शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

“…निकालानंतर तोंडाला पाणी सुटलं आणि शरद पवारांच्या आश्रयात गेले;” अमित शाहंचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 21:26 IST

आज वेळ बदलली आहे आणि खरी शिवसेना धनुष्यबाणासह भाजपसह आहे, असं अमित शाह म्हणाले.

कोल्हापूर:  येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व लोकसभेच्या ४८ जागा भाजप, शिवसेना आणि मित्र पक्षांच्या निवडून द्या आणि महाराष्ट्रात भाजप शिवसेनेचे वर्चस्व निर्माण करा, असं स्पष्ट आवाहन केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शाह यांनी केलं. दरम्यान, यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. “निवडणुकाचे निकाल आले आणि नंतर त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. सर्व तत्त्वांना त्यांनी बाजूला ठेवले आणि शरद पवारांच्या आश्रयात जाऊन मला मुख्यमंत्री बनवा म्हणाले,” असं म्हणत शाह यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

“आपल्याला निवडणुकांमध्ये जिंकायचं आहे. आता सर्व समस्या दूर झाल्या आहेत. २०१९ ला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढलो होतो. त्यावेळी मोदींचा मोठा फोटो लावला होता आणि लहान फोटो उद्धव ठाकरेंचा लावला होता की नाही? जेव्हा निवडणुकांचे निकाल आले तेव्हा तोंडाला पाणी सुटलं. सर्व तत्त्वांना बाजूला ठेवून शरद पवारांच्या आश्रयात गेले. त्यांना सांगितलं मला मुख्यमंत्री बनवा. मोठा पक्ष कोणता होता? कोण मुख्यमंत्री बनायला हवं होतं? आम्हाला सत्तेचा लोभ नाही, सत्तेसाठी आम्ही आमची तत्त्व बाजूला ठेवली नाहीत,” असं अमित शाह म्हणाले.

आज वेळ बदलली आहे...“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आज शरद पवारांच्या चरणात बसला होता. पण आज वेळ बदलली आहे आणि खरी शिवसेना धनुष्यबाणासह भाजपसह आहे,” असं त्यांनी नमूद केलं. मी पुन्हा सांगतो आमच्या मनात सत्तेचा मोह नाही. महाराष्ट्राचं हित सर्वतोपरी आहे. आजही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचं काम भाजपच्या आमदारांनी केलं. महाराष्ट्रात निवडणुका असताना आमची अपेक्षा महाराष्ट्रात बहुमताची नाही. आम्ही संतुष्ट नाही. यावेळी संपूर्ण विजय हवा आहे. ४८ पैकी ४८ जागा आम्हाला हव्या असल्याचंही शाह यांनी स्पष्ट केलं.

“शिवसेना भाजप युती पुन्हा एकदा हे सिद्ध करेल की कुटील बुद्धीनं राजकारणाला सत्तेला काही काळासाठी मिळवू शकता. पण मैदानात येण्याचा येण्याची वेळ येते तेव्हा साहस, शौर्य, परिणाम आवश्यक आहे. तो तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडे आहे,” असंही त्यांनी म्हटलं.

टॅग्स :Amit Shahअमित शाहUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदी