शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'पीएसआय'चा निकाल अडीच वर्षांपासून लटकला, ६०६ उमेदवार हतबल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 13:05 IST

कोल्हापूर : प्रचंड स्पर्धा असतानाही पीएसआयची ( पोलिस उपनिरीक्षक) परीक्षा देत मुलाखतीपर्यंत मजल मारली. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या ...

कोल्हापूर : प्रचंड स्पर्धा असतानाही पीएसआयची (पोलिस उपनिरीक्षक) परीक्षा देत मुलाखतीपर्यंत मजल मारली. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या अडीच वर्षांपासून पीएसआय परीक्षेचा निकालच जाहीर न केल्याने राज्यातील पीएसआयचे ६०६ उमेदवार हतबल झाले आहेत. लटकलेल्या निकालामुळे वाढते वय, लग्नाचा प्रश्न आणि करिअरची पुढची दिशाच कळत नसल्याने या विद्यार्थ्यांवर सैरभैर होण्याची वेळ आली आहे. 

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी २८ ऑक्टोबर २०२१ या दिवशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. याची पूर्व परीक्षा २६ फेब्रुवारी २०२२ व मुख्य परीक्षा ९ जुलै २०२३ रोजी झाली. त्यानंतर दोन महिन्यात शारीरिक चाचणी होणे अपेक्षित होते. मात्र, तब्बल वर्षभराने २ ते १० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत शारीरिक परीक्षा घेतली. त्यानंतर चार महिन्यांनी मुलाखती घेतल्या. मुलाखत झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर करणे गरजेचे होते. मात्र, अद्याप निकाल जाहीर केलेला नाही. 

या पदासाठी अनाथांच्या दोन जागा भरण्याबाबतचे संवर्ग संबंधित प्रकरण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मध्ये प्रलंबित आहे. याबाबत सुनावणी होत असली तरी बाजू मांडण्यासाठी त्यांना वारंवार मुदतवाढ मिळत असल्याने पीएसआयच्या ६०६ उमेदवारांचा निकाल लटकवून ठेवला आहे. परीक्षेचा निकाल लांबणीवर जात असल्याने विद्यार्थ्यांचे वय कालबाह्य ठरत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक, आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. इतर परीक्षेवरही त्यांना लक्ष केंद्रित करता येत नाही. विशेष म्हणजे यातील ६०६ पैकी कोल्हापूर जिल्ह्यातील २५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

प्रत्येक टप्प्यात उशीरमुळात परीक्षा झाल्यापासून ते मुलाखतीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आयोगाने उशीर केला आहे. त्यामुळे आयोगास निकाल लावण्यात अडचण येत असली तर अनाथ संवर्गाचा निकाल तात्पुरता बाजूला ठेवून राहिलेल्या संवर्गाचे निकाल जाहीर करावेत किंवा केवळ सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.इतरांना वेतन सुरू झाले, यांचा निकालही नाहीपोलिस उपनिरीक्षक सोबतच राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी या परीक्षा २०२१ मध्येच झाल्या. इतर परीक्षांमधील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळून पगारपण सुरू झाला. मात्र, पीएसआयच्या विद्यार्थ्यांचा अद्याप निकालही जाहीर न झाल्याने असा अन्याय आमच्यावरच का, असा संतप्त सवाल विद्यार्थी करत आहेत.

नातेवाइकांकडून हेटाळणीपरीक्षा होऊन तीन वर्षे होत आली तरी अद्याप निकाल न जाहीर झाल्याने या विद्यार्थ्यांचे कुटुंबही मानसिक तणावात आहे. आधीच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना समाजाचे टोमणे खावे लागतात. आता हा निकाल लटकल्यामुळे नातेइकांकडून मुद्दामहून हेटाळणी केली जात असल्याचे एका उमेदवाराने सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMPSC examएमपीएससी परीक्षाPoliceपोलिस