शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

शाहू महाराजांच्या ऋणात राहण्यातच आनंद- कैलासचंद्र पटेल : राजर्षी कृतज्ञता परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 13:12 IST

राजर्षी शाहू महाराजांनी १०० वर्षांपूर्वी सर्व समाजांच्या उद्धाराचे कार्य केले. त्याकाळी कोणतीही दळणवळणाची साधने नसताना एक राजा १५०० किलोमीटर दूरचा प्रवास करून, कानपूरसारख्या गावातील कुर्मी समाजाने दिलेली ‘राजर्षी’ पदवी स्वीकारतो हे महाराजांनी आमच्यावर केलेले ऋण आहे. त्यांनी केलेल्या कार्याच्या आणि स्नेहाच्या धाग्याने कोल्हापूर आणि उत्तरप्रदेश जोडले आहे. आपल्या ऋणात राहण्यातच आम्हाला आनंद आहे. महाराजांच्या विचारांनीच देशाची प्रगती होईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे मंडल अध्यक्ष कैलासचंद्र पटेल यांनी केले.

ठळक मुद्देशाहू महाराजांच्या ऋणात राहण्यातच आनंद- कैलासचंद्र पटेल : राजर्षी कृतज्ञता परिषद

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी १०० वर्षांपूर्वी सर्व समाजांच्या उद्धाराचे कार्य केले. त्याकाळी कोणतीही दळणवळणाची साधने नसताना एक राजा १५०० किलोमीटर दूरचा प्रवास करून, कानपूरसारख्या गावातील कुर्मी समाजाने दिलेली ‘राजर्षी’ पदवी स्वीकारतो हे महाराजांनी आमच्यावर केलेले ऋण आहे. त्यांनी केलेल्या कार्याच्या आणि स्नेहाच्या धाग्याने कोल्हापूर आणि उत्तरप्रदेश जोडले आहे. आपल्या ऋणात राहण्यातच आम्हाला आनंद आहे. महाराजांच्या विचारांनीच देशाची प्रगती होईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे मंडल अध्यक्ष कैलासचंद्र पटेल यांनी केले.शाहू स्मारक भवनात राजर्षी शाहू सामाजिक सलोखा मंच व अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित ‘राजर्षी कृतज्ञता परिषदे’त ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार व डॉ. रमेश जाधव यांना ‘राजर्षी शाहू विचार पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे डॉ. राजकुमार सचान, अ‍ॅड. शशिकांत सचान, संजेशकुमार कटियार, गणी आजरेकर उपस्थित होते.पटेल म्हणाले, बहुजनांना शिक्षण, स्त्रीउद्धार, जातिभेदांचा नाश करण्यासाठी झटणारे शाहू महाराज सर्वसमावेशक विकासाचे रोल मॉडेल होते. त्याकाळी ब्रिटिशांसोबत संघर्ष करत असलेल्या कुर्मी समाजाकडून त्यांनी सन्मान स्वीकारला, त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. अलौकिक प्रतिभा आणि त्यागातूनच ते राजर्षी झाले. आज जातीच्या आधारावर देशाचे राजकारण आणि शिक्षण आधारलेले असताना महाराजांच्या विचाराने देशाची वाटचाल होणे आवश्यक आहे. त्यांच्या कार्याचा आणि कोल्हापूरचा वारसा भारतभर पोहोचावा.यावेळी महापौर सरिता मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. उपमहापौर भूपाल शेटे म्हणाले, शाहू महाराजांनी ५५० एकर जागा कुष्ठरोग्यांसाठी दिली. ही जागा धनदांडग्यांनी बळकावण्याचा प्रयत्न झाला. मात्र आम्ही तो हाणून पाडला. आता नर्सरी बागेतील शाहूराजांच्या समाधिस्थळासाठी शासनाने दमडीची मदत केली नाही. महापालिकेने आतापर्यंत तीन कोटी रुपये खर्च केले असून, सात कोटी रुपयांच्या निधीतून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे समाधिस्थळ होईल.अ‍ॅड. शशिकांत सचान म्हणाले, कानपूर महाविद्यालयाला शाहूंचे नाव देण्यात आले आहे. हे महाविद्यालय नेत्रदीपक प्रगती करीत आहे. मात्र कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याबद्दल इतिहासकारांनी फार लिहिले नाही, याचा खेद आहे. अध्यक्षीय भाषणात शाहू छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वापर भाषणांपुरता न करता प्रत्येकाने ते आचरणात आणले पाहिजेत. जातीच्या राजकारणावरून समाजात फूट पडत असताना सर्वांनी एकोपा राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.यावेळी व्यंकाप्पा भोसले, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, माजी महापौर भिकशेट पाटील, सतीश रणदिवे, डॉ. पद्मा पाटील, गंगाराम कांबळे कुटुंबीय यांना राजर्षी शाहू सन्मान देऊन गौरविण्यात आले. तसेच शाहू महाराजांनी स्थापन केलेली वसतिगृहे, संस्था, संशोधन केंद्रे या संस्थांचा राजर्षी शाहू सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. इंद्रजित सावंत यांनी परिषदेची रूपरेषा सांगितली. बबन रानगे यांनी स्वागत केले. निमंत्रक वसंत मुळीक यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पद्मा पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.

 

 

टॅग्स :Shahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंतीkolhapurकोल्हापूर