शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शिकवायचं कधी?; अभियान, उत्सवातच शिक्षक गुंतले

By समीर देशपांडे | Updated: August 6, 2024 17:07 IST

ऑगस्टमध्येच दोन अभियाने, एका उत्सवाची धांदल

समीर देशपांडेकोल्हापूर : कुणीही उठावं आणि कोणतंही अभियान, उत्सव सुरू करावा आणि त्यासाठी शाळा, शिक्षकांना वेठीस धरावं, अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. सध्या राज्यातील शाळांमध्ये दोन अभियाने आणि एक उत्सव सुरू आहे. त्यामुळे ऑगस्ट अखेरीपर्यंत शिकवण्यापेक्षा यातील उपक्रम आणि कार्यक्रम राबवण्यातच शिक्षकांची ताकद खर्ची पडणार आहे. विधानसभा आचारसंहितेनंतरच हे सर्व काही थंड होण्याची शक्यता आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा दुसरा टप्पा २९ जुलैपासून सुरू होऊन तो ४ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. ५ सप्टेंबरपासून या स्पर्धेसाठीचे मूल्यांकन होणार असून यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर मोठी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना सहभागी करून घेण्यासाठी प्रशासन धावपळीत आहे. अशातच नेहमीच्या उपक्रमांपेक्षा वेगळे उपक्रम राबवयाचे असल्याने शिक्षक आता याच कामात गुंतले आहेत.याच पद्धतीने २२ जुलैपासून सर्व शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव ३० ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या काळात वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी, दर्जेदार साहित्यिक आणि लेखक यांची भेट होऊन त्यांचा परिचय करून देण्यासाठीचे उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे सध्या शिक्षकवर्ग साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार यांना साहित्यविषयक उपक्रमांसाठीच्या निमंत्रणाच्या आणि नियोजनाच्या गडबडीत आहेत.

याचवेळी १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या २० दिवसांत अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी द्यायच्या आहेत. त्यानंतर सहा दिवसांत या शाळेतील त्रुटी दूर करून, सुधारणा करून घ्यावयाच्या आहेत. त्यानंतरच्या चार दिवसांत या सुधारणा झाल्याची, त्रुटी दूर झाल्याची खात्री करून घ्यायची आहे. आठवड्यातील सोमवार आणि शुक्रवारी दोनच दिवस कार्यालयात थांबून उर्वरित तीन-चार दिवस शाळांना भेटी देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना असल्याने आता शाळाशाळांमध्ये अधिकाऱ्यांना फार त्रुटी दिसू नयेत, यासाठीही धावपळ सुरू आहे.

आचारसंहितेच्या आधीची धावपळसप्टेंबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागणार असल्याने त्याआधीच हे सर्व उपक्रम संपवण्याची घाई सुरू आहे. एकीकडे महापुरासारखी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली असताना, शाळांना सुट्या देण्याची वेळ आली असताना दुसरीकडे हे अभियान, उत्सव करणे आणि त्याचे फोटो अपलोड करण्यातच शिक्षकांची ताकद जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षकSchoolशाळा