शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
5
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
6
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
7
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
8
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
9
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
10
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
11
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
12
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
13
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
14
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
15
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
16
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
17
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
18
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
19
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
20
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात

कोल्हापूर हद्दवाढ: 'ती' पाच गावे घोषित करा, लोक घरात घुसतील; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 12:46 IST

सतेज पाटील यांनी ही घोषणा फक्त १२ एप्रिलपर्यंत आहे की नेहमीची आहे, राजकीय आहे की मनापासून आहे हे स्पष्ट करावे.

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना हद्दवाढीची घोषणा करुन पालकमंत्र्यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. तरीही हद्दवाढ गरजेची असल्याने आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. फक्त सतेज पाटील यांनी ही घोषणा फक्त १२ एप्रिलपर्यंत आहे की नेहमीची आहे, राजकीय आहे की मनापासून आहे हे स्पष्ट करावे. हद्दवाढीत येणाऱ्या पाच गावांची नावेही सांगावीत म्हणजे लोक त्यांच्या घरात घुसतील की नाही हे बघाच असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी लगावला.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी हद्दवाढीचे संकेत देऊन चार-पाच गावांचा समावेश करण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यासंबंधी बोलताना आमदार पाटील म्हणाले, मतदारांना आकृष्ट करणारी कोणतीही घोषणा आचारसंहितेच्या काळात करता येत नाही. पण कोल्हापूरची हद्दवाढ होणे गरजेचे आहे. अन्यथा भौगोलिक लोकसंख्या वाढीचे फायदे, केंद्र व राज्य शासनाच्या योजना, स्मार्ट सिटी सारख्या योजनांचा लाभ कोल्हापूरला मिळणार नाही. त्यामुळे आमचा हद्दवाढीला पूर्ण पाठिंबा आहे.

ही निवडणूक संपली की जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. ग्रामीण भागातील लोक हद्दवाढीला विरोध करतात. तेथील निवडणुकीच्या वेळी हे ग्रामीण जनतेची बाजू घेतात. भाजप सत्तेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हद्दवाढीचा प्रयत्न केला,तेव्हा यांनी ग्रामीण भागातील लोकांना विरोधासाठी उठवून बसवले. शेवटी फडणवीस यांनी प्राधिकरण करून विषय पूर्णपणे संपविला. त्यामुळे सतेज पाटील यांनी आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटील