शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आई सरस्वती गेली..मायेचा आधार गेला, कायम उणीव भासणार; चंद्रकांतदादांनी व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 18:45 IST

ती इथे घरात होती त्यामुळे मी निर्धास्त होतो. निश्चिंत होताे. मात्र आता मात्र तिची कायम उणीव भासत राहील.

माझी आई निपाणीची. जमादार यांच्या घरातील. निरक्षर. सहीदेखील करता येत नव्हती. परंतु तिचे व्यवहारज्ञान चोख होते. माझी सावत्र आईही होती. तीदेखील वडिलांसोबत मिलमध्ये काम करत असे. आम्ही सर्वजण एकत्र राहत होतो. पण कधीही आईने तक्रार केली नाही. पूर्वी मुंबईत कोणीही गावाकडचा नातेवाईक शिकण्यासाठी, नोकरीसाठी येणार असेल तर तो तिथल्या आपल्या पाहुण्यांकडे राहत असे. हीच परंपरा आमच्या घरी होती. त्यामुळे मावसभाऊ, भाचा असे अनेकजण घरी रहायलाही होते. अभाविपचे काम सुरू केल्यानंतर तर घरी येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या खूपच वाढली. परंतु कधीही आईने याबद्दल तक्रार केली नाही. कटकट केली नाही. श्रावण महिन्याआधी तर विनोद तावडे यांच्यापासून ते आशिष शेलार यांच्यापर्यंत अनेकजण घरी हक्काने यायचेच.कोणत्याही विपरीत परिस्थितीमध्ये ती अस्वस्थ व्हायची नाही. शांत रहायची. मला तिच्या या गुणाचे खूप अप्रूप वाटायचे. तोच गुण अंगी बाणवण्याचा मी प्रयत्न करत आहे. मी अभाविपचे काम करण्याचा निर्णय घेतला. त्याला वडिलांचा मोठा विरोध होता. परंतु माझी आई आणि सावत्र आईने त्यांची समजूत काढली. मी वेळेत लग्न करावं, संसार करावा असा लकडा आईने माझ्या मागे लावला. मी लहानपणापासून ज्ञानेश्वरी वाचणारा. त्यामुळे संन्यस्त वृत्तीने काम करावे अशी माझी भूमिका होती. परंतु एक-दोन वर्षांसाठी संघटनेच्या कामासाठी गेलेला मी १३ वर्षांनी परत आलो. लग्न केलं. सहा वर्षांतच पहिली पत्नी गेली. मग चार वर्षांनी दुसरं लग्न केलं. पण या सगळ्यांमध्ये आमचे लग्न, संसार, मुलंबाळं याबाबत तिच्या मनासारख्या काही गोष्टी घडल्या नाहीत. पण या माउलीने त्याबद्दल कधीही खंत व्यक्त केली नाही.लहानपणी सुटीमध्ये माहेरी निपाणीला आम्ही गेलं पाहिजे हा मात्र तिचा आग्रह कायम असे. त्यानुसार मी निपाणीमध्ये खूपवेळा राहिलो आहे. दत्ता सामंत यांच्या संपानंतर मिल बंद पडल्या. मग आईबाबांनी सांगितलं, तू आम्हाला गावाकडं घर बांधून दे. मग भुदरगड तालुक्यातील खानापूर या गावी मी घर बांधलं. हे दोघेही तिथं राहू लागले. मी १९९५ ला लग्न केलं आणि कोल्हापूरमध्ये वाय. पी. पोवारनगरमध्ये भाड्याच्या घरात राहू लागले. तेव्हा दोघेही माझ्याकडे राहू लागले.संभाजीनगरमध्ये १९९९ साली मी घर बांधलं. तेव्हापासून आई माझ्यासोबतच होती. राजकारणामुळं माझा आणि ऑडिटच्या कामामुळं बायकोचा खूप प्रवास सुरू असतो. त्यामुळे आईच घरी सर्व बघायची. कोणाचं येणं, जाणं. घरी आलेल्यांचं स्वागत करायला तीच पुढे असायची. मुलासारखी असलेली घरी अनेक मंडळी आहेत. पण घरातल्या कोणीतरी स्वागत केलेलं येणाऱ्यांना आवडतं. ते काम आई आवडीने करायची. दहा वर्षांपूर्वी ती घरात पडली. वॉकर घेऊन चालत होती. पण तिने कोणाच्या आगतस्वागतात कमी नाही केले. ती इथे घरात होती त्यामुळे मी निर्धास्त होतो. निश्चिंत होताे. मात्र आता मात्र तिची कायम उणीव भासत राहील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील