शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

‘भोगावती’च्या कुरूक्षेत्रात अस्वित्वाची लढाई

By admin | Updated: April 15, 2017 17:11 IST

दोन्ही कॉँग्रेसमध्ये सत्तेसाठी धडपड : चरापलेंची एकाकी झुंज

आॅनलाईन लोकमतसुनील चौगले/आमजाई व्हरवडे, ता. राधानगरी, दि. १५: महाआघाडीत झालेली बिघाडी, भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन आक्रमकपणे रिंगणात उतरलेली कॉँग्रेस तर स्वताच्या गटाचे अस्तित्व सिध्द करण्यासाठी दोन्ही मातब्बरांसमोर शडडू ठोकलेल्या परिवर्तन आघाडी, या तिरंगी लढतीने ‘भोगावती’चे कुरूक्षेत्र चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ता अबाधीत राखण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे, तर कारखान्यासह करवीर व राधानगरीचे राजकारण आपल्या हातात घेण्यासाठी कॉँग्रेसची धडपड सुरू आहे. देशात अग्रेसर असणाऱ्या कारखाना सध्या अखेरची घटका मोजत आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकमेकावर आरोपप्रत्यारोप करत असले तरी कारखान्यांची या अवस्थेला कोण जबाबदार आहे, याची जाण ‘भोगावती’च्या सूज्ञ सभासदांना आहे. राष्ट्रवादीच्या काळात प्रशासक आले, त्यामुळे त्यांना एकसंधपणे निवडणूकीला सामोरे जाऊन पुन्हा सत्ता घेण्याची मोठी संधी होती. पण राधानगरी तालुक्यातील दोन नेत्यांतील अंतर्गत शीतयुध्दामुळे राष्ट्रवादीची पुरती वाताहात झाली. सर्वपक्षीय महाआघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न करत असताना ही आघाडीच आकारास येऊ नये, यासाठी एक यंत्रणा कार्यरत होती. ए. वाय. पाटील यांची नाराजी महाआघाडीला महागात पडू शकते. त्यांच्या गटाकडे किमान चार ते पाच हजार मते आहेत. राष्ट्रवादी एकसंधपणे सामोरे गेली असती तर कॉँग्रेससमोर अडचणी वाढल्या असत्या. या उलट कॉँग्रेसने राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू ठेवत आपले पॅनेल बांधणी केली. हळकुंडात नवरी मोडून (जागा वाटपात) पी. एन. पाटील यांनी काही अपवाद वगळता ताकदीचे पॅनेल बांधले. कॉँग्रेस मध्येही काही अलबेल होते असे नाही, पण पाटील यांनी बंडोबांना थंड करण्यात यश मिळवले. त्यात स्वता रिंगणात उतरल्याने पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठीची निवडणूक झाली आहे. सदाशिव चरापले यांनी परिवर्तन’च्या माध्यमातून दोन्ही कॉँग्रेसवर हल्ला चढविला आहे. पण त्यांची एकाकी झुंजीला सभासद कसा प्रतिसाद देतात यावरच निवडणूकीचे चित्र अवलंबून आहे. ‘पी.एन’यांच्या उमेदवारींने कार्यकर्त्यात संचार

पी. एन. पाटील यांनी यापुर्वी ‘भोगावती’चे नेतृत्व केले पण स्वता कधीच रिंगणात राहिले नाहीत. कारखान्याची आर्थिक परिस्थिती पाहता पाटील यांनीच उमेदवारी करावी, असा आग्रह कार्यकर्त्यांचा राहिला, त्याला पाटील यांनी मान दिल्याने कार्यकर्ते झपाटल्यासारखा प्रचारयंत्रणेत दिसत आहेत.विधानसभेची पायाभरणीआगामी विधानसभेची पायाभरणी म्हणून या निवडणूकीकडे पाहिले जाते. येथूनच सर्व राजकीय समीकरणे बदलणार आहेत.