शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

Jayant Patil: पृथ्वीवर मानव जन्माला यायच्या आधीच 'भाजप'ची स्थापना, जयंत पाटलांनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 10:56 IST

५० वर्षात तीन वेळा पक्षाची नावे बदलणाऱ्यांकडून यापेक्षा दुसरा कोणता विनोद घडूच शकत नाही, त्यांच्या या बोलण्याला आमचा पाठिंबाच असेल असा चिमटाही काढला.

कोल्हापूर : भाजप हा इतका जुना पक्ष आहे की पृथ्वीतलावर मानव जन्माला यायच्या आधीच त्याची स्थापना झाली होती असे जरी म्हटले तरी आम्हाला काही हरकत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली. ५० वर्षात तीन वेळा पक्षाची नावे बदलणाऱ्यांकडून यापेक्षा दुसरा कोणता विनोद घडूच शकत नाही, त्यांच्या या बोलण्याला आमचा पाठिंबाच असेल असा चिमटाही काढला.

राष्ट्रवादी परिवार संवादयात्रेच्या निमित्ताने कोल्हापुरात आलेल्या जयंत पाटील यांच्याशी गुरुवारी संध्याकाळी पत्रकारांनी संवाद साधला. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी भाजपला पाच हजार वर्षांपूर्वीची परंपरा असल्याच्या केलेल्या वक्तव्यावर विचारणा केली असता त्यांनी मिश्कील टिप्पणी केली. ते म्हणाले, भाजपचा जन्म होऊन ५० वर्षेदेखील झालेली नाहीत.

या काळात त्यांच्या पक्षाने तीन वेळा नावे बदलली, तीन स्थित्यंतरे पक्षाने पाहिली आहेत. काँग्रेसचे मात्र नाव कधीच बदलले नाही. ज्यांना स्वत:चाच इतिहास माहीत नाही त्यांनी १० हजार वर्षांपूर्वी असे म्हटले तरी काही फरक पडत नाही. लोकांचे मात्र चांगले मनोरंजन होते, त्यामुळे अशी वक्तव्ये करत राहा, आमचा कायमच पाठिंबा राहील.

दादांना विश्रांतीची गरजचंद्रकांत पाटील हे काहीही बाेलत राहतात, त्यांचे बोलणे आता किती गांभिर्याने घ्यायचे हेच बघावे लागणार आहे. त्यांना आता थोडी विश्रांती घ्यावी, कोल्हापूरकरांनी उत्तरच्या निवडणुकीत त्यांना हेच सांगितले आहे, आता ते किती मनावर घेतात, ते बघुया अशीही टीपणी पाटील यांनी केली.

ब्राह्मण समाजाची दिलगिरीआमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीतील सभेत केलेले वक्तव्य हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे, पक्षाचे नाही. त्यांचे हे वाक्य मलाही अनपेक्षितच असल्यानेच मी भाषण थांबवण्याची सूचना केली, ब्राह्मण समाजाला दुखावण्याचा आमचा हेतू पूर्वीही नव्हता, कधी असणार नाही, झाले ते चुकीचे होते, मी पक्षाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो, समाजाने गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJayant Patilजयंत पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा