शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

Navratri 2025: आम्ही अंबेचे सेवेकरी: भाविकांच्या सुरक्षेचा वसा हीच सेवा; कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरांमध्ये पोलिसांची करडी नजर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 19:11 IST

नवरात्रोत्सवात राबतात सुमारे ८०० पोलिस

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सव उत्साहात आणि कोणत्याही विघ्नाशिवाय पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील तीर्थस्थळांवर सुमारे ८०० पोलिस राबत आहेत. वाहतुकीपासून ते मंदिरात भाविकांच्या रांगांपर्यंत पोलिसांची करडी नजर असते. केवळ कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून नव्हे, तर देवीची सेवा म्हणून घेतलेला हा सुरक्षेचा वसा पोलिसांकडून दरवर्षी श्रद्धेने पार पाडला जातो.साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईच्या तीर्थक्षेत्री काम करण्याची संधी मिळाली हेच अनेकांसाठी भाग्याचे असते. त्यामुळेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपासून ते अंमलदारांपर्यंत अनेकांच्या व्हॉट्सॲप स्टेटसला रोज करवीरनिवासिनी अंबाबाईची प्रतिमा असते. रोज किंवा दर शुक्रवारी न चुकता दर्शनाला मंदिरात हजेरी लावणारे, पालखी सोहळ्याला उपस्थिती लावणारे अनेक अधिकारी, कर्मचारी भेटतात. नवरात्रौत्सवातील सुरक्षा व्यवस्था हे कर्तव्य असते, तशीच ती त्यांच्यासाठी सेवेची पर्वणीही असते. त्यामुळेच सुरक्षाव्यवस्था, बंदोबस्त, वाहतूक नियोजन अशा कामांमध्ये आपलाही सहभाग असावा, असे पोलिसांना मनोमन वाटते.अंबाबाई मंदिरासह नवदुर्गा, जोतिबा मंदिर, बाळूमामा मंदिरातही भाविकांची गर्दी असते. या सर्वच ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यापासून ते भाविकांना विनासायास दर्शन मिळावे, यासाठी पोलिस राबतात. नवरात्रोत्सवात सुमारे ८०० पोलिस या कामात आहेत.सुरक्षेसाठी २४ तास सतर्कअंबाबाई मंदिर सुरक्षेसाठी २४ तास पोलिस कार्यरत असतात. बॉम्बशोधक पथकाकडून नियमित तपासणी केली जाते. सर्व प्रवेशद्वारांवर कडेकोट बंदोबस्त तैनात असतो. दर्शनरांग आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची विशेष नजर असते. पालखी सोहळा, ललिता पंचमीची यात्रा, देवीच्या नगरप्रदक्षिणेसाठी पोलिस अधीक्षकांसह इतर वरिष्ठ अधिकारी आवर्जून उपस्थिती लावतात. यातून त्यांची श्रद्धा आणि कर्तव्यभावनेचा मिलाप दिसून येतो.

वाहतूक नियोजनाची सेवानवरात्रौत्सवात बाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. त्यांच्या वाहनांमुळे शहरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. वाहनांचे पार्किंग आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस विशेष परिश्रम घेतात. गर्दीच्या काळात वाहतूक सुरळीत ठेवणे ही सेवाच असल्याची भावना पोलिसांकडून व्यक्त केली जाते.