शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

राज्यकर्ते सत्ता नाट्यात गुंग; शेतकऱ्याची मात्र मती गुंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 11:51 IST

‘प्रोत्साहन’च्या प्रतीक्षेत ११ हजार शेतकरी : नियमित परतफेड केली ती चूकच

कोल्हापूर : राज्यकर्ते सत्ता नाट्यात गुंग झाल्याने त्यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. कर्जमाफीची घोषणा करून चार वर्षे पूर्ण होत आहेत, मात्र त्याचे गुऱ्हाळ काही थांबत नाही. जिल्ह्यातील ११ हजार पात्र शेतकरी ‘प्रोत्साहन’ अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. विकास संस्था, बँक, सहकार विभागाकडे चौकशी करून शेतकरी थकले असून नियमित परतफेड करून खरोखरच चूक केली, अशी संतप्त भावना व्यक्त होत आहे.राज्य सरकारने २०१९ मध्ये महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. यामध्ये दोन लाखांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी व नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार होते. थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग झाले. मात्र, प्रोत्साहन अनुदानाचे भिजत घोंगडे अद्याप कायम आहे.जिल्ह्यात नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. शंभराहून अधिक विकास संस्था वर्षाला १०० टक्के कर्जवसुली करतात. त्यामुळे येथे कर्जमाफीपेक्षा प्रोत्साहन अनुदानाचा लाभ जास्त शेतकऱ्यांना होतो. त्यामुळेच जिल्ह्यातील ३ लाख ९४४ शेतकऱ्यांनी अनुदानासाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्यातील १ लाख ८९ हजार ३६८ शेतकरी पात्र ठरले. या शेतकऱ्यांना ‘केवायसी’ पूर्तता करण्याचे आदेश दिले.त्यानुसार १ लाख ८७ हजार ६१६ शेतकऱ्यांनी त्याची पूर्तता केली. केवायसी पूर्तता केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पैसे मिळणे अपेक्षित होते. मात्र, टप्प्याटप्प्याने ते संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जात आहेत. आतापर्यंत १ लाख ७६ हजार ६०० शेतकऱ्यांना ६४२ कोटी ३५ लाख रुपये मिळाले आहेत. अद्याप ११ हजार १६ पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.

अजितदादा लक्ष देणार का?विरोधी पक्ष नेता असताना अजित पवार यांनी प्रोत्साहन अनुदानाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले होते. आता ते सत्तेत गेल्याने ते तरी लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय देणार का? अशी विचारणा शेतकरी करत आहेत.

अनुदान आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर गेले दीड वर्ष आहे. पण शासन नुसते राजकारणात गुंग झाल्याने त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. - धनपाल शेट्टी (शेतकरी, शिरोळ)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीPoliticsराजकारणMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष