शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आजरा तालुक्याचे लक्ष मुश्रीफ यांच्या भूमिकेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 12:45 IST

kolhapur, Sugar factory, hasanmusrif तिसऱ्यांदा खासगी कंपनीकडे जाणारा आजरा साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा राहू देण्याबाबत आता राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण आजरा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. हा सकारात्मक निर्णय तातडीने झाल्यासच आजरा कारखान्याचे अडलेले गाडे रुळावर येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देआजरा तालुक्याचे लक्ष मुश्रीफ यांच्या भूमिकेकडे साखर कारखान्याचा प्रश्न, तातडीने निर्णय घेण्याची गरज

समीर देशपांडेकोल्हापूर : तिसऱ्यांदा खासगी कंपनीकडे जाणारा आजरा साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा राहू देण्याबाबत आता राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण आजरा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. हा सकारात्मक निर्णय तातडीने झाल्यासच आजरा कारखान्याचे अडलेले गाडे रुळावर येण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षीचा गळित हंगाम घेता आलेला नव्हता. संचालक मंडळ आणि कारखाना कर्मचारी यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला होता. जिल्हा बँकेचे कर्जाचे हप्तेही रखडले. परिणामी कारखाना चालविण्यासाठी निविदा काढण्यात आली. मात्र यासाठी केवळ एकाच कंपनीची निविदा आल्याने ती जिल्हा बँकेच्या २५ सप्टेंबरच्या बैठकीत रद्द केली.याच बैठकीत जिल्हा बँक आणि कारखाना व्यवस्थापनामध्ये कारखाना स्वबळावर चालविण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. कर्मचाऱ्यांनी पगारकपातीसाठी लेखी तयारी दर्शवली तरच हे होणार असल्याने, तसे लेखी पत्रही बँकेला सादर करण्यात आले आहे.संचालकांनी बँकेला दिलेल्या पत्रातील मुद्दे१. कर्मचारी पगारामध्ये कपात२. उत्पादन खर्चामध्ये काटकसर३. ४ लाख टन उसाची गाळपासाठी उपलब्धता४. तोडणी व वाहतुकीसाठी २५० टोळ्यांची गरज. स्थानिक पातळीवर यंत्रणा उपलब्ध५. मशिनरी दुरुस्ती व देखभालीसाठी २० कोटींची गरज६. शासकीय मूल्यांकनानुसार कारखान्याच्या मालमत्तेचे १०४ कोटी रुपये मूल्यांकन झाले आहे.७. जिल्हा बँकेचे माल तारण कर्ज सोडून ४० कोटी रुपयांचे कारखान्यावर कर्ज८. गळित हंगाम सुरू करण्यासाठी आणखी ४५ कोटींच्या कर्जाची गरज.लोकमतच्या भूमिकेवर शिक्कामोर्तबगेल्या वर्षी कारखाना अडचणीत आला असताना ह्यलोकमतह्णने दोन भागांच्या मालिकेद्वारे कुणीही, काहीही म्हणाले तरी कामगारांच्या त्यागावरच कारखाना चालविण्यासाठी घेणे अवलंबून राहणार आहे, अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. तेव्हा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी याबाबत आकांडतांडव केले होते. मात्र जिल्हा बँकेच्या चर्चेतही कर्मचाऱ्यांच्या पगाराचाच मुद्दा पहिल्या क्रमांकावर राहिला आणि कर्मचाऱ्यांनी पगार कपातीला तयार असल्याची स्वागतार्ह भूमिका घेतली.मुश्रीफच आधारवडअनेक वर्षे बंद पडलेला चंदगडचा दौलत साखर कारखाना हसन मुश्रीफ यांच्याच पुढाकाराने आजरा तालुक्याचे सुपुत्र मानसिंग खोराटे चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. मुश्रीफ यांनीच निर्णय घेतल्यामुळे गडहिंग्लजचा साखर कारखाना पुण्याच्या कंपनीकडून चालविण्यात येत आहे. आता आजरा कारखान्याबाबतीत निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मुश्रीफच याबाबत निर्णय घेऊ शकतात. फक्त त्यांनी तो तातडीने घेतल्यास यंदाचा गळित हंगाम पदरात पडण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावर पडण्यापासून वाचणार आहेत.महाविकास आघाडीवाले एकत्रकारखान्याचे अध्यक्षपद सध्या शिवसेनेच्या सुनील शिंत्रे यांच्याकडे आहे. त्यामुळे मंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुश्रीफ यांच्याकडे याबाबत आग्रह धरला आहे. संचालक मंडळात राष्ट्रवादी आणि काँग्रेस, भाजपवालेही आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्याही आजरा कारखाना सुरू करणे हे महाविकास आघाडीच्या फायद्याचे असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील आणि शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनीही तसा आग्रह धरला आहे.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने