शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
5
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
6
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
7
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
8
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
9
"ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
10
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
15
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
16
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
17
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
18
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
19
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
20
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 21:31 IST

गडहिंग्लजमध्ये 'शक्तिपीठ महामार्ग' समर्थनार्थ भाजपाची पदयात्रा

गडहिंग्लज: खोटी आशा दाखवून,भावना भडकावून शेतकऱ्यांच्या जीवावर आंदोलने करणाऱ्या आणि कारखानदारांशी तोडपाणी करून स्वतःची घरे भरणाऱ्यांना सोडून शेतकरी आता वेगळ्या, चांगल्या प्रवाहात सामील झाले आहेत. तथाकथित नेत्यांचा शेतकऱ्यांविषयीचा कळवळा खोटा आहे, त्यांच्या गावातही त्यांना कुणी विचारत नाही. त्यामुळे 'दोन हाणा पण मला नेता म्हणा' असे म्हणायची वेळ त्यांच्यावर आली आहे, असा घणाघात आमदार शिवाजी पाटील यांनी नामोल्लेख टाळून माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केला.

भाजपातर्फेशक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आयोजित पदयात्रेत ते बोलत होते. चंदगड- गडहिंग्लज -आजरा तालुक्यातून हा मार्ग जावा,अशी मागणी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.दरम्यान,शक्तिपीठ विरोधकांच्या निषेधाच्या घोषणांबाजीसह 'देवाभाऊ-शिवाभाऊ आगे बढो,हम तुम्हारे साथ है !'ही घोषणा लक्षवेधी ठरली.

पाटील म्हणाले,दिल्लीपासून काश्मीरपर्यंतचे पर्यटक शक्तिपीठावरून जाणार आहेत.त्यामुळे पर्यटन व औद्योगिक विकासाला मोठी संधी आहे. त्यातून युवक व महिलांना रोजगार मिळेल. उपराजधानी बेळगावप्रमाणे गडहिंग्लज विभागाचा विकास होणार आहे.मात्र,केवळ विरोधासाठीच त्याला विरोध केला जात आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघाचा विकासासाठी शक्तिपीठ महामार्ग होणे आवश्यक आहे. तशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून त्याची दखल त्यांनी घेतली आहे.यासंदर्भात आपण शेतकऱ्यांशीही विचारविनिमय करणार आहोत.त्यामुळे त्याला नक्कीच यश येईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आमदार पाटील यांनी येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरूवात केली.दसरा चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पदयात्रेची सांगता झाली. पदयात्रेत नेतेमंडळी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुराडे यांचा पाठिंबा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा.किसनराव कुराडे यांनीही प्रांतकचेरीसमोर उपस्थित राहुन आमदार पाटील यांच्या शक्तिपीठाच्या मागणीला पाठिंबा दिला.विकासासाठी रस्ते महत्त्वाचे आहेत.म्हणूनच आपण पाठिंबा दिला आहे,असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

७२ कार्यकर्ते, ३४ लोकांना अटक!

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात गडहिंग्लजमध्ये आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची संख्या केवळ ७२ होती, त्यापैकी ३४ लोकांना अटक झाली,अशी टीकाही आमदार पाटील यांनी केली.

टॅग्स :Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गBJPभाजपाRaju Shettyराजू शेट्टी