शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवर आता आंदोलनास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 17:17 IST

चौदाव्या वित्त आयोगाच्या शिल्लक निधीवरील व्याज कपात करून घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात निवेदने, विनंत्या करून प्रश्न सुटत नसल्याने अखेर राज्य सरपंच संघटनेने आता थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला

ठळक मुद्देचौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवर आता आंदोलनास्त्रराज्य सरपंच संघटना आक्रमक : जिल्हा परिषदेसमोर सोमवारी (१७) आंदोलन

कोल्हापूर : चौदाव्या वित्त आयोगाच्या शिल्लक निधीवरील व्याज कपात करून घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात निवेदने, विनंत्या करून प्रश्न सुटत नसल्याने अखेर राज्य सरपंच संघटनेने आता थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारी (दि. १७) जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदवला जाणार आहे.राज्य सरपंच संघटनेची ऑनलाईन बैठक झाली. भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या प्रमुख सहभागात झालेल्या या बैठकीत आंदोलनाचा निर्णय जाहीर करण्यात आला. बैठकीत व्याज मागणीबरोबरच ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणूक, डाटा ऑपरेटर या विषयांवरही चर्चा झाली.

या चर्चेत संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष राणी पाटील, जिल्हाध्यक्ष सागर माने, भूषण पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर, हेमंत कोलेकर, विजय भोजे, शिवाजी मोरे, पंचायत समिती सदस्य रविराज चौगुले, अमोल चव्हाण, राजू पोतनीस, संभाजी सरदेसाई, तानाजी पाटील, उदय चव्हाण, राजू मगदूम, प्रताप पाटील, संध्या पाटील यांनी भाग घेतला.बाजार समितीवर मर्जीतील प्रशासक; मग ग्रामपंचायतीवर का नाही?मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमताना शासनाकडून संभ्रम निर्माण केला जात आहे. काही ठिकाणी प्रशासकीय अनुभव नसलेल्या शासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीवर तातडीने सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील प्रशासक मंडळ नेमले आहे. त्यांच्यापेक्षा ग्रामपंचायतीचे व्यवस्थापन शासनास महत्त्वाचे वाटत नाही का? असा संतापजनक सवाल यावेळी सदस्यांनी उपस्थित केला.दुजाभाव खपवून घेतला जाणार नाहीशासनाचा १४ व्या वित्त आयोगातील रकमेवर डोळा आहे, तर पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमध्येही दुजाभाव केला जात आहे. केंद्र सरकारचा पैसा असताना यात असा दुजाभाव सहन केला जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेतील भाजपच्या सदस्यांनी या बैठकीत दिला.

मदत करण्याऐवजी ग्रामपंचायतींच्या हक्काचा निधी शासन जमा करून घेणे चुकीचे आहे. ही रक्कम ग्रामपंचायतीकडे राहिल्यास गावपातळीवर दैनंदिन अडचणी सोडविण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या हक्काची ही रक्कम त्यांना परत मिळायला हवी.-समरजित घाटगे, जिल्हाध्यक्ष, भाजप

टॅग्स :sarpanchसरपंचSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेBJPभाजपाkolhapurकोल्हापूर