शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Agriculture Electricity issue: ऊर्जामंत्र्यांचा दिलासा, कोल्हापूर-सांगलीतील दीड लाख कनेक्शन्सना अभय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 13:27 IST

आर्थिक वर्षअखेर असल्याने महावितरण कंपनीकडून कृषी व अकृषक अशा सर्वच प्रकारांतील चालू वीजबिल थकित असलेल्या लोकांचा वीज पुरवठा बंद करण्याची धडक मोहीम सुरू होती. त्याविरोधात लोकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

कोल्हापूर : चालू बिलाची थकबाकी असलेल्या कृषी पंपांची वीज कनेक्शन्स तीन महिने तोडू नयेत, असे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी घेतल्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. या शेतकऱ्यांकडे चालू बिलाची तब्बल ३७० कोटी रुपये थकबाकी आहे.आर्थिक वर्षअखेर असल्याने महावितरण कंपनीकडून कृषी व अकृषक अशा सर्वच प्रकारांतील चालू वीजबिल थकित असलेल्या लोकांचा वीज पुरवठा बंद करण्याची धडक मोहीम सुरू होती. त्याविरोधात लोकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सोमवारी करवीर तालुक्यातील महे ग्रामस्थांनी पाणी योजनेचे वीज कनेक्शन तोडल्याने महावितरण कार्यालयात आंदोलन करून एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. राज्यभरातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड असल्यामुळे पिकांना आठवड्याला पाणी द्यावे लागत आहे.अशातच वीज कनेक्शन तोडल्यास हातात आलेले पीक वाळून जाण्याची भीती होती. या सगळ्याची दखल घेऊन शासनाने कनेक्शन तोडण्याच्या कारवाईस स्थगिती दिली.सध्या विजेच्या चालू बिलासाठी महावितरणची कोणतेही योजना नाही. त्यामुळे त्यांचे प्रबोधन करूनच वीजबिल भरून घ्यावे लागणार आहे. सप्टेंबर २०२० पूर्वीचे वीजबिल थकित असल्यास त्या शेतकऱ्यांसाठी ५० टक्के सवलत आहे. परंतु त्यासही शेतकऱ्यांकडून जेमतेमच प्रतिसाद आहे.

  • कोल्हापूर : १ लाख ४६ हजार कृषी ग्राहकांकडे ३८० कोटी थकबाकी. त्यातील १ लाख ९ हजार कृषी ग्राहकांनी भरले १६७ कोटी ७१ लाख.
  • सांगली : २ लाख ४० हजार कृषी ग्राहक. त्यांच्याकडे १२१९ कोटी रुपयांची थकबाकी. त्यातील १ लाख १५ हजार कृषी ग्राहकांनी भरले १६८ कोटी. 

चालू बिलाची थकबाकी

  • कोल्हापूर : कृषी ग्राहक ३६ हजार : थकित चालू बिल - ९० कोटी
  • सांगली : १ लाख २५ हजार : थकित चालू बिल : २८० कोटी.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीelectricityवीज