शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

सत्तेवरून पायउतार होताच भाजप रस्त्यावर : ‘शिवाजी महाराज’ योजनेतील ४१ हजार शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 14:08 IST

एकाच अध्यादेशात फारशा अटी-शर्तीमध्ये कर्जमाफीत न अडकवता कर्जमाफी योजना राबविण्याचा मानस तरी या सरकारचा दिसतो. त्यातून किती शेतकºयांना लाभ होतो, हा नंतरचा भाग आहे. याउलट देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जून २०१७ मध्ये राज्यातील मार्च २०१६ पूर्वीचे दीड लाखापर्यंतची थकीत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देअडीच वर्षे घेणाऱ्यांकडून महिन्यात कर्जमाफीची अपेक्षा दृष्टिक्षेपात शिवाजी महाराज कर्जमाफी, कोल्हापूर जिल्हा : कर्जमाफीसाठी आलेले अर्ज लाभ मिळालेले खातेदार रक्कम पात्र मात्र वंचित २, ५०, ७५८ १, ८२, ००० ३३६.७९ कोटी ४१ हजार

राजाराम लोंढेकोल्हापूर : सत्तेवरून पायउतार होताच भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्यास सुरुवात केली. ज्या कर्जमाफीच्या प्रश्नांसाठी ते रस्त्यावर उतरले, त्याच कर्जमाफीचे गुºहाळ भाजप सरकारचे अडीच वर्षे सुरू होते. कर्जमाफीची प्रक्रिया आणि निकषाच्या चाळणीने शेतकरी मेटाकुटीला आला होता. त्यातूनही पात्र ठरलेले ४१ हजार शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. कर्जमाफी अडीच वर्षे घेणाºया भाजप नेत्यांकडून मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांनी महिन्यात कर्जमाफी करण्याची अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न शेतकऱ्यांमधूनच व्यक्त होत आहे.

राज्यातील नव्या महाविकास आघाडीच्या सरकारने २७ डिसेंबर २०१९ रोजी दोन लाखांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. महिन्याभरात विकास संस्थांकडून सप्टेंबर २०१९ अखेर थकीत पीक कर्जाच्या याद्या मागविल्या. त्या याद्यांची लेखापरीक्षकांकडून पडताळणीचे कामही पूर्ण झाले. या याद्या अपलोड केल्यानंतर योजनेच्या निकषानुसार पात्र, अपात्र ठरवले जातील आणि पात्र शेतकºयांच्या खात्यावर थेट कर्जमाफीची रक्कम वर्ग होणार आहे.

एकाच अध्यादेशात फारशा अटी-शर्तीमध्ये कर्जमाफीत न अडकवता कर्जमाफी योजना राबविण्याचा मानस तरी या सरकारचा दिसतो. त्यातून किती शेतकºयांना लाभ होतो, हा नंतरचा भाग आहे.याउलट देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जून २०१७ मध्ये राज्यातील मार्च २०१६ पूर्वीचे दीड लाखापर्यंतची थकीत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ या नावाने कर्जमाफी सुरू केली; पण निकष, ‘पिवळी’, ‘लाल’ व ‘हिरवी’ याद्यांचा घोळांमुळे गेली अडीच वर्षे कर्जमाफीचे गुºहाळ सुरू राहिले. एकूणच प्रक्रियेने शेतकरी मेटाकुटीला आले होते. कर्जमाफीसाठी ढीगभर निकष राहिल्याने राबवायची कशी? असा पेच सरकारी यंत्रणेसमोर होता. त्यातूनच पात्र, अपात्र याद्यांचा घोळ शेवटपर्यंत राहिला; त्यामुळे कर्जमाफीच्या लाभापेक्षा शेतक-यांना मन:स्तापच अधिक झाला.

जुलै-आॅगस्टमध्ये महापुराने शेतकरी उद्ध्वस्त झाले, त्यावेळी फडणवीस सरकारने कर्जमाफीची घोषणा केली; मात्र त्याचेही गुºहाळ अद्याप सुरूच आहे.आपण सत्तेवर असताना अडीच वर्षांत कर्जमाफी योजना पूर्ण करता आली नसताना महिन्यातच ठाकरे सरकारने शेतक-यांचा सातबारा कोरा करावा, असा आग्रह धरणे कितपत उचित आहे. कर्जमाफीची योजना राबविण्यासाठी किमान तीन-चार महिन्यांचा कालावधी लागतो, विरोधक म्हणून भाजपची भूमिका कदाचित योग्यही असेल; मात्र ही वेळ नाही. किमान वर्षभर सरकारला काम करू दिल्यानंतर त्यांच्या चुकांवर रान उठवले असते, तर ज्या उद्देशाने आंदोलन केले, त्या जनतेची सहानुभूती कदाचित मिळालीही असती.

  • राजकारणासाठी शेतक-यांची चेष्टा

प्रत्येक राजकीय पक्षाने निवडणूक आली की कर्जमाफीची लोकप्रिय घोषणा करायची आणि त्याचा राजकीय लाभ उचलायचा, हा जुना फंडा झाला; त्यामुळेच गेल्या तीन वर्षांत तीन कर्जमाफ्यांची घोषणा होऊनही सरकारचे धोरण स्पष्ट नसल्याने त्याचा शेतकºयांना फायदा होताना दिसत नाही. उलट इतर घटकांकडून सततच्या कर्जमाफीमुळे शेतकºयांची चेष्टाच होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाgovernment schemeसरकारी योजना