शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

मुलांना टॉपला नेण्याची स्पर्धा, त्यात कॉलेजचा पट होतोय अर्धा; करिअरसाठी पालक जागरुक

By समीर देशपांडे | Updated: August 6, 2025 17:23 IST

दर्जेदार शिक्षणासाठी शाळा, कॉलेजनी सज्ज व्हावे

समीर देशपांडेकोल्हापूर : मुलांना इंजिनिअर करायचे आहे, डॉक्टर करायचे आहे. सध्याचा कनिष्ठ महाविद्यालयाचा अभ्यासक्रम या परीक्षांच्या पात्रतेसाठीच्या तयारीला पूरकही आहे. परंतु नियमित अभ्यास आणि प्रचंड सराव घेण्याचा अभाव असल्याने पालकच मुला-मुलींना अकॅडमीमध्ये घालण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, अशी एक साखळीच तयार झाली असून, ‘कनिष्ठ महाविद्यालयात नाव, पण अकॅडमीत धाव’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.पहिली ते पाचवी प्राथमिक, सहावी ते आठवी उच्च प्राथमिक, नववी, दहावी माध्यमिक आणि ११ वी ते १२ उच्च माध्यमिक, अशी त्रिस्तरीय शिक्षण पद्धती आपल्याकडे सध्या कार्यरत आहे. परंतू एकदा का चौथी इयत्ता झाली की पालकांना अकॅडमीचे वेध लागायला सुरुवात होते. सैनिक शाळा, नवोदय, एनएमएमएस, विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षा, अकॅडमीतील इतर उपक्रम पालकांना भुरळ घालतात. त्याठिकाणी मजबूत शुल्क आकारले जात असल्याने साहजिकच शिक्षकही त्याच पद्धतीने मुलांकडून अभ्यास करवून घेतात. यामुळे ग्रामीण भागामध्ये अधिकाधिक मुलामुलींना अकॅडमीमध्ये घालणाऱ्या पालकांची संख्या वाढू लागली आहे.अकरावी, बारावीला तर वेगळाच पॅटर्न आता गेल्या दहा वर्षांत रूढ झाला आहे. आता इंजिनिअरिंगसाठी जीई आणि मेडिकलसाठी नीट परीक्षा सक्तीची आहे. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पूर्वपरीक्षांसाठीही आता स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा असल्यामुळे मुलांची या परीक्षांची तयारी व्हावी यासाठी खासगी अकॅडमीमध्ये मुला-मुलींना घातले जाते. त्यासाठी वार्षिक फी सव्वा लाखापासून दोन लाख रुपयांपर्यंत देण्यासही पालक मागेपुढे पाहत नाहीत. याचवेळी त्यांचे नाव मात्र शासनमान्य शिक्षण संस्थेच्या ११ आणि १२ वीच्या वर्गात घातलेले असते. परीक्षेलाही तो त्याच महाविद्यालयातून बसतो.

विद्यार्थी अकॅडमीत गर्कस्पर्धा परीक्षांसाठी परीक्षेचे तंत्र आणि नियमित सराव आवश्यक असल्याने पारंपरिक अकरावी, बारावी शिकवणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये यासाठी मर्यादा आहेत. याउलट भरभक्कम शुल्कामुळे अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवर बसून त्यांच्याकडून नियमित सराव करून घेण्यात येतो. याच बलस्थानाच्या जोरावर कनिष्ठ महाविद्यालयांत रिकामे वर्ग आणि अकॅडमीमध्ये विद्यार्थी गर्क’ अशी स्थिती आहे.

नोंदणी नाही, मान्यताही नाहीअनेक अकॅडमींची नेमकी नोंदणी होत नाही. तर ती सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाच्या कोणत्याही परवानगीचीही गरज भासत नाही. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे जंगलात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू केलेल्या अकॅडमींच्याही आता टोलेजंग इमारती झाल्या आहेत.

जिल्ह्यातील आकडेवारी

  • माध्यमिक शाळा - १,०६९
  • उच्च माध्यमिक शाळा - ३२८
  • शिक्षक संख्या - १३, ६३९
  • शिक्षकेतर कर्मचारी - ५,४७३
  • मुले - १,९५,०३१
  • मुली - १,६१,२३६
  • एकूण - ३, ५६,२६७

कनिष्ठ महाविद्यालयात अनेकदा तास वेळेवर होत नाहीत आणि दर्जेदार अध्यापन होत नाही. त्यामुळे मुले येत नाहीत. मुलांचा मौल्यवान वेळ वाया जातो. याउलट जरी फी घेतली तरी अकॅडमीमध्ये मुलांकडून अभ्यास करवून घेतला जातो. जो त्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी मोलाचा ठरतो. -एम. बी. सूर्यवंशी, कोल्हापूर, पालक