शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

विधानसभेचे पडघम: ‘आजरा कारखाना' निकालाने राष्ट्रवादीला पाठबळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 13:31 IST

घाटगे, आबिटकर, शिवाजी पाटील यांना करावे लागणार परिश्रम

कोल्हापूर : आजरा साखर कारखान्यातील राष्ट्रवादीच्या एकतर्फी विजयामुळे विधानसभेसाठी पुन्हा रिंगणात उतरणारे आ. प्रकाश आबिटकर, समरजित घाटगे आणि चंदगडचे शिवाजीराव पाटील यांना विधानसभेसाठी अधिक परिश्रम करावे लागणार आहेत. कारखान्याचे सभासद आणि विधानसभेचे मतदार यांच्यात मोठा फरक असला तरी यानिमित्ताने आजरा तालुक्यात ज्या पद्धतीने राष्ट्रवादीने आपली मूठ आवळली आहे. ती भेदण्यासाठी या तिघांना अधिक परिश्रम करावे लागणार हे निश्चित.आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीचे मैदान मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकतर्फी मारले. त्यांना बिद्रीच्या विजयामुळे प्रचंड आत्मविश्वास आलेल्या के. पी. पाटील आणि विद्यमान आमदार असलेल्या राजेश पाटील यांनी ताकदीने पाठबळ दिले. या तिघांनीही विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकीकडे पाहिले.या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात असलेल्या चराटी, शिंपी, शिंत्रे, रेडेकर आघाडीसोबत समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर, शिवाजीराव पाटील निवडक ठिकाणी दिसले. हे तिघेही पराभूत आघाडीच्या प्रचारासाठी जंगजंग पछाडताना दिसले नाहीत. त्यामुळेच ही आघाडी फरकाने पराभूत झाल्यानंतर या तिघांनाही आजरा तालुक्यातील आपापल्या जिल्हा परिषद मतदारसंघाकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल.उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघ हा कागल विधानसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या नेते, कार्यकर्त्यांनी मोठी ताकद येथे लावली. परिणामी सत्तेवर आलेल्या रवळनाथ आघाडीला ६५० चे मताधिक्य याच गटातून मिळाले. जे तालुक्यातील अन्य चार गटांतून कुठेच तुटू शकले नाही. त्यामुळे तुलनेत या ठिकाणी राष्ट्रवादी मजबूत असल्यावर शिक्कामाेर्तब झाले आहे.आजरा जिल्हा परिषद मतदारसंघ हा आबिटकर यांच्या विधानसभा मतदारसंघात येतो. यामध्ये पश्चिम भागातील गावांचा समावेश आहे. या गावातून चराटी यांच्या आघाडीला पाठबळ मिळाले असले तरी फरक फारसा नव्हता. त्यामुळे के. पी. पाटील यांना येथून ताकद मिळू शकते. हीच परिस्थिती कोळींद्रे जिल्हा परिषद मतदारसंघात आहे. या ठिकाणी आ. राजेश पाटील यांनी सत्तारूढच्या प्रचारात अधिवेशन असूनही हिरीरीने भाग घेतला होता. या ठिकाणाहून इच्छुक असलेले भाजपचे शिवाजी पाटील यांनाही या परिसरात अधिक राबणूक करावी लागेल.अजून दहा महिन्यांचा कालावधीविधानसभेची निवडणूक अजून १० महिन्यांवर आहे. वरील तिनही मतदारसंघातून एकमेकांच्या विरोधात लढू इच्छिणारे नेते हे सध्या महायुतीमध्ये बांधले गेले आहेत. परंतु एकदा का लोकसभा पार पडली की, विधानसभेवेळचे जागा वाटप कसे असेल हे अजूनही कोणालाही सांगता येणार नाही. त्यामुळे स्वतंत्र किंवा मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात. त्यामुळे उर्वरित दहा महिन्यांत जोशात असलेल्या राष्ट्रवादीविरोधात हे तीनही नेते कशा पद्धतीने व्यूव्हरचना आखणार आहेत, हे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणSugar factoryसाखर कारखानेNCPराष्ट्रवादी काँग्रेस