शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कनेक्शनसाठी सर्व पैसे भरतो म्हटले तरी ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:23 IST

कोल्हापूर : विजेचे कनेक्शन मिळावे म्हणून अर्ज केले, पैसे भरले, ‘महावितरण’चे उंबरठे झिजवले तरीही यंत्रणा ढिम्मच आहे. एकेकांची तर ...

कोल्हापूर : विजेचे कनेक्शन मिळावे म्हणून अर्ज केले, पैसे भरले, ‘महावितरण’चे उंबरठे झिजवले तरीही यंत्रणा ढिम्मच आहे. एकेकांची तर तीन वर्षांपासूनची कनेक्शन प्रलंबित आहेत. स्वखर्चाने कनेक्शन घेतो म्हटले तरी त्याला परवानगी देण्याचीही तसदी प्रशासनाने घेतलेली नाही. या कारभारामुळे कोल्हापुरातील शेतकरी संतप्त झाले असून कनेक्शन मिळणार तरी कधी? असा सवाल करीत आहेत. मोर्चाद्वारे धडक देऊन झोपलेल्या यंत्रणेला जागे करण्याच्या मानसिकतेपर्यंत शेतकरी आले आहेत.पाण्याच्या उपलब्धतेमुळे कृषिपंपाद्वारे शेती करण्याकडे कल वाढला आहे. त्यासाठी वीज कनेक्शन अत्यावश्यक असल्याने शेतकऱ्यांनी महावितरणकडे या संदर्भात अर्ज करून प्रसंगी रक्कमही भरून ठेवली आहे. तथापि, कनेक्शनसाठी शासनाकडून लवकर परवानगी मिळत नाही, टी. सी. अपुरे आहेत, पोलच उपलब्ध नाहीत, सर्व्हिस वायर नाहीत, फ्युज कमी प्रमाणात आहेत, अशी अनेककारणे सांगून महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून शेतकºयांची बोळवण केली जात आहे. विचारणा करण्यासाठी गेलेल्या शेतकºयांना थातुरमातुर उत्तरे दिली जात आहेत.ताराबाई पार्कातील कार्यालयात फाईल पडूनएकेका वीज कनेक्शनसाठी किमान लाख, दीड लाखाचा खर्च येतो. शासनाकडून निधी येत नसल्याने लवकर कनेक्शन देता येत नसल्याचे महावितरणचे अधिकारी सांगतात; पण हेच अधिकारी मात्र कनेक्शनसाठी लागणारा तीन-चार लाखांचा सर्व खर्च स्वत: करण्यास तयार असणाºया शेतकºयांनाही परवानगी देण्यास टाळाटाळ करीत आहेत. ‘करवीर’मधील एका शेतकºयाने मागितलेल्या परवानगीचा अर्ज ताराबाई पार्कातील ‘महावितरण’च्या कार्यालयात पडून आहे.कायदा काय सांगतोवीज कायदा २००३ चे कलम ४३ नुसार वीजपुरवठा संहिता २००५, ३ नुसार विहीत मुदतीत वीज कनेक्शन देणे महावितरणवर बंधनकारक आहे. असे असूनही साधनसामग्री नाही असे सांगून कनेक्शन देण्यास टाळाटाळ होत आहे. कनेक्शनचा खर्च स्वत: केला तर त्याची भरपाई वीज बिलातून होणे अपेक्षित असताना परत त्याचा बोजा शेतकºयांवरच टाकला जात आहे.मी भागाने शेती करतो, महावितरणकडे कनेक्शनसाठी अर्ज करूनच घ्यावा असे महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले. दोन एकर शेती व पाच एचएपीच्या मोटरपंपासाठी चार लाखांचा टीसी बसवणे आवाक्यापलीकडचे असल्याने नकार दिला. माझ्या शेताच्या १२० फुटांवर थ्री फेजची विद्युतवाहिनी असतानाही तेथून कनेक्शन देण्याऐवजी स्वतंत्र टी.सी.ची अट घालून चार महिन्यांपासून अडवणूक सुुरू आहे. ताराबाई पार्कातील कार्यालयात अधिकाºयांची भेट घेतली तर ते दाद लागू देत नाहीत.- भानुदास माने, शेतकरी, शिरोळ