शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील वारसांना सव्वा कोटींची मदत, कोल्हापूर जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 12:35 IST

वन्य कायद्यातील तरतुदीनुसार या घटनांमधील मृतांच्या वारसांना नुकसानभरपाई प्रदान करण्यात आली आहे.

संदीप आडनाईककोल्हापूर : अभयारण्ये किंवा जंगलाच्या क्षेत्रातील मानव तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ला होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले आहेत. या प्रकारामुळे कोल्हापूर वनविभागात २०१९ ते २०२२ अखेर या चार वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. वन्य कायद्यातील तरतुदीनुसार या घटनांमधील मृतांच्या वारसांना आतापर्यंत १ कोटी २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई प्रदान करण्यात आली आहे.काेल्हापूर वनविभागात वर्ष २०१९ मध्ये एकूण चौघांचा मृत्यू झाला, प्रत्येकी १५ लाख याप्रमाणे एकूण ६० लाख, २०२० मध्ये एक, २०२२ मध्ये एकाचा मृत्यू होऊन त्यांना प्रत्येकी १५ लाखांची भरपाई देण्यात आली आहे. अलीकडेच डिसेंबर २०२२ मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलीचा मृत्यू झाला, त्यांच्या वारसांना २० लाखांची रक्कम कोल्हापूर वनविभागामार्फत दिली आहे. नव्या तरतुदीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात देण्यात आलेली ही पहिलीच रक्कम आहे.या तीन वर्षात झालेल्या हल्ल्यांमध्ये गव्यांच्या हल्ल्यातील मृतांची संख्या सर्वाधिक म्हणजे ५ इतकी आहे. आतापर्यंत तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या व्यक्तींच्या मृत्यूला तीन गवे रेडे कारणीभूत आहेत. २०१९ मध्ये या तीन गव्या रेड्यांच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ २०२० मध्ये शिरोळ तालुक्यात नदीकाठावर मगरीच्या हल्ल्यात एकाचा, तर २०२१ मध्ये दानवाडजवळ एकाचा मृत्यू झाला आहे.२०२१-२२ मध्ये दोन गव्यांच्या हल्ल्यात वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचा मृत्यू झाला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये शाहूवाडी तालुक्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक मुलगी ठार झाली. ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात १, त्यापाठोपाठ रानगवा आणि मगरीच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाली आहे. या हल्ल्यांमध्ये वन कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याची फारशी माहिती नाही. पण, बहुतांश मृत्यू जंगलालगत असलेल्या गावकऱ्यांचे आणि शेतात काम करणाऱ्या महिला, पुरुषांचे आहेत. शिरोळ तालुक्यातील पाणवठे आणि नद्यांमध्ये असलेल्या मगरींमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे यात दिसते.

या कोल्हापूर प्रादेशिक वनविभागाच्या हद्दीतील घटना आहेत. वन्यजीव विभागाची हद्द संरक्षित वनक्षेत्रात येत असल्यामुळे तेथील हल्ल्यात ठार झालेल्यांच्या वारसांना नुकसानभरपाई दिली जात नाही. पूर्वीच्या तुलनेत नुकसानभरपाईच्या मदतीत ५ लाखांनी वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये दिलेली वाढीव रक्कम ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच आहे. - जी. गुरुप्रसाद, उपवनसंरक्षक, कोल्हापूर, वनविभाग.

वर्ष  मनुष्य मृत्यू अनुदान  मृत्यूचे कारण
२०१९  ६० लाख  ३ गवा रेडे, १ मगर
२०२०   १  १५ लाख  १ मगर
२०२१   १  १५ लाख    १ गवा
२०२२  २   ३५ लाख १ गवा, १ बिबट्या

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरleopardबिबट्या