शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बापरे.. या सर्वच अंगणवाड्या भरल्या चिमुकल्यांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 01:06 IST

मागणीही वाढू लागली आहे. आहार व धान्य मिळू लागल्याने साहजिकच त्याचा परिणाम पटसंख्या वाढण्यावर झाला आहे.

ठळक मुद्देपटसंख्येत मोठी वाढ : कच्चे धान्य, ताजा आहार आणि आकार अभ्यासक्रमाचा परिणाम

कोल्हापूर : सुकडीऐवजी मिळणारे धान्य, कडधान्य, गरम ताजा आहार आणि आकार अभ्यासक्रमाच्या माध्यमातून दिले जाणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण यामुळे जिल्ह्यातील अंगणवाड्या सध्या हाऊसफुल्ल होत आहेत. पटसंख्येत वाढ झाल्याने सध्याच्या अंगणवाड्यांची जागा अपुरी पडत आहे. दाटीवाटीने मुलांना बसविण्याची वेळ सेविका, मदतनिसांवर आली आहे.

जिल्ह्यात चार हजार ३६९ अंगणवाड्या आहेत. त्यापैकी ग्रामीण भागात तीन हजार ९९४, तर इचलकरंजी शहरात २00 आणि इतर नगरपालिका क्षेत्रात १७५ अशा अंगणवाड्या सध्या कार्यरत आहेत. या अंगणवाड्यामार्फत ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालके, किशोरवयीन मुली, गरोदर व स्तनदा माता यांना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत पोषण आहाराचा पुरवठा केला जातो.

सध्या या सर्व घटकांना शासनाकडून सुकडीसारख्या पॅकेट बंद आहाराचा पुरवठा बंद झाला आहे. त्याऐवजी धान्य, कडधान्य, तेल, डाळी मिळत आहेत. पोषणाबरोबरच तयार धान्य, तेल मिळत असल्याने अंगणवाड्यांमध्ये नोंदणी करण्याकडे कल वाढला आहे. तसेच बालकांसाठी गरम ताजा आहारही दिला जात आहे. नोंदणी केल्यानंतरच हा सर्व शिधा मिळत असल्याने आतापर्यंत या आहाराकडे पाठ फिरविणारेही आवर्जून नोंंदणीसाठी आग्रह धरू लागले आहेत. मागणीही वाढू लागली आहे. आहार व धान्य मिळू लागल्याने साहजिकच त्याचा परिणाम पटसंख्या वाढण्यावर झाला आहे.बालकांचा बुद्ध्यांक वाढलाअंगणवाड्यांमध्ये गर्दी वाढण्यामागे पोषण आहाराइतकेच तेथील गुणवत्तापूर्ण शिक्षणही कारणीभूत आहे. आकार हा अभ्यासक्रम मुलांच्या सर्वांगीण विकासाला फारच उपयुक्त ठरत असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे. प्ले स्कूल व नर्सरीमुळे पैसे खर्च करून दोन-तीन वर्षे घालविल्यानंतरही जितके शिक्षण त्या बालकांना मिळणार नाही, तितके श्क्षिण अंगणवाडीमध्ये एका वर्षभरात मिळत आहे. त्यामुळे मुलांचा बुद्धांकही वाढीस लागला आहे. त्यामुळे मोफत शिक्षण व आहार मिळत असल्याने अंगणवाड्यांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढू लागला आहे.प्रवेशोत्सवाची राज्याने घेतली दखल : अंगणवाडीत येणाऱ्या बालकांची संख्या वाढावी म्हणून जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाने प्रवेशोत्सव हा उपक्रम घेतला. त्याचेही चांगले परिणाम दिसत आहेत. दरवर्षी गुढी पाडव्याला हा उपक्रम राबविला जातो. बालकांना वाजत-गाजत अंगणवाडीत प्रवेश दिला जातो. याचे अनुकरण आता राज्यभर केले जात आहे. आता दर महिन्याला प्रवेशोत्सव घेण्याचे नियोजन सुरू आहे.२0१८ मध्ये ९0 टक्के प्रवेश झाले, २0१९ मध्ये हेच प्रमाण ९५ टक्क्यांवर पोहोचले आहे. वर्षागणिक प्रवेश वाढतच चालले आहेत. सध्या चार हजार ९६९ अंगणवाड्यांमध्ये एक लाख ५६९ बालके शिक्षण घेत आहेत. 

खासगी शाळांच्या कितीतरी पटीने अधिक गुणवत्ता अंगणवाड्यांमध्ये आहे. आकारसारख्या अभ्यासक्रमाची जर शंभर टक्के अंमलबजावणी झाली, तर या गुणवत्तेत आणखी भर पडणार आहे. अंगणवाडीतील मुले खासगी स्कूलच्या स्पर्धेत खूप पुढे निघून जाणार आहेत.- सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

टॅग्स :Schoolशाळाzp schoolजिल्हा परिषद शाळाMuncipal Corporationनगर पालिका