुळे कर्जमाफीच्या लाभापेक्षा शेतक-यांना मन:स्तापच अधिक झाला.

जुलै-आॅगस्टमध्ये महापुराने शेतकरी उद्ध्वस्त झाले, त्यावेळी फडणवीस सरकारने कर्जमाफीची घोषणा केली; मात्र त्याचेही गुºहाळ अद्याप सुरूच आहे.आपण सत्तेवर असताना अडीच वर्षांत कर्जमाफी योजना पूर्ण करता आली नसताना महिन्यातच ठाकरे सरकारने शेतक-यांचा सातबारा कोरा करावा, असा आग्रह धरणे कितपत उचित आहे. कर्जमाफीची योजना राबविण्यासाठी किमान तीन-चार महिन्यांचा कालावधी लागतो, विरोधक म्हणून भाजपची भूमिका कदाचित योग्यही असेल; मात्र ही वेळ नाही. किमान वर्षभर सरकारला काम करू दिल्यानंतर त्यांच्या चुकांवर रान उठवले असते, तर ज्या उद्देशाने आंदोलन केले, त्या जनतेची सहानुभूती कदाचित मिळालीही असती.

  • राजकारणासाठी शेतक-यांची चेष्टा

प्रत्येक राजकीय पक्षाने निवडणूक आली की कर्जमाफीची लोकप्रिय घोषणा करायची आणि त्याचा राजकीय लाभ उचलायचा, हा जुना फंडा झाला; त्यामुळेच गेल्या तीन वर्षांत तीन कर्जमाफ्यांची घोषणा होऊनही सरकारचे धोरण स्पष्ट नसल्याने त्याचा शेतकºयांना फायदा होताना दिसत नाही. उलट इतर घटकांकडून सततच्या कर्जमाफीमुळे शेतकºयांची चेष्टाच होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाgovernment schemeसरकारी योजना