शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

CoronaVirus In Kolhapur : जिल्ह्यातील सर्व निर्बंध कायम,जिल्हा प्रशासनाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 20:02 IST

CoronaVirus In Kolhapur : मागील आठवड्याभरात कोल्हापूर जिल्ह्यातील पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या व ऑक्सीजनवर असलेल्या रुग्णांची संख्या कमी न झाल्याने जिल्हा प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील सध्या सुरू असलेले सर्व निर्बंध कायम ठेवले आहेत, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी सायंकाळी याबाबतचे आदेश काढले. सध्याचे निर्बंध १५ जूनपर्यंत आहेत परंतू रुग्णसंख्येचा आढावा प्रत्येक गुरुवारी (दि.१७) घेतला जातो व त्यानंतर शुक्रवारी जिल्हा प्रशासन निर्णय घेते. त्यामुळे कोल्हापूरच्या निर्बंधाबाबत पुढील शुक्रवारीच निर्णय होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सर्व निर्बंध कायम,जिल्हा प्रशासनाचे आदेश सध्या सुरू असलेल्या सेवांना परवानगी

कोल्हापूर : मागील आठवड्याभरात कोल्हापूर जिल्ह्यातील पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या व ऑक्सीजनवर असलेल्या रुग्णांची संख्या कमी न झाल्याने जिल्हा प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील सध्या सुरू असलेले सर्व निर्बंध कायम ठेवले आहेत, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी सायंकाळी याबाबतचे आदेश काढले. सध्याचे निर्बंध १५ जूनपर्यंत आहेत परंतू रुग्णसंख्येचा आढावा प्रत्येक गुरुवारी (दि.१७) घेतला जातो व त्यानंतर शुक्रवारी जिल्हा प्रशासन निर्णय घेते. त्यामुळे कोल्हापूरच्या निर्बंधाबाबत पुढील शुक्रवारीच निर्णय होण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांची चार स्तरांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. ही विभागणी मागील आठवड्यातील पॉझीटिव्ह रेट व ऑक्सीजन बेडवरील रुग्ण यावरुन ठरवली जाते. कोल्हापुरात ४ ते १० जून या आठवड्यात पॉझीटिव्ह रेट १० टक्के पेक्षा जास्त व २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर ऑक्सीजन बेडवरील रुग्ण ६० टक्केपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी स्तर ४ चे निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहेत. यानुसार सध्या सुरू असलेले सर्व निर्बंध कायम राहतील.याअंतर्गत सध्या सुरू असलेल्या अत्यावश्यक सेवांना सकाळी ७ ते दुपारी ४ यावेळेत परवानगी राहील. केशकर्तनालये, व्यायामशाळा, स्पा, ब्युटी पालर्र, वेलनेस सेंटर हे ५० टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील. मॉर्निंग वॉक, मैदानी खेळ यासाठी सकाळी ९ वाजेपर्यंत परवानगी असेल. शुक्रवारी सायंकाळ पासून ते रविवारपर्यंत नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय फिरता येणार नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर