शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Kolhapur: नवरात्रौत्सवानिमित्त अंबाबाईच्या दागिन्यांना सुवर्ण झळाळी, विशेष अन् नित्य पूजेत वापरले जाणारे दागिने कोणते..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 19:20 IST

देवीच्या या पुरातन दागिन्यांच्या स्वच्छतेसाठी कोणत्याही केमिकलचा वापर केला जात नाही

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या नित्य व नैमित्तिक अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. किरीट गदा, चिंचपेटी, बोरमाळ, ठुशी या अलंकारांसह सोन्याची पालखी, सोन्याचे मोर्चेल, सोन्याचा सिंह, गदा यांनाही सुवर्ण झळाळी आली.देवीच्या या पुरातन दागिन्यांच्या स्वच्छतेसाठी कोणत्याही केमिकलचा वापर केला जात नाही. फक्त रिठ्याचे पाणी आणि बारीक वाळूच्या साह्याने दागिन्यांचा लखलखाट आणला जातो. आज शुक्रवारी अंबाबाईच्या पूजेत वापरल्या जाणाऱ्या चांदीच्या वस्तूंची स्वच्छता केली जाणार आहे.शारदीय नवरात्रौत्सवाला आता तीन दिवस राहिल्याने कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील तयारीदेखील अंतिम टप्प्यात आली आहे. वर्षातून एकदा नवरात्रौत्सवानिमित्त देवीच्या खजिन्यातील सर्व अलंकारांची स्वच्छता केली जाते. अंबाबाईच्या खजिन्यात आदिलशाही काळातील, यादव, शिलाहारकालीन तसेच ऐतिहासिक दागिने आहे.सोन्याचे दागिने वर्षभरातील रोजच्या पूजेत वापरले जातात. तर रत्नजडित अलंकार हे नवरात्रौत्सवात तसेच विशेष सालंकृत पूजेसाठी वापरले जातात. या दोन्ही वापरातील अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. अंबाबाईच्या खजिन्याचे हवालदार महेश खांडेकर यांच्या देखरेखीखाली महेश कडणे यांच्यासह गजानन कवठेकर, दादा कवठेकर व कारागिरांनी ही स्वच्छता केली. आज शुक्रवारी चांदीच्या साहित्याची स्वच्छता केली जाईल.

अंबाबाईच्या नित्य पूजेत वापरले जाणारे दागिनेसोन्याचे किरीट, गदा, पावले, चिंचपेटी, बोरमाळ, कंठी, मंगळसूत्र, नथ, कानाचे मोरक्षी, कुंडले, बोरमाळ, मोहराची माळ, चंद्रहार, चाफेकळी हार, ठुशी, म्हाळूंग, कवड्याची माळ, सिंह

विशेष पूजेत वापरले जाणारे दागिनेनवरत्नांचे जडावाचे किरी, जडावाचे मोरपक्षी, कुंडल, चिंचपेटी, पेंडल, लप्पा हार, सात पदरी कंठी, सोळा पदरी कंठी, श्रीयंत्र, मोत्याची माळ.

लाकडी रॅम्पअंबाबाई मंदिरात जाताना महाकाली मंदिरापासून ते कासव चौक, सरस्वती मंदिरापर्यंत लाकडी रॅम्प करण्यात येत आहे. मंदिरातील खालचे दगड खाली-वर असल्याने भाविकांचा तोल जाऊ नये म्हणून हे रॅम्प बनवण्यात येत आहेत.

दक्षिण दरवाजासमोर गेटअंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजाबाहेर अनेक चारचाकी वाहने येत असल्याने भाविकांना फिरण्यासाठी जागा राहत नाही. त्यामुळे येथे मोठे गेट तसेच उभे खांब बसवले आहेत.