शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

कोल्हापुरातील राजेंद्रनगरात पुन्हा टोळीयुद्धाचा भडका, वर्चस्ववादाचा संघर्ष; पोलिसांसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 12:45 IST

राजेंद्रनगर परिसरात वाढलेली झोपडपट्टी गुन्हेगारांचा अड्डा बनली आहे.

कोल्हापूर : राजेंद्रनगरचा इतिहास तसा रक्तरंजितच आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार खंडू कांबळे, सौदागर कांबळे अशा अनेक गुंडांची दहशत या परिसराने अनुभवली आहे. पोलिसांनी प्रमुख गुंडांच्या मुसक्या आवळल्यानंतर गेल्या तीन-चार वर्षांपासून हा परिसर काहीसा शांत होता. मात्र, नव्याने निर्माण झालेल्या गुंडांच्या टोळ्यांमधील संघर्षामुळे राजेंद्रनगरात पुन्हा गुन्हेगारी फोफावली आहे.

राजेंद्रनगर परिसरात वाढलेली झोपडपट्टी गुन्हेगारांचा अड्डा बनली आहे. हातावरचे पोट असलेली शेकडो कुटुंब या परिसरात दाटीवाटीने राहतात. अल्पशिक्षण, संस्कारांचा अभाव आणि खाण्या-पिण्याचे वांदे अशा कुटुंबातील अनेक तरुण झटपट पैसा कमविण्याच्या नादात अवैध धंद्यांमध्ये गुंतले आहेत. बेकायदेशीर दारू विक्री, गांजाची तस्करी, विक्री, प्लॉटचे व्यवहार करणे, खासगी सावकारी आणि व्यावसायिकांना धमकावून पैसे उकळणारा रोज नवा गुंड या परिसरात तयार होत आहे. अगदी १८-२० वर्षांचे तरुण टोळ्या तयार करून आपली दहशत वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच राजेंद्रनगरात मारामारी, दमदाटी, जमावाकडून दहशत निर्माण करण्याचे गुन्हे वाढले आहेत.

पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार खंडू कांबळे, सौदागर कांबळे यांच्यासह काही गुंडांवर कारवाई झाल्यानंतर राजेंद्रनगरातील गुंडगिरीचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. मात्र, चार वर्षांपूर्वी काही नव्या टोळ्या उदयाला आल्या. कुमार गायकवाड यानेही कमी वयात आपली स्वतंत्र टोळी तयार करून परिसरात दबदबा निर्माण केला होता. मारामारी आणि दमदाटीच्या गुन्ह्यांमध्ये त्याची कारागृहातही रवानगी झाली होती.

वर्षभरापूर्वी तडीपारीचा कालावधी संपल्यानंतर त्याने राजेंद्रनगरात पुन्हा आपले बस्तान बसवले होते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासह काही तरुणांच्या वाढदिवसांमधून त्याने आपला दबदबा वाढवला होता. परिसरातील एका गुंडाला मारहाण केल्याचाही आरोप त्याच्यावर होता. त्यातूनच कुमार गायकवाडचा काटा काढल्याची चर्चा सुरू आहे. तसेच एका राजकीय पक्षासोबतही त्याची जवळीक वाढली होती.

पुन्हा भडका

कुमार गायकवाडच्या खुनामुळे राजेंद्रनगरातील टोळीयुद्धाचा पुन्हा भडका उडाला असून, त्यातून आणखी रक्तपात होण्याची भीती पोलिसांकडून वर्तविली जात आहे. गुंडांच्या टोळीयुद्धामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. गुंडांच्या दहशतीमुळे राजेंद्रनगरातील प्लॉट खरेदी-विक्रीचे अनेक व्यवहार ठप्प आहेत.

पोलिसांसमोर आव्हान

राजेंद्रनगरात भुरट्या गुंडांची भाईगिरी आणि अवैध धंदे फोफावले आहेत. याला वेळीच आळा घातला नाही, तर गुंडगिरी मोडून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस