शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

आनंदी मनाने परीक्षेला सामोरे जावा

By admin | Updated: February 20, 2017 00:19 IST

सुरेंद्र सिंग : ‘लोकमत’ व ‘महेश ट्युटोरियल लक्ष्य’तर्फे दहावी-बारावीच्या विद्यार्थी, पालकांसाठी सेमिनार

कोल्हापूर : दहावी-बारावीच्या मुलांनी वेळेचे योग्य नियोजन करून निकालाचे टेन्शन न घेता उरलेल्या दिवसांत अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे व आनंदी मनाने परीक्षेला जावे. त्यामुळे मनावरील दडपण कमी तर होईलच तर उज्ज्वल यशही मिळेल, असे प्रतिपादन ‘महेश ट्युटोरियल लक्ष्य’चे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख डॉ. सुरेंद्र सिंग यांनी शनिवारी केले. या कार्यक्रमाचे प्रायोजक रोबोमेट प्लस हे होते. यावेळी दहावी-बारावीचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. सिंग हे लोकमत व महेश ट्युरोरियल लक्ष्यतर्फे दहावी-बारावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित मार्गदर्शन सेमिनारमध्ये बोलत होते. ‘लोकमत’चे संस्थापक- संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी ‘लोकमत’चे मनुष्यबळ व प्रशासन विभागाचे उपव्यवस्थापक संतोष साखरे, महेश ट्युटोरियल लक्ष्यचे प्रा. नरेश रेड्डी, संदीप गोसावी, संजय कुंभार, शंकर पणशीकर, कल्याणी साकलकल्ले, प्रा. विनोद पोरे, गजानन वेरुळकर, प्रीती पाटील उपस्थित होते.डॉ. सिंग म्हणाले, परीक्षा म्हटले की टेन्शन हे येतेच; परंतु त्याचा परिणाम आपल्या निकालावर होऊ शकतो. त्यामुळे शक्य तितके आनंदी राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवे. सुरुवातीलाच अभ्यासाचे आणि वेळेचे योग्य नियोजन करायला हवे. कोणत्या विषयाला, प्रकरणाला किती वेळ द्यावयाचा त्याचे अचूक नियोजन करून आत्तापासून अभ्यास करायला हवा. आत्मविश्वास वाढविण्यासाठी मागील परीक्षांचे पेपर सोडविणे फायदेशीर ठरते. संकटांना घाबरून पळ न काढता त्यांना आव्हान समजून मात करण्यासाठी सज्ज राहायला हवे. उरलेल्या दिवसाचे योग्य नियोजन करून टप्प्याटप्प्याने अभ्यास करा.विद्यार्थी व पालकांच्या नात्याविषयी बोलताना डॉ. सिंग म्हणाले, ‘पालकांनीही मुलांना समजून घ्यायला हवे. त्यांनी आत्मविश्वास कसा वाढेल, याकडे लक्ष द्यावे. त्यांच्यावर दडपण येईल असे वागू नये. आजूबाजूचे लोक काय म्हणतात याकडे लक्ष न देता आपल्या मुलांना आहे तसे स्वीकारा. त्यांचा क्षमता लक्षात घेऊन सकारात्मक विचार केल्यास अनेक प्रश्नांवर आपोआप उत्तरे मिळत जातील. मुलांनीही पालकांप्रती कृतज्ञतेचा दृष्टिकोन ठेवून वागावे. त्यांचा त्याग लक्षात घ्यावा. अभ्यास करणे ही आपली जबाबदारी आहे, हे लक्षात ठेवून अभ्यास करा. यशोशिखर गाठताना नकारात्मक गोष्टी सकारात्मकतेत कशा परावर्र्तित होतील, याकडे अधिक लक्ष द्यावे. परीक्षाकाळात आहारावर लक्ष द्यावे. आहारात घरगुती सात्त्विक जेवण व फळांचा समावेश असावा. दरम्यान, यावेळी रोबोमेट प्लस या सॉफ्टवेअरमुळे अभ्यासात कशी मदत होते याची माहिती व्हिडिओद्वारे दाखविण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना मोफत रोबोमेट प्लस मार्गदर्शन व्याख्यान व बोर्डाच्या परीक्षेसाठी सराव प्रश्नपत्रिका देण्यात आल्या.‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी प्रास्ताविकात सेमिनारच्या आयोजनामागील उदेश सांगितला. विद्यार्थी हा घटक महत्त्वाचा असून, ’लोकमत’तर्फे दरवर्षी त्यांच्यासाठी मार्गदर्शनासह विविध उपक्रम आयोजित केले जातात. प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले.