शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

खेबवडेच्या तरुणाचे अपहरण करुन बेदम मारहाण; विट्टभट्टी कामगारांच्या ठेक्यावरुन वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 13:11 IST

विटभट्टी कामगारांच्या ठेक्याच्या वादातून खेबवडे (ता. करवीर) येथील तरुणाला बोलवून घेत अपहरण करुन त्याला बेदम मारहाण केली.

कोल्हापूर: विटभट्टी कामगारांच्या ठेक्याच्या वादातून खेबवडे (ता. करवीर) येथील तरुणाला बोलवून घेत अपहरण करुन त्याला बेदम मारहाण केली. सागर सुरेश गायकवाड (वय ३०) असे जखमीचे नाव आहे. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडला. बेनिंग्रेच्या सहा जणांच्या टोळक्याने ही मारहाण केल्याचे जखमी सागरने कागल पोलीसांना सांगितले. संशयित सागर व इतर पाच अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी सांगितले की, सागर गायकवाड हा शेती करतो. खेबवडे गावात त्याचा विटभट्टी व्यवसाय आहे. रविवारी दूपारी तो शेतात पाणी पाजत होता. यावेळी त्याचे मोबाईलवर सागर नावाच्या व्यक्तिचा फोन आला. तुम्हाला मी ओळखतो, महत्वाचे काम आहे, तुम्ही कागलमध्ये येवून भेटा असा निरोप आल्याने सागर मेव्हणा विरकुमार भिकाजी पाटील यांची दूचाकी घेवून गेला. कागल नाका येथील एका हॉटेलच्या दारात आलेनंतर संशयित याठिकाणी दूचाकीवरुन थांबून होते. त्यांनी सागर गायकवाड याला तुमच्या विटभट्टीवरील कामगार कुठे आहेत. त्याने साहित्य ठेवून बाजार आनण्यासाठी ते कागलला गेले असल्याचे सांगितले.

आमचे कामगार तू का घेतले म्हणून शिवीगाळ करुन त्याला मारहाण केली. तेथून त्याला दूचाकीवरुन व्हन्नुर माळावर, यळगुड, निपाणी आदी ठिकाणी नेवून काठीने बेदम मारहाण केली. मध्यरात्री दोनपर्यंत त्याला फिरवीत होते. कर्नाटक सीमा भागात लघुशंकेला आले म्हणून सागरने संशयितांच्या हातातून सुटका करीत ऊसातून पळ काढला. चालत तो निपाणी येथील बहिणीच्या घरी आला. तेथून भाऊ प्रतापला फोन करुन बोलवून घेतले. त्यानंतर सोमवारी पहाटे त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मारहाण इतकी जोरात केली आहे की, सागरच्या अंगावरील कातडे निघून गंभीर जखमा झाल्या आहेत. 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर