शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
2
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
3
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
4
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
5
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
6
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
7
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
8
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
9
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
10
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
11
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
12
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
14
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
15
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
16
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
17
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
18
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
19
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...

बापरे.. या सर्वच अंगणवाड्या भरल्या चिमुकल्यांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 01:06 IST

मागणीही वाढू लागली आहे. आहार व धान्य मिळू लागल्याने साहजिकच त्याचा परिणाम पटसंख्या वाढण्यावर झाला आहे.

ठळक मुद्देपटसंख्येत मोठी वाढ : कच्चे धान्य, ताजा आहार आणि आकार अभ्यासक्रमाचा परिणाम

कोल्हापूर : सुकडीऐवजी मिळणारे धान्य, कडधान्य, गरम ताजा आहार आणि आकार अभ्यासक्रमाच्या माध्यमातून दिले जाणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण यामुळे जिल्ह्यातील अंगणवाड्या सध्या हाऊसफुल्ल होत आहेत. पटसंख्येत वाढ झाल्याने सध्याच्या अंगणवाड्यांची जागा अपुरी पडत आहे. दाटीवाटीने मुलांना बसविण्याची वेळ सेविका, मदतनिसांवर आली आहे.

जिल्ह्यात चार हजार ३६९ अंगणवाड्या आहेत. त्यापैकी ग्रामीण भागात तीन हजार ९९४, तर इचलकरंजी शहरात २00 आणि इतर नगरपालिका क्षेत्रात १७५ अशा अंगणवाड्या सध्या कार्यरत आहेत. या अंगणवाड्यामार्फत ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालके, किशोरवयीन मुली, गरोदर व स्तनदा माता यांना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत पोषण आहाराचा पुरवठा केला जातो.

सध्या या सर्व घटकांना शासनाकडून सुकडीसारख्या पॅकेट बंद आहाराचा पुरवठा बंद झाला आहे. त्याऐवजी धान्य, कडधान्य, तेल, डाळी मिळत आहेत. पोषणाबरोबरच तयार धान्य, तेल मिळत असल्याने अंगणवाड्यांमध्ये नोंदणी करण्याकडे कल वाढला आहे. तसेच बालकांसाठी गरम ताजा आहारही दिला जात आहे. नोंदणी केल्यानंतरच हा सर्व शिधा मिळत असल्याने आतापर्यंत या आहाराकडे पाठ फिरविणारेही आवर्जून नोंंदणीसाठी आग्रह धरू लागले आहेत. मागणीही वाढू लागली आहे. आहार व धान्य मिळू लागल्याने साहजिकच त्याचा परिणाम पटसंख्या वाढण्यावर झाला आहे.बालकांचा बुद्ध्यांक वाढलाअंगणवाड्यांमध्ये गर्दी वाढण्यामागे पोषण आहाराइतकेच तेथील गुणवत्तापूर्ण शिक्षणही कारणीभूत आहे. आकार हा अभ्यासक्रम मुलांच्या सर्वांगीण विकासाला फारच उपयुक्त ठरत असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे. प्ले स्कूल व नर्सरीमुळे पैसे खर्च करून दोन-तीन वर्षे घालविल्यानंतरही जितके शिक्षण त्या बालकांना मिळणार नाही, तितके श्क्षिण अंगणवाडीमध्ये एका वर्षभरात मिळत आहे. त्यामुळे मुलांचा बुद्धांकही वाढीस लागला आहे. त्यामुळे मोफत शिक्षण व आहार मिळत असल्याने अंगणवाड्यांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढू लागला आहे.प्रवेशोत्सवाची राज्याने घेतली दखल : अंगणवाडीत येणाऱ्या बालकांची संख्या वाढावी म्हणून जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाने प्रवेशोत्सव हा उपक्रम घेतला. त्याचेही चांगले परिणाम दिसत आहेत. दरवर्षी गुढी पाडव्याला हा उपक्रम राबविला जातो. बालकांना वाजत-गाजत अंगणवाडीत प्रवेश दिला जातो. याचे अनुकरण आता राज्यभर केले जात आहे. आता दर महिन्याला प्रवेशोत्सव घेण्याचे नियोजन सुरू आहे.२0१८ मध्ये ९0 टक्के प्रवेश झाले, २0१९ मध्ये हेच प्रमाण ९५ टक्क्यांवर पोहोचले आहे. वर्षागणिक प्रवेश वाढतच चालले आहेत. सध्या चार हजार ९६९ अंगणवाड्यांमध्ये एक लाख ५६९ बालके शिक्षण घेत आहेत. 

खासगी शाळांच्या कितीतरी पटीने अधिक गुणवत्ता अंगणवाड्यांमध्ये आहे. आकारसारख्या अभ्यासक्रमाची जर शंभर टक्के अंमलबजावणी झाली, तर या गुणवत्तेत आणखी भर पडणार आहे. अंगणवाडीतील मुले खासगी स्कूलच्या स्पर्धेत खूप पुढे निघून जाणार आहेत.- सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

टॅग्स :Schoolशाळाzp schoolजिल्हा परिषद शाळाMuncipal Corporationनगर पालिका