शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Jayant Patil: हसन मुश्रीफांच्या विरोधात भाजपचे मोठे कट कारस्थान, जयंत पाटलांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 12:20 IST

मंत्री मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. आपल्या सामाजिक कामामुळे राज्यभर पोहोचले आहेत. म्हणून भारतीय जनता पक्ष त्यांना बदनाम करण्यासाठी मोठे कट कारस्थान रचत आहे.

कागल : मंत्री मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. आपल्या सामाजिक कामामुळे राज्यभर पोहोचले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आमच्या पक्षाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. शरद पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. म्हणून भारतीय जनता पक्ष त्यांना बदनाम करण्यासाठी मोठे कट कारस्थान रचत आहे. ईडीची भीती घालत आहे. ईडीबीडीला घाबरून इतरांसारखे विचार बदलणारे हसन मुश्रीफ नव्हेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेतील शेवटची सभा कागल येथे आज झाली. त्यामध्ये ते बोलत होते. कागल विधानसभा मतदारसंघ हा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा सार आहे, असेही ते म्हणाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, उपाध्यक्ष नवीद मुश्रीफ, सक्षणा सलगर, शीतल फराकटे, प्रवीणसिंह पाटील, वसंतराव धुरे, युवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, शरद पवार यांच्यावर निस्सीम प्रेम करणारा कागल मतदारसंघ आहे. त्यांच्या सभेसाठी पंचवीस हजार लोक हजर राहतील. या संवाद सभेत भय्या माने, मनीषा पाटील, सुकुमार शिंदे, शिवाजी पाटील, विजय सातवेकर, मदन पलंगे, अरूण व्हरांबळे, सचिन गुरव, वृषाली पाटील, सागर कोळी, सुनील भिऊगंडे, तोडकर आदींनी सूचना केल्या. संजय चितारी यांनी स्वागत केले. तालुकाध्यक्ष विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर प्रवीण काळबर यांनी आभार मानले.

कागलची सभा लकी

मंत्री जयंत पाटील म्हणाले की, गेल्या चार - पाच विधानसभा निवडणुकीत मी मंत्री मुश्रीफांच्या प्रचाराची सांगता करतो. ही सभा केली की, माझाही विजय पक्का होतो. आताही राज्यातील या संवाद यात्रेची शेवटची सभा कागलात करीत आहे. यामुळे ज्या उद्देशाने ही यात्रा काढली, तो उद्देश म्हणजे २०२४मध्ये राज्यात राष्ट्रवादी प्रथम क्रमांकाचा पक्ष बनणार, हे आता निश्चित झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफBJPभाजपाJayant Patilजयंत पाटील