शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

कोल्हापुरातील भाजपला केंद्र शासनाच्या योजनांचा आधार-दोन्ही काँग्रेस, सेनेबरोबर लढताना दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 10:25 IST

त्यातही पाटील अशी काही विधाने करतात की, त्यामुळे राज्यात खळबळ उडते. त्यावर टीकाटिप्पणीही होते. मात्र आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील ऊर्जा टिकविण्यासाठी ते अशी भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारची वर्षपूर्ती । दोन्ही काँग्रेस, सेनेबरोबर लढताना दमछाक मोदी सरकारच्या निर्णयांचे स्वागत । ठाकरे सरकारच्या धोरणांचा विरोधच

समीर देशपांडे ।कोल्हापूर : सध्या महाराष्ट्रामध्ये सत्ता नसल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांना केंद्र सरकारच्या योजनांचाच आधार घ्यावा लागत आहे. नरेंद्र मोदी यांनी धडाकेबाज निर्णय घेतला की, बिंदू चौकामध्ये साखर वाटप करणे आणि महाराष्ट्र सरकारने एखादा निर्णय घेतला तर तो चुकीचा आहे यासाठी आंदोलन करणे, असे दुहेरी काम आता भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना करावे लागत आहे. नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिल्या वर्षपूर्तीवेळी जिल्ह्यात हे चित्र दिसत आहे.

गेल्या सहा वर्षांमध्ये भाजपात कोल्हापूरचे सुपुत्र चंद्रकांत पाटील यांना विशेष महत्त्व आल्याचे पाहावयास मिळते. मराठा आरक्षणापासून ते टोलमुक्तीपर्यंतच्या अनेक बाबतीत पाटील यांनी निर्णायक भूमिका बजावली. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्तेबाहेर बसावे लागले. आता पाटील यांच्याच नेतृत्वाखाली जिल्ह्यातील भाजप कार्यरत आहे; परंतु राज्यात सत्ता नसल्याने आमचे मोदी सरकार किती चांगले काम करीत आहे, हे सांगण्याची एकही संधी जिल्हापातळीवर मंडळी सोडत नाहीत. मोदी यांचे सरकार दुसºया टर्ममधील पहिले वर्ष पूर्ण करीत असताना जिल्ह्यात भाजपला केंद्राच्याच कामगिरीचा आधार घ्यावा लागत आहे.

फडणवीस, पाटील यांच्या तोफासध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आक्रमक पवित्र्यामध्ये आहेत. त्यातही पाटील अशी काही विधाने करतात की, त्यामुळे राज्यात खळबळ उडते. त्यावर टीकाटिप्पणीही होते. मात्र आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील ऊर्जा टिकविण्यासाठी ते अशी भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.महापालिका, ‘गोकुळ’च्या मैदानात कस..सध्या माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासारखे नेते भाजपचा किल्ला लढवीत आहेत. मात्र, राज्यात सत्ता नसताना एकाच वेळी दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेशी लढत असताना मर्यादाही पडत आहेत. कोरोना संपल्यानंतर जेव्हा सर्व काही सुरळीत होईल आणि कोल्हापूर महापालिकेपासून ते ‘गोकुळ’पर्यंत संस्थांच्या निवडणुका लागतील, तेव्हा या सर्वांचा कस लागणार आहे.

च्सध्या माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासारखे नेते भाजपचा किल्ला जिल्ह्यात लढवीत आहेत.च्मात्र राज्यात सत्ता नसताना एकाच वेळी दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेशी लढत असताना अनेक मर्यादाही पडत आहेत. कोरोना संपल्यानंतर जेव्हा सर्व काही सुरळीत सुरू होईल आणि कोल्हापूर महापालिकेपासून ते ‘गोकुळ’पर्यंत संस्थांच्या निवडणुका लागतील, तेव्हा या सर्वांचा कस लागणार आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस