शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

बिद्री साखर कारखान्याने दूषित पाणी रोखावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:52 IST

सरवडे : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यातील मळीमिश्रित पाणी दूधगंगा नदीत मिसळल्याने नदीकाठावरील नागरिकांचे ...

सरवडे : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यातील मळीमिश्रित पाणी दूधगंगा नदीत मिसळल्याने नदीकाठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काठावरील शेकडो गावांतील हजारो नागरिक आजारी पडले आहेत. याबाबत प्रशासनाला यापूर्वी निवेदन दिले होते. पण कारखाना प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नाही. यामुळे बिद्री परिसरातील सरपंच व पदाधिकारी संघटनेने शुक्रवारी पुन्हा कारखान्याच्या प्रशासनाला निवेदन दिले व दूषित पाणी लवकरात लवकर रोखले नाही, तर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा नदीकाठच्या गावांतील लोकांनी दिला.

याबाबत माहिती अशी, गेल्या पंधरा दिवसांपासून बिद्री साखर कारखान्यातील मळीमिश्रित पाणी दूधगंगा नदीत सोडण्यात येते. मळी नदीत मिसळल्याने नदीकाठावरील जवळजवळ पन्नास ते साठ गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काठावरील शेकडो गावांतील हजारो नागरिक गॅस्ट्रोने आजारी पडलेत. पाण्याला सुटलेल्या दुर्गंधीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिद्री, वाळवे खुर्द, कसबा वाळवा, कासारवाडा, चंद्रे, चांदेकरवाडी, पालकरवाडी, सोनाळी, बेळवळे खुर्द, बेलवळे बु., केबळी, बाचणी, पालकरवाडी आदी प्रमुख गावांतील शेकडो नागरिक यामुळे आजारी पडलेत. यामुळे कारखान्याने नदीत मिसळणारे दूषित पाणी रोखावे, या मागणीसाठी दूधगंगा नदीकाठावरील शेकडो प्रमुख लोकप्रतिनिधींनी कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांना जाब विचारला. यापुढे नदीतील दूषित पाणी रोखले नाही, तर कारखाना बंद पाडण्याचा इशारा बिद्री नदीकाठावरील लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे दिला.

यावेळी शिष्टमंडळाचे प्रमुख संभाजी ब्रिगेडचे विभागप्रमुख बाळासाहेब पाटील म्हणाले, दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बगॅस व कार्बनमुळे बिद्री परिसरात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे.

संचालक आर. डी. देसाई म्हणाले, नदीत मिसळणाऱ्या दूषित पाण्याबाबत गंभीर दखल घेतली जाईल.

या शिष्टमंडळात बाळासाहेब पाटील, पं. स. सदस्य जयदीप पोवार, पोपटराव ढवण, सचिन आबदार, सिकंदर मुल्लानी, रमेश घारे, बापूसाहेब किल्लेदार. विक्रम घारे, नारायण पाटील, डॉ. प्रदीप पाटील, सुजित खामकर, श्रीकांत पाटील, दिगंबर पाटील, शंकर पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते. ..

.

फोटो

बिद्रीस दूषित पाण्यासंदर्भाचे निवेदन कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांना देताना बाळासाहेब पाटील, सचिन आबदार.