शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

कांद्याला तीन वर्षांतील उच्चांकी दर,गतवर्षीपेक्षा दरात सरासरी ४० रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:55 IST

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : मागील तीन-चार वर्षे घसरलेल्या दराने कांदा उत्पादक शेतकºयांना रडवले होते. मातीमोल दराने कांदा विक्री करावा लागल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले; पण गतवर्षीच्या तुलनेत कांद्याची आवक एक लाख क्विंटलने वाढूनही दरात सरासरी प्रतिकिलो ४० रुपयांची वाढ झाली आहे. आॅगस्टपासून दराने कमालीची उसळी खाली असून, एक नंबर कांद्याचा ...

ठळक मुद्दे आवकही एक लाख क्विंटलने वाढलीगेले तीन महिने शेतकºयांना चांगला दर मिळत आहे

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : मागील तीन-चार वर्षे घसरलेल्या दराने कांदा उत्पादक शेतकºयांना रडवले होते. मातीमोल दराने कांदा विक्री करावा लागल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले; पण गतवर्षीच्या तुलनेत कांद्याची आवक एक लाख क्विंटलने वाढूनही दरात सरासरी प्रतिकिलो ४० रुपयांची वाढ झाली आहे. आॅगस्टपासून दराने कमालीची उसळी खाली असून, एक नंबर कांद्याचा दर प्रतिकिलो ५५ रुपये असून, गेल्या तीन वर्षांतील हा उच्चांकी दर राहिला आहे.

कांद्याचे उत्पादन सुरू झाले की दर घसरणे नवीन नाही. गेली तीन-चार वर्षे राज्यातील कांदा उत्पादक शेतकºयांच्या दृष्टीने फारच अडचणीची गेली. बाजार समितीत कांदा घेऊन आल्यानंतर दर पडल्याने अनेकवेळा मोकळे गोणपाट घेऊनच घरी परतावे लागले. जरा दर वाढू लागले की कांद्याची आवक झाल्याने पुन्हा दर पडत होते. त्यामुळे कांदा उत्पादक कमालीचा त्रस्त झाला होता. नाशिक ही कांद्याची मोठी बाजारपेठ आहे; पण अहमदनगर, पुणे, बीड, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कोल्हापूर बाजारपेठेकडेच आकर्षित होत असल्याने येथे कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होते.

विशेष म्हणजे स्थानिकची एक पिशवीही आवक नसताना रोज १५ हजार पिशव्यांची आवक समितीत होते आणि तेवढी विक्रीही होते. गोवा, कोकणात येथून कांदा पाठविला जातो. त्यामुळे दर चांगला आणि रोखीने पैसे मिळत असल्याने शेतकºयांचा कल या मार्केटकडे अधिक आहे. दोन वर्षे झाले दरात घसरण सुरू आहे. मे २०१७ मध्ये तर घाऊक बाजारात प्रतिकिलो दीड रुपयाने कांदा विकावा लागल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले.

या कालावधीत साडेआठ रुपये उच्चांकी दर राहिला. जूनमध्ये दरात फारसा फरक पडला नाही. प्रतिकिलो २ ते ११ रुपये, तर जुलैमध्ये २ ते १७ रुपयांपर्यंत दर राहिला.आॅगस्टपासून आवकही वाढू लागली आणि दरही वाढू लागले. आॅगस्ट महिन्यात १ लाख २२ हजार ७१० क्विंटलची आवक झाली आणि सरासरी ५ ते २९ रुपयांपर्यंत दर राहिले. आॅक्टोबरमध्ये आवक ७६ हजार क्विंटलवर आली आणि ४१ रुपये किलोपर्यंत दर पोहोचला. नोव्हेंबरमध्ये लाख क्विंटलपर्यंत आवक पोहोचली पण त्याबरोबर १० ते ५५ रुपयांपर्यंत दरही राहिला. डिसेंबरच्या २१ दिवसांत १ लाख ७० हजार क्विंटलची आवक होऊनही ५३ रुपयांपर्यंत दर आहे. गेल्या तीन वर्षांत सलग दोन महिने सरासरी ४० च्या वर दर राहिलेच नाहीत. यावेळेला मात्र गेले तीन महिने शेतकºयांना चांगला दर मिळत आहे.आवक, दर पुढीलप्रमाणेकालावधी आवक क्विंटल दर प्रतिकिलोएप्रिल ते नोव्हेंबर २०१६ १० लाख ८ हजार १७ ५ ते १५एप्रिल ते नोव्हेंबर २०१७ ११ लाख १८ हजार ४९० १० ते ५५

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर