शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

'शक्तीपीठ'विरोधात बांदा ते वर्धा संघर्ष यात्रा काढणार, संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 18:19 IST

लढा तीव्र करण्याचा निर्धार

कोल्हापूर : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात येत्या मे अखेर बांदा ते वर्धा संघर्ष यात्रा काढून हा लढा अधिक तीव्र व एकजुटीने लढण्याचा निर्णय गुरुवारी शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत आमच्या जमिनी देणार नाही, असा निर्धारही शेतकऱ्यांनी यावेळी केला. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील अध्यक्षस्थानी होते. राज्यातील १२ जिल्ह्यांमधील शेतकरी या बैठकीला उपस्थित होते.सतेज पाटील म्हणाले, आमचा विकासाला विरोध नाही, मात्र, गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारू नका. या महामार्गाविरोधातील लढा अधिक जोमाने लढला जाणार असून शेतकऱ्यांनी आता जास्तीत जास्त ग्रामसभेचे ठराव घेऊन याला विरोध करावा. शेतकऱ्यांवर कुणी जमीन भूसंपादनासाठी दबाव टाकला तर ते आम्ही त्या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. येत्या मे अखेरीस शक्तीपीठाविरोधात बांदा ते वर्धा संघर्ष यात्रा काढून हा लढा तीव्र करू.माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, या महामार्गामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचेही मोठे नुकसान होणार आहे. महामार्गाच्या भरावामुळे कोल्हापूर, सांगली आणखी पाण्यात जाईल. सह्याद्रीचा डोंगर फाेडून हा रस्ता केला तर पर्यावरणाची सर्वात मोठी हानी होईल. त्यामुळे या लढ्यात शेतकऱ्यांसह सर्व घटकांनी सहभागी होणे गरजेचे आहे. या लढ्यासाठी आता बांदा ते वर्धा संघर्ष यात्रा काढून प्रत्येक तालुक्यात मेळावे घेऊया. यावेळी आमदार कैलास पाटील, माजी आमदार वैभव नाईक, उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्यासह विजयकुमार पाटील, अजय बुरांडे, सतीश लळीत, गजेंद्र येळकर, उमेश देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रांताधिकाऱ्याचे पाद्यपूजनसोलापूरचे विजयकुमार देशमुख म्हणाले, इतका टोकाचा विरोध करूनही सरकार आपले ऐकत नसेल तर आता भूसंपादनासाठी आलेल्या प्रांताधिकाऱ्यांचे पाद्यपूजन करूया. सिंधुदुर्गचे सतीश कुलकर्णी यांनी शक्तीपीठ विरोधी आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्याचा पर्याय सुचविला.हनुमानगडाचा बुरुज ढासळून महामार्गकोकणात पारगडजवळच्या हनुमानगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वास्तव्य राहिले आहे. अशा ऐतिहासिक गडाचा बुरुज ढासळून शक्तीपीठ महामार्ग करण्यात येणार असल्याकडे जयेंद्र परुळेकर यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गFarmerशेतकरीagitationआंदोलन