शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

"बिद्री" सुरू करण्यासाठी कामगारांचा संचालक मंडळाला घेराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 16:05 IST

बिद्री साखर कारखाना ऊस दराबरोबर सर्व कारभारात राज्यात अव्वल असताना शिवाय, कोणाचीही देणी थकीत नसताना असा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ चालू होणे गरजेचे आहे.

सरवडे - बिद्री साखर कारखाना ऊस दराबरोबर सर्व कारभारात राज्यात अव्वल असताना शिवाय, कोणाचीही देणी थकीत नसताना असा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ चालू होणे गरजेचे आहे. मात्र शेतकरी संघटनेच्या निर्णयाचा या कारखान्याला फटका सहन करावा लागणार आहे. कारखाना अपेक्षित दर देणार असतानाही अशा कारखान्याचे कामकाज बंद ठेवणे सभासद व ऊस उत्पादकांना अर्थिक संकटात टाकणारे ठरणार आहे. यासाठी हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू केलाच पाहीजे, अन्यथा कार्यकारी संचालकांना घेवून कारखान्याचे कामकाज मंगळवारपासून आम्ही सुरू करू असा इशारा बिद्रीच्या कामगारांनी देत संचालक मंडळाला घेराव घातला आहे. कारखाना सुरू करण्याचे आश्वासन मिळेपर्यंत हा घेराव कायम ठेवून कामगारांनी "सुरू करा, सुरू करा बिद्री कारखाना सुरू करा" अशा घोषणाबाजीने कारखान्याचे सभागृह दणाणून सोडले. अध्यक्ष के. पी. पाटील यांनी कामगारांच्या भावना समजून घेतल्या. मात्र कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

बाळासाहेब फराकटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी अतिवृष्टीमुळे ऊस पिकाच्या उत्पन्नात घट झाली असून रिकव्हरी व वजनातही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या विभागात शंभर गुऱ्हाळे सुरू आहेत. तर कार्यक्षेत्रातील ऊस अन्य कारखान्यांना आमच्याच कारखान्याच्या गेटवरुन जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या सर्वाचा परिणामही बिद्री कारखान्याच्या आर्थिक घडीवर होणार आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेने चांगला चाललेल्या बिद्री साखर कारखाना बंद करण्याचा अट्टहास सोडावा. संचालक मंडळाने याचा गांभिर्याने विचार करावा अन्यथा कामगार स्वत: च्या जबाबदारीवर कारखाना सुरू केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.   ऊस वाहतूक संघटनेचे नेते वसंतराव शिंदे म्हणाले, बिद्रीने ऊस उत्पादकांबरोबर कंत्राटदार व कामगार यांची देणी भागवली आहेत. तर दिवाळीला सुमारे 8 कोटी मागील देणे कारखान्याने दिले आहे. तसेच सातत्याने एफआरपीपेक्षाही अधिक दर दिला आहे. असे असताना बिद्रीवरच आंदोलन करणे चुकीचे आहे. अन्य कारखाने सुरू आहेत. बिद्रीच्या बहुतांशी टोळ्या कारखाना कार्यक्षेत्रात येऊन अनेक दिवस झाले, मात्र हा कारखाना सुरू नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. आणखीन काही दिवस ही परिस्थिती अशीच राहिली तर टोळ्या अन्य कारखान्यांकडे जाण्याची शक्यता आहे. याचा एकूण परिणाम कारखान्याच्या एकूण कारभारावर होवू शकतो. म्हणून कारखाना सुरू होणे गरजेचे आहे. यावेळी अमर पाटील, जगन्नाथ पुजारी, वसंत कोंडेकर, सुनिल पिराले अशोक पाटील आदी कामगारांनी आक्रमकपणे आपल्या व्यथा मांडल्या.  या सभागृहात अध्यक्ष के. पी. पाटील, उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक गणपतराव फराकटे, धोंडीराम मगदूम, उमेश भोईटे, युवराज वारके, कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांच्यासह कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर