शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

आनंदी मनाने परीक्षेला सामोरे जावा

By admin | Updated: February 20, 2017 00:19 IST

सुरेंद्र सिंग : ‘लोकमत’ व ‘महेश ट्युटोरियल लक्ष्य’तर्फे दहावी-बारावीच्या विद्यार्थी, पालकांसाठी सेमिनार

कोल्हापूर : दहावी-बारावीच्या मुलांनी वेळेचे योग्य नियोजन करून निकालाचे टेन्शन न घेता उरलेल्या दिवसांत अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे व आनंदी मनाने परीक्षेला जावे. त्यामुळे मनावरील दडपण कमी तर होईलच तर उज्ज्वल यशही मिळेल, असे प्रतिपादन ‘महेश ट्युटोरियल लक्ष्य’चे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख डॉ. सुरेंद्र सिंग यांनी शनिवारी केले. या कार्यक्रमाचे प्रायोजक रोबोमेट प्लस हे होते. यावेळी दहावी-बारावीचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. सिंग हे लोकमत व महेश ट्युरोरियल लक्ष्यतर्फे दहावी-बारावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित मार्गदर्शन सेमिनारमध्ये बोलत होते. ‘लोकमत’चे संस्थापक- संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी ‘लोकमत’चे मनुष्यबळ व प्रशासन विभागाचे उपव्यवस्थापक संतोष साखरे, महेश ट्युटोरियल लक्ष्यचे प्रा. नरेश रेड्डी, संदीप गोसावी, संजय कुंभार, शंकर पणशीकर, कल्याणी साकलकल्ले, प्रा. विनोद पोरे, गजानन वेरुळकर, प्रीती पाटील उपस्थित होते.डॉ. सिंग म्हणाले, परीक्षा म्हटले की टेन्शन हे येतेच; परंतु त्याचा परिणाम आपल्या निकालावर होऊ शकतो. त्यामुळे शक्य तितके आनंदी राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवे. सुरुवातीलाच अभ्यासाचे आणि वेळेचे योग्य नियोजन करायला हवे. कोणत्या विषयाला, प्रकरणाला किती वेळ द्यावयाचा त्याचे अचूक नियोजन करून आत्तापासून अभ्यास करायला हवा. आत्मविश्वास वाढविण्यासाठी मागील परीक्षांचे पेपर सोडविणे फायदेशीर ठरते. संकटांना घाबरून पळ न काढता त्यांना आव्हान समजून मात करण्यासाठी सज्ज राहायला हवे. उरलेल्या दिवसाचे योग्य नियोजन करून टप्प्याटप्प्याने अभ्यास करा.विद्यार्थी व पालकांच्या नात्याविषयी बोलताना डॉ. सिंग म्हणाले, ‘पालकांनीही मुलांना समजून घ्यायला हवे. त्यांनी आत्मविश्वास कसा वाढेल, याकडे लक्ष द्यावे. त्यांच्यावर दडपण येईल असे वागू नये. आजूबाजूचे लोक काय म्हणतात याकडे लक्ष न देता आपल्या मुलांना आहे तसे स्वीकारा. त्यांचा क्षमता लक्षात घेऊन सकारात्मक विचार केल्यास अनेक प्रश्नांवर आपोआप उत्तरे मिळत जातील. मुलांनीही पालकांप्रती कृतज्ञतेचा दृष्टिकोन ठेवून वागावे. त्यांचा त्याग लक्षात घ्यावा. अभ्यास करणे ही आपली जबाबदारी आहे, हे लक्षात ठेवून अभ्यास करा. यशोशिखर गाठताना नकारात्मक गोष्टी सकारात्मकतेत कशा परावर्र्तित होतील, याकडे अधिक लक्ष द्यावे. परीक्षाकाळात आहारावर लक्ष द्यावे. आहारात घरगुती सात्त्विक जेवण व फळांचा समावेश असावा. दरम्यान, यावेळी रोबोमेट प्लस या सॉफ्टवेअरमुळे अभ्यासात कशी मदत होते याची माहिती व्हिडिओद्वारे दाखविण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना मोफत रोबोमेट प्लस मार्गदर्शन व्याख्यान व बोर्डाच्या परीक्षेसाठी सराव प्रश्नपत्रिका देण्यात आल्या.‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी प्रास्ताविकात सेमिनारच्या आयोजनामागील उदेश सांगितला. विद्यार्थी हा घटक महत्त्वाचा असून, ’लोकमत’तर्फे दरवर्षी त्यांच्यासाठी मार्गदर्शनासह विविध उपक्रम आयोजित केले जातात. प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले.