शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

‘सरस’ बनून दाखवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 20:31 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे १९६२ ला दिनकरराव यादव अध्यक्ष झाले. तेव्हा बाळासाहेब माने उपाध्यक्ष, तर सदाशिवराव मंडलिक हे बांधकाम सभापती होते. पुढे यादव हे शिरोळ मतदारसंघातून आमदार झाले; तर माने पाचवेळा व मंडलिक चारवेळा खासदार झाले. याच मंडलिक व माने यांचे वारसदार म्हणून संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्यावर कोल्हापूरच्या

ठळक मुद्देकोल्हापूरचे समाजमन असे आहे की ते एखाद्याला आवडले तर जेवढ्या ताकदीने खांद्यावर उचलून घेते तेवढ्याच ताकदीने ते खाली आपटते. संसदेतील छाप आणि विकास या दोन्ही पातळ्यांवर ‘सरस’ ठरून दाखवा...

-विश्वास पाटीलकोल्हापूर जिल्हा परिषदेचे १९६२ ला दिनकरराव यादव अध्यक्ष झाले. तेव्हा बाळासाहेब माने उपाध्यक्ष, तर सदाशिवराव मंडलिक हे बांधकाम सभापती होते. पुढे यादव हे शिरोळ मतदारसंघातून आमदार झाले; तर माने पाचवेळा व मंडलिक चारवेळा खासदार झाले. याच मंडलिक व माने यांचे वारसदार म्हणून संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्यावर कोल्हापूरच्या जनतेने खासदार म्हणून मोठा विश्वास दाखवला आहे. हा कर्तृत्वाचा वारसा पुढे नेण्याचे आव्हान या दोघांसमोर आहे.

दिवंगत मंडलिक हे बंडखोर वृत्तीचे होते. ‘कायम लोकांत राहणारा माणूस’ अशी त्यांची ओळख व तीच त्यांची ताकद होती. मी एक बातमीदार म्हणून वीस वर्षांत त्यांना कधी फोन केला व त्यांनी तो घेतला नाही असा अनुभव नाही. संजय मंडलिक यांच्यावर मात्र ‘नॉट रिचेबल’ अशी टीका प्रचारात झाली. सगळ्यांत अगोदर त्यांना ही प्रतिमा पुसून काढावी लागेल. दिवंगत मंडलिक यांचा ऊसदरापासून विकासाच्या प्रश्नांपर्यंत अभ्यास व स्वत:चे एक ‘अंडरस्टँडिंग’ होते. प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात ते पुढे असत. ते सतत वृत्तपत्रांतील बातम्यांच्या केंद्रस्थानी राहिले. संजय मंडलिक यांना मात्र सतत प्रसिद्धीत राहण्याची सवय नाही. त्यांचा स्वभावही संयमी आहे. कानांत बोलणाऱ्यांचा त्यांना तिटकारा आहे. बाळासाहेब माने प्रशासनात वाकबगार होते. कट्टर बहुजननिष्ठ म्हणून त्यांची प्रतिमा होती. ते फर्डे वक्ते होते. त्यामुळे त्यांना लोक गमतीने ‘माने एक्सप्रेस’ म्हणायचे. धैर्यशील यांच्याकडेही हा गुण आहे. संजय मंडलिक व धैर्यशील यांच्या विजयांत त्यांची स्वत:ची प्रतिमा, वाडवडिलांची पुण्याई आणि प्रचलित राजकारणातील मोदी त्सुनामीचा फायदा झाला.

आता त्यांच्या पक्षाचेच सरकार केंद्रात सत्तेत येत आहे, त्यामुळे सबब सांगायलाही लोकांनी जागा ठेवलेली नाही. दिवंगत मंडलिक व माने यांच्यावेळचा काळ वेगळा होता. त्यावेळी विरोधी पक्ष एवढा आक्रमक नव्हता. सोशल मीडियाचा वॉच नव्हता. हिशोब मागणारा समाज नव्हता. त्यामुळे नव्या खासदारांसमोरील आव्हाने मोठी आहेत. गेल्या पाच वर्षांत कोल्हापूरला पुढे नेऊ शकेल असा एकही प्रश्न सुटलेला नाही. पंचगंगा प्रदूषणापासून कोकण रेल्वेपर्यंत अनेक प्रश्र्न रखडले आहेत. अंबाबाई विकास आराखडा कागदावर आहे. इचलकरंजीच्या पाणीप्रश्र्नाचा चक्रव्यूह तयार झाला आहे. या सगळ््या प्रश्र्नांना हे तरुण खासदार किती ताकदीने भिडतात यावरच त्यांच्या नेतृत्वाची छाप पडणार आहे. ज्यांचा पराभव झाला आहे, ते नव्या लढाईसाठी आजपासूनच शड्डू मारून तयार आहेत. त्यामुळे तुमच्या प्रत्येक गोष्टीची त्यांच्याशी तुलना होणार आहे आणि कोल्हापूरचे समाजमन असे आहे की ते एखाद्याला आवडले तर जेवढ्या ताकदीने खांद्यावर उचलून घेते तेवढ्याच ताकदीने ते खाली आपटते.

मोठ्या मताधिक्क्याने समाजमनाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत त्याचे ओझे कोल्हापूरला विकासाच्या मार्गावर नेऊन तुम्हांला पेलावेच लागेल. शाहू महाराजांच्या पुण्याईवर कोल्हापूर समृद्ध झाले आहे. आता त्याला आणखी पुढे न्यायचे झाल्यास एखादी हेवी इंडस्ट्री येण्याची गरज आहे. संसदेतील छाप आणि विकास या दोन्ही पातळ्यांवर ‘सरस’ ठरून दाखवा...

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालPoliticsराजकारणkolhapurकोल्हापूर