शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

Kolhapur: नवरात्रौत्सवानिमित्त अंबाबाईच्या दागिन्यांना सुवर्ण झळाळी, विशेष अन् नित्य पूजेत वापरले जाणारे दागिने कोणते..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 19:20 IST

देवीच्या या पुरातन दागिन्यांच्या स्वच्छतेसाठी कोणत्याही केमिकलचा वापर केला जात नाही

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या नित्य व नैमित्तिक अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. किरीट गदा, चिंचपेटी, बोरमाळ, ठुशी या अलंकारांसह सोन्याची पालखी, सोन्याचे मोर्चेल, सोन्याचा सिंह, गदा यांनाही सुवर्ण झळाळी आली.देवीच्या या पुरातन दागिन्यांच्या स्वच्छतेसाठी कोणत्याही केमिकलचा वापर केला जात नाही. फक्त रिठ्याचे पाणी आणि बारीक वाळूच्या साह्याने दागिन्यांचा लखलखाट आणला जातो. आज शुक्रवारी अंबाबाईच्या पूजेत वापरल्या जाणाऱ्या चांदीच्या वस्तूंची स्वच्छता केली जाणार आहे.शारदीय नवरात्रौत्सवाला आता तीन दिवस राहिल्याने कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील तयारीदेखील अंतिम टप्प्यात आली आहे. वर्षातून एकदा नवरात्रौत्सवानिमित्त देवीच्या खजिन्यातील सर्व अलंकारांची स्वच्छता केली जाते. अंबाबाईच्या खजिन्यात आदिलशाही काळातील, यादव, शिलाहारकालीन तसेच ऐतिहासिक दागिने आहे.सोन्याचे दागिने वर्षभरातील रोजच्या पूजेत वापरले जातात. तर रत्नजडित अलंकार हे नवरात्रौत्सवात तसेच विशेष सालंकृत पूजेसाठी वापरले जातात. या दोन्ही वापरातील अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. अंबाबाईच्या खजिन्याचे हवालदार महेश खांडेकर यांच्या देखरेखीखाली महेश कडणे यांच्यासह गजानन कवठेकर, दादा कवठेकर व कारागिरांनी ही स्वच्छता केली. आज शुक्रवारी चांदीच्या साहित्याची स्वच्छता केली जाईल.

अंबाबाईच्या नित्य पूजेत वापरले जाणारे दागिनेसोन्याचे किरीट, गदा, पावले, चिंचपेटी, बोरमाळ, कंठी, मंगळसूत्र, नथ, कानाचे मोरक्षी, कुंडले, बोरमाळ, मोहराची माळ, चंद्रहार, चाफेकळी हार, ठुशी, म्हाळूंग, कवड्याची माळ, सिंह

विशेष पूजेत वापरले जाणारे दागिनेनवरत्नांचे जडावाचे किरी, जडावाचे मोरपक्षी, कुंडल, चिंचपेटी, पेंडल, लप्पा हार, सात पदरी कंठी, सोळा पदरी कंठी, श्रीयंत्र, मोत्याची माळ.

लाकडी रॅम्पअंबाबाई मंदिरात जाताना महाकाली मंदिरापासून ते कासव चौक, सरस्वती मंदिरापर्यंत लाकडी रॅम्प करण्यात येत आहे. मंदिरातील खालचे दगड खाली-वर असल्याने भाविकांचा तोल जाऊ नये म्हणून हे रॅम्प बनवण्यात येत आहेत.

दक्षिण दरवाजासमोर गेटअंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजाबाहेर अनेक चारचाकी वाहने येत असल्याने भाविकांना फिरण्यासाठी जागा राहत नाही. त्यामुळे येथे मोठे गेट तसेच उभे खांब बसवले आहेत.