शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील राजेंद्रनगरात पुन्हा टोळीयुद्धाचा भडका, वर्चस्ववादाचा संघर्ष; पोलिसांसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 12:45 IST

राजेंद्रनगर परिसरात वाढलेली झोपडपट्टी गुन्हेगारांचा अड्डा बनली आहे.

कोल्हापूर : राजेंद्रनगरचा इतिहास तसा रक्तरंजितच आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार खंडू कांबळे, सौदागर कांबळे अशा अनेक गुंडांची दहशत या परिसराने अनुभवली आहे. पोलिसांनी प्रमुख गुंडांच्या मुसक्या आवळल्यानंतर गेल्या तीन-चार वर्षांपासून हा परिसर काहीसा शांत होता. मात्र, नव्याने निर्माण झालेल्या गुंडांच्या टोळ्यांमधील संघर्षामुळे राजेंद्रनगरात पुन्हा गुन्हेगारी फोफावली आहे.

राजेंद्रनगर परिसरात वाढलेली झोपडपट्टी गुन्हेगारांचा अड्डा बनली आहे. हातावरचे पोट असलेली शेकडो कुटुंब या परिसरात दाटीवाटीने राहतात. अल्पशिक्षण, संस्कारांचा अभाव आणि खाण्या-पिण्याचे वांदे अशा कुटुंबातील अनेक तरुण झटपट पैसा कमविण्याच्या नादात अवैध धंद्यांमध्ये गुंतले आहेत. बेकायदेशीर दारू विक्री, गांजाची तस्करी, विक्री, प्लॉटचे व्यवहार करणे, खासगी सावकारी आणि व्यावसायिकांना धमकावून पैसे उकळणारा रोज नवा गुंड या परिसरात तयार होत आहे. अगदी १८-२० वर्षांचे तरुण टोळ्या तयार करून आपली दहशत वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच राजेंद्रनगरात मारामारी, दमदाटी, जमावाकडून दहशत निर्माण करण्याचे गुन्हे वाढले आहेत.

पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार खंडू कांबळे, सौदागर कांबळे यांच्यासह काही गुंडांवर कारवाई झाल्यानंतर राजेंद्रनगरातील गुंडगिरीचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. मात्र, चार वर्षांपूर्वी काही नव्या टोळ्या उदयाला आल्या. कुमार गायकवाड यानेही कमी वयात आपली स्वतंत्र टोळी तयार करून परिसरात दबदबा निर्माण केला होता. मारामारी आणि दमदाटीच्या गुन्ह्यांमध्ये त्याची कारागृहातही रवानगी झाली होती.

वर्षभरापूर्वी तडीपारीचा कालावधी संपल्यानंतर त्याने राजेंद्रनगरात पुन्हा आपले बस्तान बसवले होते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासह काही तरुणांच्या वाढदिवसांमधून त्याने आपला दबदबा वाढवला होता. परिसरातील एका गुंडाला मारहाण केल्याचाही आरोप त्याच्यावर होता. त्यातूनच कुमार गायकवाडचा काटा काढल्याची चर्चा सुरू आहे. तसेच एका राजकीय पक्षासोबतही त्याची जवळीक वाढली होती.

पुन्हा भडका

कुमार गायकवाडच्या खुनामुळे राजेंद्रनगरातील टोळीयुद्धाचा पुन्हा भडका उडाला असून, त्यातून आणखी रक्तपात होण्याची भीती पोलिसांकडून वर्तविली जात आहे. गुंडांच्या टोळीयुद्धामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. गुंडांच्या दहशतीमुळे राजेंद्रनगरातील प्लॉट खरेदी-विक्रीचे अनेक व्यवहार ठप्प आहेत.

पोलिसांसमोर आव्हान

राजेंद्रनगरात भुरट्या गुंडांची भाईगिरी आणि अवैध धंदे फोफावले आहेत. याला वेळीच आळा घातला नाही, तर गुंडगिरी मोडून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस