शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

सगळ्यांनी ठरवलंय म्हणून सरकार आलं, जितेंद्र आव्हाडांचा संजय राऊतांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 15:06 IST

जातीय कीड लागून राज्य पोखरले जाऊ नये व धर्मांध शक्तीला बाजूला ठेवण्यासाठी आमचं तिघांचं ठरलंय आणि हे सगळे शरद पवार यांच्यामुळे घडले, हेही विसरता येणार नाही.

कोल्हापूर : आपआपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवण्यासाठी बोलावे लागते. तरीही कोणी एकाने ठरवलंय म्हणून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले नाही, सगळ्यांनी ठरवले म्हणून आले. जातीय कीड लागून राज्य पोखरले जाऊ नये व धर्मांध शक्तीला बाजूला ठेवण्यासाठी आमचं तिघांचं ठरलंय आणि हे सगळे शरद पवार यांच्यामुळे घडले, हेही विसरता येणार नसल्याचा पलटवार राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर केला.मंत्री आव्हाड रविवारी कोल्हापुरात आले असता, शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. मंत्री आव्हाड म्हणाले, ‘‘देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली, महागाईचा आगडोंब उडाला असताना त्यावर कोणीच बोलत नाही. मशिदीखाली मंदिर सापडले आणि मंदिराखाली मशीद सापडली, असे मुद्दामहून दगडावर दगडे घासून वणवा पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष विचलित करून लोक बेधुंद अस्वस्थेत ठेवण्याचा प्रकार असून, रोज धर्माची पुडी सोडली जात आहे. आर्यन खानबाबत जे घडले त्याच्या मनात तपास यंत्रणेविषयी काय मत तयार झाले असेल, हेही जाणून घेतले पाहिजे.’’ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार राजीव आवळे आदी उपस्थित होते.

रामनाम म्हणण्याची वेळ आणू देऊ नकामहाराष्ट्राच्या राजकारणात धर्मांध शक्तीला रोखू शकणारे शरद पवार हे एकमेव नेते असल्यानेच त्यांच्यावर सातत्याने विरोधकांकडून हल्ले होत आहेत. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना जशाच तसे उत्तर दिले पाहिजे, असे आवाहन करत आम्ही राम म्हणू , पण आम्हाला रामनाम म्हणण्याची वेळ आणू देऊ नका, असा टोला मंत्री आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJitendra Awhadजितेंद्र आव्हाडSanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडी