शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

वीज कनेक्शन तोडल्यानं शेतकऱ्याचा थेट महावितरण कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न, धक्कादायक व्हिडिओ समोर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 18:33 IST

कोल्हापुरातील अनेक गावातील विजेचे कनेक्शन तोडले जात असून यामुळे शेतकरी आता चांगलेच संतप्त झालेले दिसून येत आहेत.

कोल्हापुरातील अनेक गावातील विजेचे कनेक्शन तोडले जात असून यामुळे शेतकरी आता चांगलेच संतप्त झालेले दिसून येत आहेत. अनेक गावात वीज कनेक्शन तोडल्याने शेतीला पाणी न मिळाल्याने शेतीचे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या एका शेतकऱ्याने चक्क आत्मदहनाचा प्रयत्न महावितरण कार्यालयातच केला.

कोल्हापुरात शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन तोडल्याने  महावितरणच्या कार्यालयातच कार्यकारी अभियंता यांच्यासमोर डिझेल अंगावर ओतून शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. गावातील वीज कोणतीही पूर्वसूचना न देता तोडण्यात येत असल्याने सोमवारी आक्रमक गावकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास आले होते. महे ,कसबा बीड, वाशी या गावांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ तब्बल तासभर अधिकाऱ्यांची वाट बघत होते. सोबतच ते डिझेलचा कॅन ही शेजारी घेऊन बसले होते मात्र तरीही अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे लक्ष न दिल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले अन् एकच राडा झाला.

शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन तोडल्याच्या निषेधार्थ महावितरणचे कार्यकारी अभियंता डी. एस. पाटील यांच्यासमोर डिझेल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा यावेळी प्रयत्न केला. यावेळी कार्यालयात एकच गोंधळ उडाला. अंगावर डिझेल ओतल्यामुळे शेतकऱ्याच्या खिशात असणारी काडेपेटी भिजल्याने आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी त्याला रोखल्याने पुढील अनर्थ टळला आहे. मात्र महावितरणचे अधिकारी आणि शेतकरी, गावकरी यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. वीज कनेक्शन अनेक गावातील तोडले जात असून यामुळे होणारे शेतीचे नुकसान अधिक आहे. त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आता आक्रमक झालेले दिसून येत आहेत.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरelectricityवीजFarmerशेतकरी