शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

कायद्यातील दुरुस्तीचा अर्थ अन् बँक पातळीवर संमभ्रावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेने नागरी बँकांच्या धोरणात केलेल्या बदलामुळे संमभ्रावस्था पसरली ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेने नागरी बँकांच्या धोरणात केलेल्या बदलामुळे संमभ्रावस्था पसरली आहे. सहकारी बँकांचे अध्यक्ष, संचालक हे पूर्णवेळ अथवा पगारी नाहीत, त्यामुळे कायदा दुरूस्तीचा परिणाम सध्याच्या प्रणालीवर होणार नाही. मात्र एकूण संचालकांपैकी ५१ टक्के संचालक हे व्यावसायिक पात्रता असणे गरजेचे आहेत. हे व्यावसायिक पात्रतेचे संचालक ग्रामीण कार्यक्षेत्रातून शोधताना नागरी बँक व्यवस्थापनाची दमछाक होणार हे निश्चित आहे.

सहकारी बँका या सामान्य माणसाच्या आर्थिक कणा आहेत. छोट्या छोट्या गरजा पूर्ण होत असल्याने समाजातील लहान वर्ग या बँकांचे सभासद असतात. मात्र अलिकडील पाच-दहा वर्षात रिझर्व्ह बँक व केंद्र सरकारचा सहकार क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. त्याला सहकारी बँका, पतसंस्थांतील अपहाराच्या घटना कारणीभूत असतीलही मात्र त्यामुळे सगळेच सहकार खराब म्हणणे चुकीचे आहे. त्यादृष्टीने पहिल्यांदा रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांवर व्यवस्थापकीय मंडळ आणण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर केंद्र सरकारने बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये मोठा फेरबदल करून नागरी बँकांना जखडून ठेवले.

नागरी बँकेमध्ये कार्यकारी संचालक, पूर्णवेळ संचालक होण्यासाठी काही किमान पात्रता धारण करणे बंधनकारक आहे. सरकारी बँकेमध्ये ज्याप्रमाणे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक असतात. या प्रमाणेच सहकारी बँकेमध्ये या पुढे असणार आहे. तथापि सध्या सहकारी बँकेचे अध्यक्ष हे पूर्णवेळ असत नाहीत. मात्र बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा मॅनेजिंग डायरेक्टर हे पूर्णवेळ संचालक असतात. सद्यस्थितीत नागरी बँकेमध्ये निवडून आलेल्या संचालकांपैकी मॅनेजिंग डायरेक्टर अथवा पूर्णवेळ संचालक नाही. त्यामुळे याबाबतची संमभ्रावस्था संपुष्टात येते. तरीही निवडून आलेल्या संचालकांमध्ये ५१ टक्के संचालक हे बँकिंग व्यवसायाशी अनुभवी असणे आवश्यक आहेत.

व्यावसायिक व्यक्ती संचालक मंडळात येणे कठीण

सध्याच्या संचालक मंडळात दोन तज्ज्ञ संचालक आहेत, मात्र बहुतांशी बँकांमध्ये मासिक मीटिंगलाही त्यांना उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे बँकांच्या कार्यक्षेत्रात व्यावसायिक संचालक भेटले तरी ते निवडणूक प्रक्रियेतून संचालक मंडळात येण्यास उत्सुक असणे अवघड आहे. ते वेळ देतील हे सांगता येणार नाही.

संचालकपदाचा कार्यकाल चुकीचा

कायद्यातील दुरुस्तीनुसार एका संचालकाला जास्तीत जास्त आठ वर्षे राहता येईल. संचालक मंडळाची टर्म ही पाच वर्षांची आहे, त्यामुळे एखादा दुसऱ्यांदा निवडून गेला तर तो तीन वर्षांनंतर आपोआपच अपात्र ठरणार असल्याने यावर बँकांनी आक्षेप घेतला आहे.

कोट-

बँकिंग कायद्यातील बदलामुळे नागरी बँकांना चाकोरीत राहूनच काम करावे लागणार आहे. व्यावसायिक संचालकांमुळे बँकेला फायदा होऊ शकेल, मात्र तेवढा वेळ देणारे मिळतील का? हा प्रश्न आहे.

- ॲड. प्रकाश देसाई (माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक यशवंत बँक, कुडित्रे)

नागरी बँकांमध्ये अध्यक्ष, संचालक हे पूर्णवेळ नसतात. त्यामुळे त्या नियमाचे थेट परिणाम होणार नाही. इतर दुरूस्त्यांबाबत सरकारच्या पातळीवर आमचे प्रयत्न सुरू आहेत.

- महेश धर्माधिकारी (सी. ए., उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशन)