शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

कोल्हापुरातील भाजपला केंद्र शासनाच्या योजनांचा आधार-दोन्ही काँग्रेस, सेनेबरोबर लढताना दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 10:25 IST

त्यातही पाटील अशी काही विधाने करतात की, त्यामुळे राज्यात खळबळ उडते. त्यावर टीकाटिप्पणीही होते. मात्र आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील ऊर्जा टिकविण्यासाठी ते अशी भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारची वर्षपूर्ती । दोन्ही काँग्रेस, सेनेबरोबर लढताना दमछाक मोदी सरकारच्या निर्णयांचे स्वागत । ठाकरे सरकारच्या धोरणांचा विरोधच

समीर देशपांडे ।कोल्हापूर : सध्या महाराष्ट्रामध्ये सत्ता नसल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांना केंद्र सरकारच्या योजनांचाच आधार घ्यावा लागत आहे. नरेंद्र मोदी यांनी धडाकेबाज निर्णय घेतला की, बिंदू चौकामध्ये साखर वाटप करणे आणि महाराष्ट्र सरकारने एखादा निर्णय घेतला तर तो चुकीचा आहे यासाठी आंदोलन करणे, असे दुहेरी काम आता भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना करावे लागत आहे. नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिल्या वर्षपूर्तीवेळी जिल्ह्यात हे चित्र दिसत आहे.

गेल्या सहा वर्षांमध्ये भाजपात कोल्हापूरचे सुपुत्र चंद्रकांत पाटील यांना विशेष महत्त्व आल्याचे पाहावयास मिळते. मराठा आरक्षणापासून ते टोलमुक्तीपर्यंतच्या अनेक बाबतीत पाटील यांनी निर्णायक भूमिका बजावली. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्तेबाहेर बसावे लागले. आता पाटील यांच्याच नेतृत्वाखाली जिल्ह्यातील भाजप कार्यरत आहे; परंतु राज्यात सत्ता नसल्याने आमचे मोदी सरकार किती चांगले काम करीत आहे, हे सांगण्याची एकही संधी जिल्हापातळीवर मंडळी सोडत नाहीत. मोदी यांचे सरकार दुसºया टर्ममधील पहिले वर्ष पूर्ण करीत असताना जिल्ह्यात भाजपला केंद्राच्याच कामगिरीचा आधार घ्यावा लागत आहे.

फडणवीस, पाटील यांच्या तोफासध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आक्रमक पवित्र्यामध्ये आहेत. त्यातही पाटील अशी काही विधाने करतात की, त्यामुळे राज्यात खळबळ उडते. त्यावर टीकाटिप्पणीही होते. मात्र आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील ऊर्जा टिकविण्यासाठी ते अशी भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.महापालिका, ‘गोकुळ’च्या मैदानात कस..सध्या माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासारखे नेते भाजपचा किल्ला लढवीत आहेत. मात्र, राज्यात सत्ता नसताना एकाच वेळी दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेशी लढत असताना मर्यादाही पडत आहेत. कोरोना संपल्यानंतर जेव्हा सर्व काही सुरळीत होईल आणि कोल्हापूर महापालिकेपासून ते ‘गोकुळ’पर्यंत संस्थांच्या निवडणुका लागतील, तेव्हा या सर्वांचा कस लागणार आहे.

च्सध्या माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासारखे नेते भाजपचा किल्ला जिल्ह्यात लढवीत आहेत.च्मात्र राज्यात सत्ता नसताना एकाच वेळी दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेशी लढत असताना अनेक मर्यादाही पडत आहेत. कोरोना संपल्यानंतर जेव्हा सर्व काही सुरळीत सुरू होईल आणि कोल्हापूर महापालिकेपासून ते ‘गोकुळ’पर्यंत संस्थांच्या निवडणुका लागतील, तेव्हा या सर्वांचा कस लागणार आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस