शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

कोल्हापुरातील भाजपला केंद्र शासनाच्या योजनांचा आधार-दोन्ही काँग्रेस, सेनेबरोबर लढताना दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 10:25 IST

त्यातही पाटील अशी काही विधाने करतात की, त्यामुळे राज्यात खळबळ उडते. त्यावर टीकाटिप्पणीही होते. मात्र आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील ऊर्जा टिकविण्यासाठी ते अशी भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारची वर्षपूर्ती । दोन्ही काँग्रेस, सेनेबरोबर लढताना दमछाक मोदी सरकारच्या निर्णयांचे स्वागत । ठाकरे सरकारच्या धोरणांचा विरोधच

समीर देशपांडे ।कोल्हापूर : सध्या महाराष्ट्रामध्ये सत्ता नसल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांना केंद्र सरकारच्या योजनांचाच आधार घ्यावा लागत आहे. नरेंद्र मोदी यांनी धडाकेबाज निर्णय घेतला की, बिंदू चौकामध्ये साखर वाटप करणे आणि महाराष्ट्र सरकारने एखादा निर्णय घेतला तर तो चुकीचा आहे यासाठी आंदोलन करणे, असे दुहेरी काम आता भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना करावे लागत आहे. नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिल्या वर्षपूर्तीवेळी जिल्ह्यात हे चित्र दिसत आहे.

गेल्या सहा वर्षांमध्ये भाजपात कोल्हापूरचे सुपुत्र चंद्रकांत पाटील यांना विशेष महत्त्व आल्याचे पाहावयास मिळते. मराठा आरक्षणापासून ते टोलमुक्तीपर्यंतच्या अनेक बाबतीत पाटील यांनी निर्णायक भूमिका बजावली. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्तेबाहेर बसावे लागले. आता पाटील यांच्याच नेतृत्वाखाली जिल्ह्यातील भाजप कार्यरत आहे; परंतु राज्यात सत्ता नसल्याने आमचे मोदी सरकार किती चांगले काम करीत आहे, हे सांगण्याची एकही संधी जिल्हापातळीवर मंडळी सोडत नाहीत. मोदी यांचे सरकार दुसºया टर्ममधील पहिले वर्ष पूर्ण करीत असताना जिल्ह्यात भाजपला केंद्राच्याच कामगिरीचा आधार घ्यावा लागत आहे.

फडणवीस, पाटील यांच्या तोफासध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आक्रमक पवित्र्यामध्ये आहेत. त्यातही पाटील अशी काही विधाने करतात की, त्यामुळे राज्यात खळबळ उडते. त्यावर टीकाटिप्पणीही होते. मात्र आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील ऊर्जा टिकविण्यासाठी ते अशी भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.महापालिका, ‘गोकुळ’च्या मैदानात कस..सध्या माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासारखे नेते भाजपचा किल्ला लढवीत आहेत. मात्र, राज्यात सत्ता नसताना एकाच वेळी दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेशी लढत असताना मर्यादाही पडत आहेत. कोरोना संपल्यानंतर जेव्हा सर्व काही सुरळीत होईल आणि कोल्हापूर महापालिकेपासून ते ‘गोकुळ’पर्यंत संस्थांच्या निवडणुका लागतील, तेव्हा या सर्वांचा कस लागणार आहे.

च्सध्या माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासारखे नेते भाजपचा किल्ला जिल्ह्यात लढवीत आहेत.च्मात्र राज्यात सत्ता नसताना एकाच वेळी दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेशी लढत असताना अनेक मर्यादाही पडत आहेत. कोरोना संपल्यानंतर जेव्हा सर्व काही सुरळीत सुरू होईल आणि कोल्हापूर महापालिकेपासून ते ‘गोकुळ’पर्यंत संस्थांच्या निवडणुका लागतील, तेव्हा या सर्वांचा कस लागणार आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस