शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

मोफतच्या घरांसाठी दीड लाखावर अर्ज, आर्थिक सर्वेक्षणानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केवळ १८,००० बेघर; गावोगावी होणार छाननी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 6:20 PM

कोल्हापूर : एकीकडे शासनाच्या सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १८ हजार बेघर नागरिक असताना आपण बेघर आहोत,

ठळक मुद्देप्रशासनही अवाक् : , ७५ टक्के अर्ज अपात्र ठरणार१0 हजारांपेक्षा अधिक बेघर हे खुल्या गटातील पळवाटा काढून घर घेणाºयांना या छाननीमध्ये अपात्रतेचा झटका बसणार

समीर देशपांडे ।कोल्हापूर : एकीकडे शासनाच्या सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १८ हजार बेघर नागरिक असताना आपण बेघर आहोत, कच्च्या घरात आहोत त्यामुळे प्रधानमंत्री योजनेतून घरकुल मिळावे, अशी मागणी करणारे १ लाख ५६ हजार १८२ अर्ज १२ तालुक्यांतून जिल्हा परिषदेकडे आल्याने ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रशासन अवाक् झाले आहे. आता खरोखरच कुणाला घर नाही हे पाहण्यासाठी ग्रामसेवकांपासून ते वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत सर्वजण फेरतपासणी करणार आहेत. यामध्ये किमान ७५ टक्के म्हणजेच सव्वा लाखापर्यंतचे अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता आहे.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून या योजनेचे संनियंत्रण करण्यात येते.

२0११ साली झालेल्या आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षणातून कोल्हापूर जिल्ह्यात ३२,९२६ जण बेघर असल्याची माहिती पुढे आली. हीच माहिती राष्ट्रीय माहिती केंद्रामार्फत ग्रामीण विकास यंत्रणेला उपलब्ध करून देण्यात आली. या यादीची जिल्हा परिषदेच्या यंत्रणेतून पुन्हा छाननी केल्यानंतर १४,000 अर्ज अपात्र ठरले आणि १८ हजारजण बेघर असल्याचे स्पष्ट झाले. यातील ८ हजार ३०० लाभार्थ्यांना गेल्या पाच वर्षांत घरे मंजूर करण्यात आली आहेत. यातील १0 हजारांपेक्षा अधिक बेघर हे खुल्या गटातील आहेत.

सर्वेक्षणानंतर पाच वर्षे झाल्याने या यादीत ज्यांचे नाव नाही आणि जे खरोखर बेघर आहेत, किंवा कच्च्या घरात राहतात अशांना अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेने केले होते. यामध्ये चक्क एक लाख ५६ हजार १८२ अर्ज जिल्ह्यातून प्राप्त झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज आल्याने आता पुन्हा या अर्जांची छाननी करणे क्रमप्राप्त बनले आहे. त्यामुळे गावागावांत सर्वेक्षण करण्याची जबाबदारी आता ग्रामसेवकांवर देण्यात आली आहे.

ग्रामसेवकांनी पात्र, अपात्रची यादी निश्चित करावयाची असून, यानंतर गटविकास अधिकारी, शाखा अभियंता यांनी यातील ५ टक्के लाभार्थ्यांची तपासणी करावयाची असून, यानंतर जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांनी त्यातील २ टक्के लाभार्थ्यांची तपासणी करायची आहे ज्यांच्याकडे घरच नाही, जो बेघर आहे, किंवा ज्याचे अगदी मातीचे घर आहे, अशांसाठी ही योजना असल्याने पळवाटा काढून घर घेणाºयांना या छाननीमध्ये अपात्रतेचा झटका बसणार आहे.ग्रामपंचायत निवडणुकीमुळे या कामात शैथिल्य आले होते. मात्र डिसेंबर २0१७ पर्यंत हे काम पूर्ण करावयाचे असल्याने आता तातडीने हे सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी गटविकास अधिकाºयांना दिले आहेत.वडिलांच्या मालमत्तेत वाटा नसल्याचे करावे लागणार जाहीरअनेकांनी एकत्र कुटुंब असताना घर नसल्याचे अर्ज दिले आहेत. मात्र, वारसा हक्काने त्यांना घर, शेती मिळणार असल्याने अशांना आपण बेघर असल्याचे सिद्ध करावे लागणार असून, वडिलांच्या मालमत्तेत आपला वाटा राहणार नसल्याचे जाहीर करावे लागणार आहे. ज्यांच्याकडे घरच नाही, जो बेघर आहे, किंवा ज्याचे अगदी मातीचे घर आहे, अशांसाठी ही योजना असल्याने पळवाटा काढून घर घेणाºयांना या छाननीमध्ये अपात्रतेचा झटका बसणार आहे.मिळालं तर मिळालंज्यांचे घरकुल नाही, कच्चे घरकुल आहे त्यांनी अर्ज करा, असे आवाहन केल्यानंतर एकाच घरातील दोन, तीन भावांनी स्वतंत्रपणे अर्ज केल्याची उदाहरणे समोर आली आहेत.‘मिळालं तर मिळालंं’ या भावनेतून हे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळेच बारा तालुक्यातील दीड लाखांपेक्षा अधिक अर्ज जमा होण्याचे हेच कारण आहे.तालुका ग्रामसभेतून ग्रामसभेव्यतिरिक्त एकूण अर्जआलेले अर्ज आलेले अर्जआजरा ७३३२ २२0 ७५५२भुदरगड १३५४७ १ १३५४८चंदगड ९२५४ 0 ९२५४गडहिंग्लज १00८७ ९७0 ११0५७गगनबावडा २0६७ ३ २0७0करवीर २२८२२ १५७ २२९७९शिरोळ १२२१४ ५६६ १२७८0कागल १0४९0 0 १0४९0पन्हाळा ६२६८ ४७४२ ११0१0राधानगरी १५0२३ 0 १५0२३शाहूवाडी ८0२८ १९५१ ९९७९हातकणंगले २४२५0 ६१८५ ३0४३५एकूण १४१३८५ १४७९९ १५६१८२

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर