शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

गोल्डन कार्ड काढण्यात कोल्हापूर ग्रामीण जिल्हा देशात पहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 13:19 IST

तीन तालुक्यांनी १०० टक्के कार्ड काढले

कोल्हापूर : पांढरी वगळता अन्य सर्व शिधापत्रिकाधारकांना वर्षाला ५ लाख रुपयांचे मोफत आरोग्य उपचार देणारे आयुष्मान भारत, गोल्डन कार्ड काढण्यात देशभरामध्ये कोल्हापूर ग्रामीण जिल्हा पहिला आला आहे. आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ९२ टक्के लाभार्थ्यांचे हे कार्ड काढण्यात आले असून कागल, भुदरगड आणि चंदगड तालुक्यांनी १०० टक्के कार्ड काढले असून हे तीन तालुके राज्यात पहिले आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.राज्य शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यातून अनुक्रमे दीड आणि साडे तीन लाख असे एकूण पाच लाख रुपये वर्षाला एका कुटुंबाला वैद्यकीय उपचारासाठी मंजूर करण्यात आले आहेत; परंतु त्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे गोल्डन कार्ड त्यासाठी आवश्यक ठरते. हे कार्ड काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेने गेल्या तीन महिन्यांत अहोरात्र मेहनत घेतली असून त्यामुळेच देशभरात ग्रामीण जिल्हा पहिला आहे. हे कार्ड असणाऱ्या रुग्णावर जिल्ह्यातील ९ शासकीय आणि ५६ खासगी अशा ६५ रुग्णालयांमध्ये १२०९ आजारांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत.

सुरुवातीच्या काळात कर्मचाऱ्यांनी हे कार्ड काढण्यासाठी विरोध दर्शवला होता; परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा पाठपुरावा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी या कर्मचाऱ्यांचे योग्य समुपदेशन केल्यामुळे आशा, आरोग्य कर्मचाऱ्यांनी शर्थीने प्रयत्न करून लाभार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर कार्ड काढले आहेत, असे डॉ. गायकवाड म्हणाले.

रात्रीची शिबिरे ठरली उपयुक्तदिवसभर आशा आणि आरोग्य कर्मचारी काम करून पुन्हा रात्री ही कार्डे काढण्यासाठी रात्रीची शिबिरे घेत होते. रात्री नेट कनेक्टिव्हिटी चांगली मिळत असल्याने मोबाइलवरून कामही वेगाने होत होते. गगनबावडा तालुक्यातील काही वाड्यावस्त्यांवर रेंज नसल्याने त्यांना आरोग्य विभागाच्या गाडीतून रेंज असणाऱ्या ठिकाणी आणून त्या ठिकाणी या योजनेसाठी नोंदणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने झोकून दिल्यानेच हे काम पूर्ण होऊ शकले.

तीन लाख लाभार्थ्यांसाठी करावे लागणार कामशिधापत्रिकाधारक पात्र लाभार्थ्यांची संख्या जरी १७,९०,७४६ असली तरी यातील ७४,५७२ मयत आहेत. १ लाख ८९ हजार ९९ कायमस्वरूपी किंवा विवाहामुळे परगावी गेल्याची नोंद आहे. ६६,०४७ जणांना हे कार्ड काढायचेच नाही. हे आकडे वजा जाता १४,६१,०२८ निव्वळ पात्र लाभार्थी ठरतात. यातील १३,३७,११३ जणांचे कार्ड काढण्यात आले आहेत. ग्रामीण कोल्हापूर जिल्ह्याचे हे काम ९२ टक्के झाले आहेत, तर ५२,२१२ जणांचे आधार कार्ड अपडेट नसल्याने त्यांचे कार्ड प्रलंबित आहेत. अशा उर्वरित तीन लाख जणांवर आता आरोग्य विभागाला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

गोल्डन कार्डचे तालुकावार झालेले कामतालुका   -  झालेले काम टक्केवारीभुदरगड १००चंदगड १००कागल १००आजरा ९९.९७शिरोळ ९८.९५गगनबावडा ९७.०४हातकणंगले ९६.७७गडहिंग्लज ९५.७४शाहूवाडी ९०.५०राधानगरी ८२.६९करवीर ८२.४०पन्हाळा ७८.३३

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHealthआरोग्य