शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

कायद्यातील दुरुस्तीचा अर्थ अन् बँक पातळीवर संमभ्रावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेने नागरी बँकांच्या धोरणात केलेल्या बदलामुळे संमभ्रावस्था पसरली ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेने नागरी बँकांच्या धोरणात केलेल्या बदलामुळे संमभ्रावस्था पसरली आहे. सहकारी बँकांचे अध्यक्ष, संचालक हे पूर्णवेळ अथवा पगारी नाहीत, त्यामुळे कायदा दुरूस्तीचा परिणाम सध्याच्या प्रणालीवर होणार नाही. मात्र एकूण संचालकांपैकी ५१ टक्के संचालक हे व्यावसायिक पात्रता असणे गरजेचे आहेत. हे व्यावसायिक पात्रतेचे संचालक ग्रामीण कार्यक्षेत्रातून शोधताना नागरी बँक व्यवस्थापनाची दमछाक होणार हे निश्चित आहे.

सहकारी बँका या सामान्य माणसाच्या आर्थिक कणा आहेत. छोट्या छोट्या गरजा पूर्ण होत असल्याने समाजातील लहान वर्ग या बँकांचे सभासद असतात. मात्र अलिकडील पाच-दहा वर्षात रिझर्व्ह बँक व केंद्र सरकारचा सहकार क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. त्याला सहकारी बँका, पतसंस्थांतील अपहाराच्या घटना कारणीभूत असतीलही मात्र त्यामुळे सगळेच सहकार खराब म्हणणे चुकीचे आहे. त्यादृष्टीने पहिल्यांदा रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांवर व्यवस्थापकीय मंडळ आणण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर केंद्र सरकारने बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये मोठा फेरबदल करून नागरी बँकांना जखडून ठेवले.

नागरी बँकेमध्ये कार्यकारी संचालक, पूर्णवेळ संचालक होण्यासाठी काही किमान पात्रता धारण करणे बंधनकारक आहे. सरकारी बँकेमध्ये ज्याप्रमाणे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक असतात. या प्रमाणेच सहकारी बँकेमध्ये या पुढे असणार आहे. तथापि सध्या सहकारी बँकेचे अध्यक्ष हे पूर्णवेळ असत नाहीत. मात्र बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा मॅनेजिंग डायरेक्टर हे पूर्णवेळ संचालक असतात. सद्यस्थितीत नागरी बँकेमध्ये निवडून आलेल्या संचालकांपैकी मॅनेजिंग डायरेक्टर अथवा पूर्णवेळ संचालक नाही. त्यामुळे याबाबतची संमभ्रावस्था संपुष्टात येते. तरीही निवडून आलेल्या संचालकांमध्ये ५१ टक्के संचालक हे बँकिंग व्यवसायाशी अनुभवी असणे आवश्यक आहेत.

व्यावसायिक व्यक्ती संचालक मंडळात येणे कठीण

सध्याच्या संचालक मंडळात दोन तज्ज्ञ संचालक आहेत, मात्र बहुतांशी बँकांमध्ये मासिक मीटिंगलाही त्यांना उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे बँकांच्या कार्यक्षेत्रात व्यावसायिक संचालक भेटले तरी ते निवडणूक प्रक्रियेतून संचालक मंडळात येण्यास उत्सुक असणे अवघड आहे. ते वेळ देतील हे सांगता येणार नाही.

संचालकपदाचा कार्यकाल चुकीचा

कायद्यातील दुरुस्तीनुसार एका संचालकाला जास्तीत जास्त आठ वर्षे राहता येईल. संचालक मंडळाची टर्म ही पाच वर्षांची आहे, त्यामुळे एखादा दुसऱ्यांदा निवडून गेला तर तो तीन वर्षांनंतर आपोआपच अपात्र ठरणार असल्याने यावर बँकांनी आक्षेप घेतला आहे.

कोट-

बँकिंग कायद्यातील बदलामुळे नागरी बँकांना चाकोरीत राहूनच काम करावे लागणार आहे. व्यावसायिक संचालकांमुळे बँकेला फायदा होऊ शकेल, मात्र तेवढा वेळ देणारे मिळतील का? हा प्रश्न आहे.

- ॲड. प्रकाश देसाई (माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक यशवंत बँक, कुडित्रे)

नागरी बँकांमध्ये अध्यक्ष, संचालक हे पूर्णवेळ नसतात. त्यामुळे त्या नियमाचे थेट परिणाम होणार नाही. इतर दुरूस्त्यांबाबत सरकारच्या पातळीवर आमचे प्रयत्न सुरू आहेत.

- महेश धर्माधिकारी (सी. ए., उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशन)