शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

कोल्हापुरातील राजेंद्रनगरात पुन्हा टोळीयुद्धाचा भडका, वर्चस्ववादाचा संघर्ष; पोलिसांसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 12:45 IST

राजेंद्रनगर परिसरात वाढलेली झोपडपट्टी गुन्हेगारांचा अड्डा बनली आहे.

कोल्हापूर : राजेंद्रनगरचा इतिहास तसा रक्तरंजितच आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार खंडू कांबळे, सौदागर कांबळे अशा अनेक गुंडांची दहशत या परिसराने अनुभवली आहे. पोलिसांनी प्रमुख गुंडांच्या मुसक्या आवळल्यानंतर गेल्या तीन-चार वर्षांपासून हा परिसर काहीसा शांत होता. मात्र, नव्याने निर्माण झालेल्या गुंडांच्या टोळ्यांमधील संघर्षामुळे राजेंद्रनगरात पुन्हा गुन्हेगारी फोफावली आहे.

राजेंद्रनगर परिसरात वाढलेली झोपडपट्टी गुन्हेगारांचा अड्डा बनली आहे. हातावरचे पोट असलेली शेकडो कुटुंब या परिसरात दाटीवाटीने राहतात. अल्पशिक्षण, संस्कारांचा अभाव आणि खाण्या-पिण्याचे वांदे अशा कुटुंबातील अनेक तरुण झटपट पैसा कमविण्याच्या नादात अवैध धंद्यांमध्ये गुंतले आहेत. बेकायदेशीर दारू विक्री, गांजाची तस्करी, विक्री, प्लॉटचे व्यवहार करणे, खासगी सावकारी आणि व्यावसायिकांना धमकावून पैसे उकळणारा रोज नवा गुंड या परिसरात तयार होत आहे. अगदी १८-२० वर्षांचे तरुण टोळ्या तयार करून आपली दहशत वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच राजेंद्रनगरात मारामारी, दमदाटी, जमावाकडून दहशत निर्माण करण्याचे गुन्हे वाढले आहेत.

पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार खंडू कांबळे, सौदागर कांबळे यांच्यासह काही गुंडांवर कारवाई झाल्यानंतर राजेंद्रनगरातील गुंडगिरीचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. मात्र, चार वर्षांपूर्वी काही नव्या टोळ्या उदयाला आल्या. कुमार गायकवाड यानेही कमी वयात आपली स्वतंत्र टोळी तयार करून परिसरात दबदबा निर्माण केला होता. मारामारी आणि दमदाटीच्या गुन्ह्यांमध्ये त्याची कारागृहातही रवानगी झाली होती.

वर्षभरापूर्वी तडीपारीचा कालावधी संपल्यानंतर त्याने राजेंद्रनगरात पुन्हा आपले बस्तान बसवले होते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासह काही तरुणांच्या वाढदिवसांमधून त्याने आपला दबदबा वाढवला होता. परिसरातील एका गुंडाला मारहाण केल्याचाही आरोप त्याच्यावर होता. त्यातूनच कुमार गायकवाडचा काटा काढल्याची चर्चा सुरू आहे. तसेच एका राजकीय पक्षासोबतही त्याची जवळीक वाढली होती.

पुन्हा भडका

कुमार गायकवाडच्या खुनामुळे राजेंद्रनगरातील टोळीयुद्धाचा पुन्हा भडका उडाला असून, त्यातून आणखी रक्तपात होण्याची भीती पोलिसांकडून वर्तविली जात आहे. गुंडांच्या टोळीयुद्धामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. गुंडांच्या दहशतीमुळे राजेंद्रनगरातील प्लॉट खरेदी-विक्रीचे अनेक व्यवहार ठप्प आहेत.

पोलिसांसमोर आव्हान

राजेंद्रनगरात भुरट्या गुंडांची भाईगिरी आणि अवैध धंदे फोफावले आहेत. याला वेळीच आळा घातला नाही, तर गुंडगिरी मोडून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस