शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

"बिद्री" सुरू करण्यासाठी कामगारांचा संचालक मंडळाला घेराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 16:05 IST

बिद्री साखर कारखाना ऊस दराबरोबर सर्व कारभारात राज्यात अव्वल असताना शिवाय, कोणाचीही देणी थकीत नसताना असा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ चालू होणे गरजेचे आहे.

सरवडे - बिद्री साखर कारखाना ऊस दराबरोबर सर्व कारभारात राज्यात अव्वल असताना शिवाय, कोणाचीही देणी थकीत नसताना असा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ चालू होणे गरजेचे आहे. मात्र शेतकरी संघटनेच्या निर्णयाचा या कारखान्याला फटका सहन करावा लागणार आहे. कारखाना अपेक्षित दर देणार असतानाही अशा कारखान्याचे कामकाज बंद ठेवणे सभासद व ऊस उत्पादकांना अर्थिक संकटात टाकणारे ठरणार आहे. यासाठी हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू केलाच पाहीजे, अन्यथा कार्यकारी संचालकांना घेवून कारखान्याचे कामकाज मंगळवारपासून आम्ही सुरू करू असा इशारा बिद्रीच्या कामगारांनी देत संचालक मंडळाला घेराव घातला आहे. कारखाना सुरू करण्याचे आश्वासन मिळेपर्यंत हा घेराव कायम ठेवून कामगारांनी "सुरू करा, सुरू करा बिद्री कारखाना सुरू करा" अशा घोषणाबाजीने कारखान्याचे सभागृह दणाणून सोडले. अध्यक्ष के. पी. पाटील यांनी कामगारांच्या भावना समजून घेतल्या. मात्र कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

बाळासाहेब फराकटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी अतिवृष्टीमुळे ऊस पिकाच्या उत्पन्नात घट झाली असून रिकव्हरी व वजनातही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या विभागात शंभर गुऱ्हाळे सुरू आहेत. तर कार्यक्षेत्रातील ऊस अन्य कारखान्यांना आमच्याच कारखान्याच्या गेटवरुन जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या सर्वाचा परिणामही बिद्री कारखान्याच्या आर्थिक घडीवर होणार आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेने चांगला चाललेल्या बिद्री साखर कारखाना बंद करण्याचा अट्टहास सोडावा. संचालक मंडळाने याचा गांभिर्याने विचार करावा अन्यथा कामगार स्वत: च्या जबाबदारीवर कारखाना सुरू केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.   ऊस वाहतूक संघटनेचे नेते वसंतराव शिंदे म्हणाले, बिद्रीने ऊस उत्पादकांबरोबर कंत्राटदार व कामगार यांची देणी भागवली आहेत. तर दिवाळीला सुमारे 8 कोटी मागील देणे कारखान्याने दिले आहे. तसेच सातत्याने एफआरपीपेक्षाही अधिक दर दिला आहे. असे असताना बिद्रीवरच आंदोलन करणे चुकीचे आहे. अन्य कारखाने सुरू आहेत. बिद्रीच्या बहुतांशी टोळ्या कारखाना कार्यक्षेत्रात येऊन अनेक दिवस झाले, मात्र हा कारखाना सुरू नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. आणखीन काही दिवस ही परिस्थिती अशीच राहिली तर टोळ्या अन्य कारखान्यांकडे जाण्याची शक्यता आहे. याचा एकूण परिणाम कारखान्याच्या एकूण कारभारावर होवू शकतो. म्हणून कारखाना सुरू होणे गरजेचे आहे. यावेळी अमर पाटील, जगन्नाथ पुजारी, वसंत कोंडेकर, सुनिल पिराले अशोक पाटील आदी कामगारांनी आक्रमकपणे आपल्या व्यथा मांडल्या.  या सभागृहात अध्यक्ष के. पी. पाटील, उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक गणपतराव फराकटे, धोंडीराम मगदूम, उमेश भोईटे, युवराज वारके, कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांच्यासह कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर