शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

कांद्याला तीन वर्षांतील उच्चांकी दर,गतवर्षीपेक्षा दरात सरासरी ४० रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:55 IST

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : मागील तीन-चार वर्षे घसरलेल्या दराने कांदा उत्पादक शेतकºयांना रडवले होते. मातीमोल दराने कांदा विक्री करावा लागल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले; पण गतवर्षीच्या तुलनेत कांद्याची आवक एक लाख क्विंटलने वाढूनही दरात सरासरी प्रतिकिलो ४० रुपयांची वाढ झाली आहे. आॅगस्टपासून दराने कमालीची उसळी खाली असून, एक नंबर कांद्याचा ...

ठळक मुद्दे आवकही एक लाख क्विंटलने वाढलीगेले तीन महिने शेतकºयांना चांगला दर मिळत आहे

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : मागील तीन-चार वर्षे घसरलेल्या दराने कांदा उत्पादक शेतकºयांना रडवले होते. मातीमोल दराने कांदा विक्री करावा लागल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले; पण गतवर्षीच्या तुलनेत कांद्याची आवक एक लाख क्विंटलने वाढूनही दरात सरासरी प्रतिकिलो ४० रुपयांची वाढ झाली आहे. आॅगस्टपासून दराने कमालीची उसळी खाली असून, एक नंबर कांद्याचा दर प्रतिकिलो ५५ रुपये असून, गेल्या तीन वर्षांतील हा उच्चांकी दर राहिला आहे.

कांद्याचे उत्पादन सुरू झाले की दर घसरणे नवीन नाही. गेली तीन-चार वर्षे राज्यातील कांदा उत्पादक शेतकºयांच्या दृष्टीने फारच अडचणीची गेली. बाजार समितीत कांदा घेऊन आल्यानंतर दर पडल्याने अनेकवेळा मोकळे गोणपाट घेऊनच घरी परतावे लागले. जरा दर वाढू लागले की कांद्याची आवक झाल्याने पुन्हा दर पडत होते. त्यामुळे कांदा उत्पादक कमालीचा त्रस्त झाला होता. नाशिक ही कांद्याची मोठी बाजारपेठ आहे; पण अहमदनगर, पुणे, बीड, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कोल्हापूर बाजारपेठेकडेच आकर्षित होत असल्याने येथे कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होते.

विशेष म्हणजे स्थानिकची एक पिशवीही आवक नसताना रोज १५ हजार पिशव्यांची आवक समितीत होते आणि तेवढी विक्रीही होते. गोवा, कोकणात येथून कांदा पाठविला जातो. त्यामुळे दर चांगला आणि रोखीने पैसे मिळत असल्याने शेतकºयांचा कल या मार्केटकडे अधिक आहे. दोन वर्षे झाले दरात घसरण सुरू आहे. मे २०१७ मध्ये तर घाऊक बाजारात प्रतिकिलो दीड रुपयाने कांदा विकावा लागल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले.

या कालावधीत साडेआठ रुपये उच्चांकी दर राहिला. जूनमध्ये दरात फारसा फरक पडला नाही. प्रतिकिलो २ ते ११ रुपये, तर जुलैमध्ये २ ते १७ रुपयांपर्यंत दर राहिला.आॅगस्टपासून आवकही वाढू लागली आणि दरही वाढू लागले. आॅगस्ट महिन्यात १ लाख २२ हजार ७१० क्विंटलची आवक झाली आणि सरासरी ५ ते २९ रुपयांपर्यंत दर राहिले. आॅक्टोबरमध्ये आवक ७६ हजार क्विंटलवर आली आणि ४१ रुपये किलोपर्यंत दर पोहोचला. नोव्हेंबरमध्ये लाख क्विंटलपर्यंत आवक पोहोचली पण त्याबरोबर १० ते ५५ रुपयांपर्यंत दरही राहिला. डिसेंबरच्या २१ दिवसांत १ लाख ७० हजार क्विंटलची आवक होऊनही ५३ रुपयांपर्यंत दर आहे. गेल्या तीन वर्षांत सलग दोन महिने सरासरी ४० च्या वर दर राहिलेच नाहीत. यावेळेला मात्र गेले तीन महिने शेतकºयांना चांगला दर मिळत आहे.आवक, दर पुढीलप्रमाणेकालावधी आवक क्विंटल दर प्रतिकिलोएप्रिल ते नोव्हेंबर २०१६ १० लाख ८ हजार १७ ५ ते १५एप्रिल ते नोव्हेंबर २०१७ ११ लाख १८ हजार ४९० १० ते ५५

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर