शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपीपेक्षा जास्त दर देण्याची कारखान्यांना मुभा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:29 IST

विश्वास पाटील लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : साखर कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे अडचणीचे ठरत असल्याने तीन-दोन हप्त्यात द्यावी, अशी ...

विश्वास पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : साखर कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे अडचणीचे ठरत असल्याने तीन-दोन हप्त्यात द्यावी, अशी शिफारस करणाऱ्या अभ्यास गटाने, एखाद्या कारखान्यास एफआरपीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना द्यायची झाल्यास त्याचीही मुभा दिली आहे. फक्त तसे करण्यापूर्वी कारखान्याने हा दर आणि तोडणी-ओढणी खर्च निश्चित करावा व निश्चित केलेल्या दराची माहिती शेतकऱ्यांना हंगाम सुरू होण्यापूर्वी देणे बंधनकारक केले आहे.

एफआरपी देण्याबाबत कारखान्यांना मुभा दिली, तर कारखान्यांमध्ये स्पर्धा लागत असल्याचा यापूर्वीचा मुख्यत: कोल्हापूर जिल्ह्यातील अनुभव आहे. ऊस दराची कोंडी तयार झाल्यावर यापूर्वी दत्त-शिरोळ, जवाहर, मंडलिक या कारखान्यांनी त्यांना परवडतो तो दर जाहीर केला आहे. त्यामुळे इतर कारखान्यांना त्यांच्यामागे आर्थिकदृष्ट्या फरफटत जावे लागले आहे. दर बसत नसतानाही शेतकऱ्यांच्या दबावापोटी तो द्यावा लागला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे सध्या दोन्ही महाविकास आघाडीपासून दोन हात लांब आहेत. पूरग्रस्तांच्या नुकसानीसाठी मोर्चा काढून त्यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे यंदा एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी आक्रमक होणार, हे निश्चितच आहे. त्यामुळे अभ्यास गटाच्या शिफारशी प्रत्यक्षात कितपत अमलात येतात, हे ऑक्टोबरअखेरीस स्पष्ट होईल.

केंद्र शासनाच्या पातळीवर नीती आयोगाचा टास्क फोर्स व कृषिमूल्य आयोगाने टप्प्या-टप्प्याने एफआरपी देण्याबाबत केेंद्र शासनास शिफारस केली आहे. त्याबाबतचा निर्णय झाल्यानंतरच महाराष्ट्र (कारखान्यांना पुरविण्यात आलेल्या) ऊस दराचे विनियमन अधिनियम २०१३ आणि त्याखालील नियम २०१६ मधील तरतुदीबाबत कायद्यात सुधारणा करणे योग्य वाटते, असे हा अभ्यास गट म्हणतो. विविध न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांचे अवलोकन करता, सर्व ऊस पुरवठादारांना एकसमान ऊसदर देणे बंधनकारक राहील. हंगामाच्या सुरुवातीसच जो दर जाहीर करतील, तोच दर संपूर्ण हंगामात देणे बंधनकारक राहील, अशीही शिफारस करण्यात आली आहे. ज्या कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीसाठी उसाचा रस, सिरप, बी हेवी मोलॅॅसिसचा वापर केला आहे, अशा कारखान्यांनी साखर उतारा निश्चित करताना मोलॅॅसिसचा वापर केल्यामुळे आलेली साखर उताऱ्यातील घट विचारात घ्यावी, असेही या अभ्यास गटाने सुचविले आहे.

एफआरपी नाही तर परवाना नाही...

गत हंगामात महाराष्ट्रातील ४७ कारखाने बंद राहिले, तर तेवढ्याच कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही. मंत्री समितीने, या कारखान्यांना यंदाच्या हंगामात गाळप परवाना देऊ नये, असे जाहीर केले आहे. या निर्णयाशी शासन कितपत प्रामाणिक राहते, याबद्दल साशंकता आहे. हे कारखाने बंद राहिले, तर ऊस शिल्लक राहतो असे चित्र तयार केले जाते. काही जिल्ह्यांत ही स्थिती होऊ शकते. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ऊस आहे व तिथे विठ्ठल व भीमा कारखान्यास परवाना मिळाला नाही, तर शेजारच्या कारखान्यांना या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील सगळाच ऊस गाळप करणे शक्य होणार नाही.