शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भाजप कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाईंनी दिला राजीनामा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 15:22 IST

शिवाजी सावंत  गारगोटी: भाजपाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देसाईंच्या राजीनाम्याने राधानगरी विधानसभा मतदारसंघात ...

शिवाजी सावंत गारगोटी: भाजपाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देसाईंच्या राजीनाम्याने राधानगरी विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली. दोन्ही जिल्हाध्यक्षांनी एकदम राजीनामा देण्याची पहिलीच वेळ आहे. राष्ट्रवादीच्या तुतारीने कोल्हापूर जिल्ह्यात पक्षांतर करण्याचे जणू रणशिंग फुंकले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमुळे देसाई यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे चित्र स्पष्ट होते. त्यामुळे त्यांची घुसमट होणार होती. अपक्ष लढावे लागणार असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले असावे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस, शिवसेना (उध्दव ठाकरे) यापैकी कोणत्या पक्षात प्रवेश करणार याचा निर्णय घेणार आहेत. मात्र, आमदार सतेज पाटील यांच्याशी त्यांच्या घराण्याचे जूने संबंध, घराण्यातील दोन पिढ्यांचा काँग्रेस पक्षासोबत आहेत. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचा शब्द घेऊन ते भविष्यातील त्यांची राजकीय वाटचाल महाआघाडीच्या बाजुने रहाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.पाच वर्षांपूर्वी माजी महसूलमंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र सत्तेचा कोणताही लाभ त्यांना मिळाला नसल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये असंतोष पसरला होता. त्यामुळे भाजपा सोडण्यासाठी त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी दबाव वाढवला होता. त्यांचा या विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र गट असल्याने ते विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज आहेत.

आमदार सतेज पाटील यांच्या जोडणीच्या माध्यमातून मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ते पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर जाण्याची शक्यता आहे. मात्र, ए वाय पाटील हे लोकसभेच्या निवडणुकीत अगोदरच त्या ठिकाणी गेले असल्याने उमेदवारीसाठी अडचणी वाढणार आहेत. पण कार्यकर्ते आणि जिल्ह्याच्या नेत्यांशी चर्चा करून पक्ष प्रवेश करण्यावर ते ठाम आहेत. अत्यंत मनमिळावू आणि शांत स्वभावामुळे त्यांची राजकारणात वेगळी ओळख आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणBJPभाजपा