शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील वारसांना सव्वा कोटींची मदत, कोल्हापूर जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 12:35 IST

वन्य कायद्यातील तरतुदीनुसार या घटनांमधील मृतांच्या वारसांना नुकसानभरपाई प्रदान करण्यात आली आहे.

संदीप आडनाईककोल्हापूर : अभयारण्ये किंवा जंगलाच्या क्षेत्रातील मानव तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ला होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले आहेत. या प्रकारामुळे कोल्हापूर वनविभागात २०१९ ते २०२२ अखेर या चार वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. वन्य कायद्यातील तरतुदीनुसार या घटनांमधील मृतांच्या वारसांना आतापर्यंत १ कोटी २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई प्रदान करण्यात आली आहे.काेल्हापूर वनविभागात वर्ष २०१९ मध्ये एकूण चौघांचा मृत्यू झाला, प्रत्येकी १५ लाख याप्रमाणे एकूण ६० लाख, २०२० मध्ये एक, २०२२ मध्ये एकाचा मृत्यू होऊन त्यांना प्रत्येकी १५ लाखांची भरपाई देण्यात आली आहे. अलीकडेच डिसेंबर २०२२ मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलीचा मृत्यू झाला, त्यांच्या वारसांना २० लाखांची रक्कम कोल्हापूर वनविभागामार्फत दिली आहे. नव्या तरतुदीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात देण्यात आलेली ही पहिलीच रक्कम आहे.या तीन वर्षात झालेल्या हल्ल्यांमध्ये गव्यांच्या हल्ल्यातील मृतांची संख्या सर्वाधिक म्हणजे ५ इतकी आहे. आतापर्यंत तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या व्यक्तींच्या मृत्यूला तीन गवे रेडे कारणीभूत आहेत. २०१९ मध्ये या तीन गव्या रेड्यांच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ २०२० मध्ये शिरोळ तालुक्यात नदीकाठावर मगरीच्या हल्ल्यात एकाचा, तर २०२१ मध्ये दानवाडजवळ एकाचा मृत्यू झाला आहे.२०२१-२२ मध्ये दोन गव्यांच्या हल्ल्यात वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचा मृत्यू झाला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये शाहूवाडी तालुक्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक मुलगी ठार झाली. ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात १, त्यापाठोपाठ रानगवा आणि मगरीच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाली आहे. या हल्ल्यांमध्ये वन कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याची फारशी माहिती नाही. पण, बहुतांश मृत्यू जंगलालगत असलेल्या गावकऱ्यांचे आणि शेतात काम करणाऱ्या महिला, पुरुषांचे आहेत. शिरोळ तालुक्यातील पाणवठे आणि नद्यांमध्ये असलेल्या मगरींमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे यात दिसते.

या कोल्हापूर प्रादेशिक वनविभागाच्या हद्दीतील घटना आहेत. वन्यजीव विभागाची हद्द संरक्षित वनक्षेत्रात येत असल्यामुळे तेथील हल्ल्यात ठार झालेल्यांच्या वारसांना नुकसानभरपाई दिली जात नाही. पूर्वीच्या तुलनेत नुकसानभरपाईच्या मदतीत ५ लाखांनी वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये दिलेली वाढीव रक्कम ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच आहे. - जी. गुरुप्रसाद, उपवनसंरक्षक, कोल्हापूर, वनविभाग.

वर्ष  मनुष्य मृत्यू अनुदान  मृत्यूचे कारण
२०१९  ६० लाख  ३ गवा रेडे, १ मगर
२०२०   १  १५ लाख  १ मगर
२०२१   १  १५ लाख    १ गवा
२०२२  २   ३५ लाख १ गवा, १ बिबट्या

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरleopardबिबट्या