शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गायरानातील एकाही घराला हात लावू देणार नाही, कोल्हापुरात सर्वपक्षीय मोर्चाव्दारे प्रशासनाला इशारा

By समीर देशपांडे | Updated: November 15, 2022 14:33 IST

उच्च न्यायालयाचा आदेश असला तरीही इतर कोणत्याही जिल्ह्यात तातडीने प्रक्रिया सुरू नसताना कोल्हापूर जिल्ह्यातच गडबड का?

कोल्हापूर : रहायला जागा नाही म्हणून आम्ही गायरानामध्ये घरं बांधली आहेत. न्यायालयाने सांगितलंय म्हणून जरी काही गडबड सुरू असली तरी गायरानातील एकाही घराला हात लावू देणार नाही असा खणखणीत इशारा आज, मंगळवारी सर्वपक्षीय मोर्चाव्दारे प्रशासनाला देण्यात आला. या मोर्चामध्ये शिंदे गट आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले नव्हते.आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेमध्ये अनेकांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार ऋतुराज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार के. पी. पाटील, चंद्रदीप नरके, उल्हास पाटील, संपतराव पवार-पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, आरपीआयचे प्रा. शहाजी कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी भगवान कांबळे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. उच्च न्यायालयाचा आदेश असला तरीही इतर कोणत्याही जिल्ह्यात तातडीने प्रक्रिया सुरू नसताना कोल्हापूर जिल्ह्यातच गडबड का सुरू आहे असा सवाल यावेळी माजी मंत्री मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी प्रशासनाला विचारला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीagitationआंदोलन