शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याला तीन वर्षांतील उच्चांकी दर,गतवर्षीपेक्षा दरात सरासरी ४० रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:55 IST

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : मागील तीन-चार वर्षे घसरलेल्या दराने कांदा उत्पादक शेतकºयांना रडवले होते. मातीमोल दराने कांदा विक्री करावा लागल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले; पण गतवर्षीच्या तुलनेत कांद्याची आवक एक लाख क्विंटलने वाढूनही दरात सरासरी प्रतिकिलो ४० रुपयांची वाढ झाली आहे. आॅगस्टपासून दराने कमालीची उसळी खाली असून, एक नंबर कांद्याचा ...

ठळक मुद्दे आवकही एक लाख क्विंटलने वाढलीगेले तीन महिने शेतकºयांना चांगला दर मिळत आहे

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : मागील तीन-चार वर्षे घसरलेल्या दराने कांदा उत्पादक शेतकºयांना रडवले होते. मातीमोल दराने कांदा विक्री करावा लागल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले; पण गतवर्षीच्या तुलनेत कांद्याची आवक एक लाख क्विंटलने वाढूनही दरात सरासरी प्रतिकिलो ४० रुपयांची वाढ झाली आहे. आॅगस्टपासून दराने कमालीची उसळी खाली असून, एक नंबर कांद्याचा दर प्रतिकिलो ५५ रुपये असून, गेल्या तीन वर्षांतील हा उच्चांकी दर राहिला आहे.

कांद्याचे उत्पादन सुरू झाले की दर घसरणे नवीन नाही. गेली तीन-चार वर्षे राज्यातील कांदा उत्पादक शेतकºयांच्या दृष्टीने फारच अडचणीची गेली. बाजार समितीत कांदा घेऊन आल्यानंतर दर पडल्याने अनेकवेळा मोकळे गोणपाट घेऊनच घरी परतावे लागले. जरा दर वाढू लागले की कांद्याची आवक झाल्याने पुन्हा दर पडत होते. त्यामुळे कांदा उत्पादक कमालीचा त्रस्त झाला होता. नाशिक ही कांद्याची मोठी बाजारपेठ आहे; पण अहमदनगर, पुणे, बीड, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कोल्हापूर बाजारपेठेकडेच आकर्षित होत असल्याने येथे कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होते.

विशेष म्हणजे स्थानिकची एक पिशवीही आवक नसताना रोज १५ हजार पिशव्यांची आवक समितीत होते आणि तेवढी विक्रीही होते. गोवा, कोकणात येथून कांदा पाठविला जातो. त्यामुळे दर चांगला आणि रोखीने पैसे मिळत असल्याने शेतकºयांचा कल या मार्केटकडे अधिक आहे. दोन वर्षे झाले दरात घसरण सुरू आहे. मे २०१७ मध्ये तर घाऊक बाजारात प्रतिकिलो दीड रुपयाने कांदा विकावा लागल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले.

या कालावधीत साडेआठ रुपये उच्चांकी दर राहिला. जूनमध्ये दरात फारसा फरक पडला नाही. प्रतिकिलो २ ते ११ रुपये, तर जुलैमध्ये २ ते १७ रुपयांपर्यंत दर राहिला.आॅगस्टपासून आवकही वाढू लागली आणि दरही वाढू लागले. आॅगस्ट महिन्यात १ लाख २२ हजार ७१० क्विंटलची आवक झाली आणि सरासरी ५ ते २९ रुपयांपर्यंत दर राहिले. आॅक्टोबरमध्ये आवक ७६ हजार क्विंटलवर आली आणि ४१ रुपये किलोपर्यंत दर पोहोचला. नोव्हेंबरमध्ये लाख क्विंटलपर्यंत आवक पोहोचली पण त्याबरोबर १० ते ५५ रुपयांपर्यंत दरही राहिला. डिसेंबरच्या २१ दिवसांत १ लाख ७० हजार क्विंटलची आवक होऊनही ५३ रुपयांपर्यंत दर आहे. गेल्या तीन वर्षांत सलग दोन महिने सरासरी ४० च्या वर दर राहिलेच नाहीत. यावेळेला मात्र गेले तीन महिने शेतकºयांना चांगला दर मिळत आहे.आवक, दर पुढीलप्रमाणेकालावधी आवक क्विंटल दर प्रतिकिलोएप्रिल ते नोव्हेंबर २०१६ १० लाख ८ हजार १७ ५ ते १५एप्रिल ते नोव्हेंबर २०१७ ११ लाख १८ हजार ४९० १० ते ५५

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर