शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

अमित शाह केंद्रीय गृहमंत्री की पुजारी?; शरद पवारांचा टोला, उद्धव ठाकरेंचीही घेतली बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 07:40 IST

महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र असल्याचाही केला दावा

कोल्हापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला सर्वसामान्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे देशभरात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकत्र येण्यासाठी या यात्रेची मदत होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ते कोल्हापूरमध्ये रविवारी सकाळी पत्रकारांशी बोलत होते.

पवार म्हणाले, भारत जोडो यात्रेवरही टीका झाली परंतु राहुल गांधींची यात्रा केवळ काँग्रेसपुरती राहिली नाही. महाराष्ट्रात जयंत पाटील, सुप्रिया सुळे त्यात सहभागी झाले. गांधी विचार मानणाऱ्या संस्था, संघटनाही सहभागी झाल्या. सामान्यांनी या पदयात्रेला चांगला प्रतिसाद दिल्याने भाजपने त्यांच्याविषयी केलेल्या दूषित वातावरणाला चांगले उत्तर मिळाले.

राज्यातील आरोप-प्रत्यारोपांचा दर्जा घसरला आहे. तो टाळण्यासाठी सुप्रिया सुळे या देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहेत. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, हे काही थांबणार नाही. परंतु, सत्तेवर आल्यानंतर पाय जमिनीवर हवेत. तुरूंगात घालीन, जामीन रद्द करतो ही राजकीय नेत्यांची भूमिका असू शकत नाही. कोणीही टोकाची भूमिका घेणे योग्य नाही.  

राज्यपालांविषयी नाखूशच

महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी आम्हीही नाखूश असून, उत्तम राज्यपालांची महाराष्ट्राला परंपरा होती. परंतु हे असे पहिले राज्यपाल आहेत की, ज्यांनी सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यांनी पदाची प्रतिष्ठा राखली नाही, अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली. 

पवार म्हणाले....

सीमाप्रश्नी उत्तम वकील देऊन सर्वोच्च न्यायालयात मजबूतपणे बाजू मांडण्याची गरज.जातनिहाय गणना व्हावी, ही आमचीही मागणी. नितीशकुमार यांचे याबद्दल अभिनंदन.सरकार पाडण्यासाठी संजय राऊत यांनी काही नियोजन केले का, याची माहिती घेतो.संभाजीराजे यांना स्वराज्यरक्षक म्हणण्यात काहीही चुकीचे नाही.महाविकास  आघाडीला रिपब्लिकन पक्षाच्या काही गटांसह इतरांना सोबत घेऊन निवडणुका लढविण्यात फारशी अडचण येणार नाही.

कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत 

जरी उद्धव ठाकरे यांच्यापासून काहीजण बाजूला गेले असले तरी कडवा, प्रत्यक्षात काम करणारा शिवसैनिक ठाकरे यांच्याबरोबरच असल्याचे माझे निरीक्षण आहे. याला कोल्हापूरही अपवाद नाही. त्यामुळे जे खासदार, आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आहेत, त्यांना येणाऱ्या निवडणुकांवेळी जनतेच्या भावना काय आहेत हे लक्षात येईल, असे पवार यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री की पुजारी?

राम मंदिर कधी बांधून पूर्ण होणार, हे पुजाऱ्यांनी सांगणे अपेक्षित असताना त्यांचे काम केंद्रीय गृहमंत्री करत आहेत, असा टोलाही पवार यांनी अमित शहा यांना लगावला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शाह