शहरं
Join us  
Trending Stories
1
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
2
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
3
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
4
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
5
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
8
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
9
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
10
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
11
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
12
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
13
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
14
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
15
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
16
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
17
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
18
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
19
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
Daily Top 2Weekly Top 5

कनेक्शनसाठी सर्व पैसे भरतो म्हटले तरी ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:23 IST

कोल्हापूर : विजेचे कनेक्शन मिळावे म्हणून अर्ज केले, पैसे भरले, ‘महावितरण’चे उंबरठे झिजवले तरीही यंत्रणा ढिम्मच आहे. एकेकांची तर ...

कोल्हापूर : विजेचे कनेक्शन मिळावे म्हणून अर्ज केले, पैसे भरले, ‘महावितरण’चे उंबरठे झिजवले तरीही यंत्रणा ढिम्मच आहे. एकेकांची तर तीन वर्षांपासूनची कनेक्शन प्रलंबित आहेत. स्वखर्चाने कनेक्शन घेतो म्हटले तरी त्याला परवानगी देण्याचीही तसदी प्रशासनाने घेतलेली नाही. या कारभारामुळे कोल्हापुरातील शेतकरी संतप्त झाले असून कनेक्शन मिळणार तरी कधी? असा सवाल करीत आहेत. मोर्चाद्वारे धडक देऊन झोपलेल्या यंत्रणेला जागे करण्याच्या मानसिकतेपर्यंत शेतकरी आले आहेत.पाण्याच्या उपलब्धतेमुळे कृषिपंपाद्वारे शेती करण्याकडे कल वाढला आहे. त्यासाठी वीज कनेक्शन अत्यावश्यक असल्याने शेतकऱ्यांनी महावितरणकडे या संदर्भात अर्ज करून प्रसंगी रक्कमही भरून ठेवली आहे. तथापि, कनेक्शनसाठी शासनाकडून लवकर परवानगी मिळत नाही, टी. सी. अपुरे आहेत, पोलच उपलब्ध नाहीत, सर्व्हिस वायर नाहीत, फ्युज कमी प्रमाणात आहेत, अशी अनेककारणे सांगून महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून शेतकºयांची बोळवण केली जात आहे. विचारणा करण्यासाठी गेलेल्या शेतकºयांना थातुरमातुर उत्तरे दिली जात आहेत.ताराबाई पार्कातील कार्यालयात फाईल पडूनएकेका वीज कनेक्शनसाठी किमान लाख, दीड लाखाचा खर्च येतो. शासनाकडून निधी येत नसल्याने लवकर कनेक्शन देता येत नसल्याचे महावितरणचे अधिकारी सांगतात; पण हेच अधिकारी मात्र कनेक्शनसाठी लागणारा तीन-चार लाखांचा सर्व खर्च स्वत: करण्यास तयार असणाºया शेतकºयांनाही परवानगी देण्यास टाळाटाळ करीत आहेत. ‘करवीर’मधील एका शेतकºयाने मागितलेल्या परवानगीचा अर्ज ताराबाई पार्कातील ‘महावितरण’च्या कार्यालयात पडून आहे.कायदा काय सांगतोवीज कायदा २००३ चे कलम ४३ नुसार वीजपुरवठा संहिता २००५, ३ नुसार विहीत मुदतीत वीज कनेक्शन देणे महावितरणवर बंधनकारक आहे. असे असूनही साधनसामग्री नाही असे सांगून कनेक्शन देण्यास टाळाटाळ होत आहे. कनेक्शनचा खर्च स्वत: केला तर त्याची भरपाई वीज बिलातून होणे अपेक्षित असताना परत त्याचा बोजा शेतकºयांवरच टाकला जात आहे.मी भागाने शेती करतो, महावितरणकडे कनेक्शनसाठी अर्ज करूनच घ्यावा असे महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले. दोन एकर शेती व पाच एचएपीच्या मोटरपंपासाठी चार लाखांचा टीसी बसवणे आवाक्यापलीकडचे असल्याने नकार दिला. माझ्या शेताच्या १२० फुटांवर थ्री फेजची विद्युतवाहिनी असतानाही तेथून कनेक्शन देण्याऐवजी स्वतंत्र टी.सी.ची अट घालून चार महिन्यांपासून अडवणूक सुुरू आहे. ताराबाई पार्कातील कार्यालयात अधिकाºयांची भेट घेतली तर ते दाद लागू देत नाहीत.- भानुदास माने, शेतकरी, शिरोळ