शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

"बिद्री" सुरू करण्यासाठी कामगारांचा संचालक मंडळाला घेराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 16:05 IST

बिद्री साखर कारखाना ऊस दराबरोबर सर्व कारभारात राज्यात अव्वल असताना शिवाय, कोणाचीही देणी थकीत नसताना असा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ चालू होणे गरजेचे आहे.

सरवडे - बिद्री साखर कारखाना ऊस दराबरोबर सर्व कारभारात राज्यात अव्वल असताना शिवाय, कोणाचीही देणी थकीत नसताना असा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ चालू होणे गरजेचे आहे. मात्र शेतकरी संघटनेच्या निर्णयाचा या कारखान्याला फटका सहन करावा लागणार आहे. कारखाना अपेक्षित दर देणार असतानाही अशा कारखान्याचे कामकाज बंद ठेवणे सभासद व ऊस उत्पादकांना अर्थिक संकटात टाकणारे ठरणार आहे. यासाठी हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू केलाच पाहीजे, अन्यथा कार्यकारी संचालकांना घेवून कारखान्याचे कामकाज मंगळवारपासून आम्ही सुरू करू असा इशारा बिद्रीच्या कामगारांनी देत संचालक मंडळाला घेराव घातला आहे. कारखाना सुरू करण्याचे आश्वासन मिळेपर्यंत हा घेराव कायम ठेवून कामगारांनी "सुरू करा, सुरू करा बिद्री कारखाना सुरू करा" अशा घोषणाबाजीने कारखान्याचे सभागृह दणाणून सोडले. अध्यक्ष के. पी. पाटील यांनी कामगारांच्या भावना समजून घेतल्या. मात्र कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

बाळासाहेब फराकटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी अतिवृष्टीमुळे ऊस पिकाच्या उत्पन्नात घट झाली असून रिकव्हरी व वजनातही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या विभागात शंभर गुऱ्हाळे सुरू आहेत. तर कार्यक्षेत्रातील ऊस अन्य कारखान्यांना आमच्याच कारखान्याच्या गेटवरुन जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या सर्वाचा परिणामही बिद्री कारखान्याच्या आर्थिक घडीवर होणार आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेने चांगला चाललेल्या बिद्री साखर कारखाना बंद करण्याचा अट्टहास सोडावा. संचालक मंडळाने याचा गांभिर्याने विचार करावा अन्यथा कामगार स्वत: च्या जबाबदारीवर कारखाना सुरू केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.   ऊस वाहतूक संघटनेचे नेते वसंतराव शिंदे म्हणाले, बिद्रीने ऊस उत्पादकांबरोबर कंत्राटदार व कामगार यांची देणी भागवली आहेत. तर दिवाळीला सुमारे 8 कोटी मागील देणे कारखान्याने दिले आहे. तसेच सातत्याने एफआरपीपेक्षाही अधिक दर दिला आहे. असे असताना बिद्रीवरच आंदोलन करणे चुकीचे आहे. अन्य कारखाने सुरू आहेत. बिद्रीच्या बहुतांशी टोळ्या कारखाना कार्यक्षेत्रात येऊन अनेक दिवस झाले, मात्र हा कारखाना सुरू नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. आणखीन काही दिवस ही परिस्थिती अशीच राहिली तर टोळ्या अन्य कारखान्यांकडे जाण्याची शक्यता आहे. याचा एकूण परिणाम कारखान्याच्या एकूण कारभारावर होवू शकतो. म्हणून कारखाना सुरू होणे गरजेचे आहे. यावेळी अमर पाटील, जगन्नाथ पुजारी, वसंत कोंडेकर, सुनिल पिराले अशोक पाटील आदी कामगारांनी आक्रमकपणे आपल्या व्यथा मांडल्या.  या सभागृहात अध्यक्ष के. पी. पाटील, उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक गणपतराव फराकटे, धोंडीराम मगदूम, उमेश भोईटे, युवराज वारके, कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांच्यासह कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर