शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

‘भोगावती’च्या कुरूक्षेत्रात अस्वित्वाची लढाई

By admin | Updated: April 15, 2017 17:11 IST

दोन्ही कॉँग्रेसमध्ये सत्तेसाठी धडपड : चरापलेंची एकाकी झुंज

आॅनलाईन लोकमतसुनील चौगले/आमजाई व्हरवडे, ता. राधानगरी, दि. १५: महाआघाडीत झालेली बिघाडी, भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन आक्रमकपणे रिंगणात उतरलेली कॉँग्रेस तर स्वताच्या गटाचे अस्तित्व सिध्द करण्यासाठी दोन्ही मातब्बरांसमोर शडडू ठोकलेल्या परिवर्तन आघाडी, या तिरंगी लढतीने ‘भोगावती’चे कुरूक्षेत्र चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ता अबाधीत राखण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे, तर कारखान्यासह करवीर व राधानगरीचे राजकारण आपल्या हातात घेण्यासाठी कॉँग्रेसची धडपड सुरू आहे. देशात अग्रेसर असणाऱ्या कारखाना सध्या अखेरची घटका मोजत आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकमेकावर आरोपप्रत्यारोप करत असले तरी कारखान्यांची या अवस्थेला कोण जबाबदार आहे, याची जाण ‘भोगावती’च्या सूज्ञ सभासदांना आहे. राष्ट्रवादीच्या काळात प्रशासक आले, त्यामुळे त्यांना एकसंधपणे निवडणूकीला सामोरे जाऊन पुन्हा सत्ता घेण्याची मोठी संधी होती. पण राधानगरी तालुक्यातील दोन नेत्यांतील अंतर्गत शीतयुध्दामुळे राष्ट्रवादीची पुरती वाताहात झाली. सर्वपक्षीय महाआघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न करत असताना ही आघाडीच आकारास येऊ नये, यासाठी एक यंत्रणा कार्यरत होती. ए. वाय. पाटील यांची नाराजी महाआघाडीला महागात पडू शकते. त्यांच्या गटाकडे किमान चार ते पाच हजार मते आहेत. राष्ट्रवादी एकसंधपणे सामोरे गेली असती तर कॉँग्रेससमोर अडचणी वाढल्या असत्या. या उलट कॉँग्रेसने राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू ठेवत आपले पॅनेल बांधणी केली. हळकुंडात नवरी मोडून (जागा वाटपात) पी. एन. पाटील यांनी काही अपवाद वगळता ताकदीचे पॅनेल बांधले. कॉँग्रेस मध्येही काही अलबेल होते असे नाही, पण पाटील यांनी बंडोबांना थंड करण्यात यश मिळवले. त्यात स्वता रिंगणात उतरल्याने पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठीची निवडणूक झाली आहे. सदाशिव चरापले यांनी परिवर्तन’च्या माध्यमातून दोन्ही कॉँग्रेसवर हल्ला चढविला आहे. पण त्यांची एकाकी झुंजीला सभासद कसा प्रतिसाद देतात यावरच निवडणूकीचे चित्र अवलंबून आहे. ‘पी.एन’यांच्या उमेदवारींने कार्यकर्त्यात संचार

पी. एन. पाटील यांनी यापुर्वी ‘भोगावती’चे नेतृत्व केले पण स्वता कधीच रिंगणात राहिले नाहीत. कारखान्याची आर्थिक परिस्थिती पाहता पाटील यांनीच उमेदवारी करावी, असा आग्रह कार्यकर्त्यांचा राहिला, त्याला पाटील यांनी मान दिल्याने कार्यकर्ते झपाटल्यासारखा प्रचारयंत्रणेत दिसत आहेत.विधानसभेची पायाभरणीआगामी विधानसभेची पायाभरणी म्हणून या निवडणूकीकडे पाहिले जाते. येथूनच सर्व राजकीय समीकरणे बदलणार आहेत.