शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

सगळ्यांनी ठरवलंय म्हणून सरकार आलं, जितेंद्र आव्हाडांचा संजय राऊतांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 15:06 IST

जातीय कीड लागून राज्य पोखरले जाऊ नये व धर्मांध शक्तीला बाजूला ठेवण्यासाठी आमचं तिघांचं ठरलंय आणि हे सगळे शरद पवार यांच्यामुळे घडले, हेही विसरता येणार नाही.

कोल्हापूर : आपआपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवण्यासाठी बोलावे लागते. तरीही कोणी एकाने ठरवलंय म्हणून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले नाही, सगळ्यांनी ठरवले म्हणून आले. जातीय कीड लागून राज्य पोखरले जाऊ नये व धर्मांध शक्तीला बाजूला ठेवण्यासाठी आमचं तिघांचं ठरलंय आणि हे सगळे शरद पवार यांच्यामुळे घडले, हेही विसरता येणार नसल्याचा पलटवार राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर केला.मंत्री आव्हाड रविवारी कोल्हापुरात आले असता, शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. मंत्री आव्हाड म्हणाले, ‘‘देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली, महागाईचा आगडोंब उडाला असताना त्यावर कोणीच बोलत नाही. मशिदीखाली मंदिर सापडले आणि मंदिराखाली मशीद सापडली, असे मुद्दामहून दगडावर दगडे घासून वणवा पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष विचलित करून लोक बेधुंद अस्वस्थेत ठेवण्याचा प्रकार असून, रोज धर्माची पुडी सोडली जात आहे. आर्यन खानबाबत जे घडले त्याच्या मनात तपास यंत्रणेविषयी काय मत तयार झाले असेल, हेही जाणून घेतले पाहिजे.’’ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार राजीव आवळे आदी उपस्थित होते.

रामनाम म्हणण्याची वेळ आणू देऊ नकामहाराष्ट्राच्या राजकारणात धर्मांध शक्तीला रोखू शकणारे शरद पवार हे एकमेव नेते असल्यानेच त्यांच्यावर सातत्याने विरोधकांकडून हल्ले होत आहेत. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना जशाच तसे उत्तर दिले पाहिजे, असे आवाहन करत आम्ही राम म्हणू , पण आम्हाला रामनाम म्हणण्याची वेळ आणू देऊ नका, असा टोला मंत्री आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJitendra Awhadजितेंद्र आव्हाडSanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडी