शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

विधानसभेचे पडघम: ‘आजरा कारखाना' निकालाने राष्ट्रवादीला पाठबळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 13:31 IST

घाटगे, आबिटकर, शिवाजी पाटील यांना करावे लागणार परिश्रम

कोल्हापूर : आजरा साखर कारखान्यातील राष्ट्रवादीच्या एकतर्फी विजयामुळे विधानसभेसाठी पुन्हा रिंगणात उतरणारे आ. प्रकाश आबिटकर, समरजित घाटगे आणि चंदगडचे शिवाजीराव पाटील यांना विधानसभेसाठी अधिक परिश्रम करावे लागणार आहेत. कारखान्याचे सभासद आणि विधानसभेचे मतदार यांच्यात मोठा फरक असला तरी यानिमित्ताने आजरा तालुक्यात ज्या पद्धतीने राष्ट्रवादीने आपली मूठ आवळली आहे. ती भेदण्यासाठी या तिघांना अधिक परिश्रम करावे लागणार हे निश्चित.आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीचे मैदान मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकतर्फी मारले. त्यांना बिद्रीच्या विजयामुळे प्रचंड आत्मविश्वास आलेल्या के. पी. पाटील आणि विद्यमान आमदार असलेल्या राजेश पाटील यांनी ताकदीने पाठबळ दिले. या तिघांनीही विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकीकडे पाहिले.या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात असलेल्या चराटी, शिंपी, शिंत्रे, रेडेकर आघाडीसोबत समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर, शिवाजीराव पाटील निवडक ठिकाणी दिसले. हे तिघेही पराभूत आघाडीच्या प्रचारासाठी जंगजंग पछाडताना दिसले नाहीत. त्यामुळेच ही आघाडी फरकाने पराभूत झाल्यानंतर या तिघांनाही आजरा तालुक्यातील आपापल्या जिल्हा परिषद मतदारसंघाकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल.उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघ हा कागल विधानसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या नेते, कार्यकर्त्यांनी मोठी ताकद येथे लावली. परिणामी सत्तेवर आलेल्या रवळनाथ आघाडीला ६५० चे मताधिक्य याच गटातून मिळाले. जे तालुक्यातील अन्य चार गटांतून कुठेच तुटू शकले नाही. त्यामुळे तुलनेत या ठिकाणी राष्ट्रवादी मजबूत असल्यावर शिक्कामाेर्तब झाले आहे.आजरा जिल्हा परिषद मतदारसंघ हा आबिटकर यांच्या विधानसभा मतदारसंघात येतो. यामध्ये पश्चिम भागातील गावांचा समावेश आहे. या गावातून चराटी यांच्या आघाडीला पाठबळ मिळाले असले तरी फरक फारसा नव्हता. त्यामुळे के. पी. पाटील यांना येथून ताकद मिळू शकते. हीच परिस्थिती कोळींद्रे जिल्हा परिषद मतदारसंघात आहे. या ठिकाणी आ. राजेश पाटील यांनी सत्तारूढच्या प्रचारात अधिवेशन असूनही हिरीरीने भाग घेतला होता. या ठिकाणाहून इच्छुक असलेले भाजपचे शिवाजी पाटील यांनाही या परिसरात अधिक राबणूक करावी लागेल.अजून दहा महिन्यांचा कालावधीविधानसभेची निवडणूक अजून १० महिन्यांवर आहे. वरील तिनही मतदारसंघातून एकमेकांच्या विरोधात लढू इच्छिणारे नेते हे सध्या महायुतीमध्ये बांधले गेले आहेत. परंतु एकदा का लोकसभा पार पडली की, विधानसभेवेळचे जागा वाटप कसे असेल हे अजूनही कोणालाही सांगता येणार नाही. त्यामुळे स्वतंत्र किंवा मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात. त्यामुळे उर्वरित दहा महिन्यांत जोशात असलेल्या राष्ट्रवादीविरोधात हे तीनही नेते कशा पद्धतीने व्यूव्हरचना आखणार आहेत, हे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणSugar factoryसाखर कारखानेNCPराष्ट्रवादी काँग्रेस