शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

kolhapur: भोगावती कारखान्याच्या निवडणुकीस अखेर स्थगिती; राज्यातील सर्वच निवडणुका लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 12:29 IST

लोकमत’ने २१ जूनलाच ही निवडणूक स्थगित होणार असल्याचे वृत्त दिले होते

भोगावती : राज्याच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने पावसाळा आणि खरीप हंगाम सुरू झाल्याने राज्यातील सर्व निवडणुका बुधवारी, दि.३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या. त्यामुळे परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याची निवडणूकही लांबणीवर गेली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन छाननी होण्याअगोदर निवडणूक कार्यक्रम स्थगित झाला. आता पावसाळ्यानंतर याच टप्प्यापासून निवडणूक कार्यक्रम सुरू होऊन मतदान होण्याची शक्यता आहे. ‘लोकमत’ने २१ जूनलाच ही निवडणूक स्थगित होणार असल्याचे वृत्त दिले होते.भोगावती कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम २० जूनपासून सुरू झाला आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत २७ जूनपर्यंत होती. संचालक मंडळाच्या २५ जागांसाठी ४८८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आज गुरुवारी छाननी, १४ जुलैपर्यंत माघार आणि ३० जुलैला मतदान होणार होते. खरेतर पावसाळ्याचे कारण देऊन राज्य शासनाने भोगावतीच्या सीमेवर असलेल्या बिद्री कारखान्याची निवडणूक लांबणीवर टाकली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हाच त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले होते. बिद्री कारखाना निवडणूक लांबणीवर ढकलण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात गेला आहे. त्याची सुनावणी सोमवारी (दि.३ जुलै) होणार आहे. तोपर्यंत शासनाने सगळ्याच निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आता कारखान्याचा साखर हंगाम, लोकसभेची रणधुमाळी व त्यातच कारखान्याची निवडणूक होणार आहे.

  • राज्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्था : ८२ हजार ६३१
  • मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या संस्था : ४९ हजार ३३३
  • अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध संस्था : ४८ हजार ६६७
  • निवडणूक प्रक्रिया पूर्ण : ४२ हजार १५७
  • निवडणूक प्रक्रिया सुरू : ६ हजार ५१०

सहकार विभागाच्या आदेशानुसार भोगावती कारखान्याचा गुरुवार (दि.२९ जून)पासूनचा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला. त्यामुळे छाननी प्रक्रिया होणार नाही. नवीन सुधारित निवडणूक कार्यक्रम ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध होईल. त्यानुसार पुढील निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल. -नीळकंठ करे, निवडणूक निर्णय अधिकारी भोगावती सहकारी साखर कारखाना परिते (ता. करवीर) 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक