शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Agriculture Electricity issue: ऊर्जामंत्र्यांचा दिलासा, कोल्हापूर-सांगलीतील दीड लाख कनेक्शन्सना अभय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 13:27 IST

आर्थिक वर्षअखेर असल्याने महावितरण कंपनीकडून कृषी व अकृषक अशा सर्वच प्रकारांतील चालू वीजबिल थकित असलेल्या लोकांचा वीज पुरवठा बंद करण्याची धडक मोहीम सुरू होती. त्याविरोधात लोकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

कोल्हापूर : चालू बिलाची थकबाकी असलेल्या कृषी पंपांची वीज कनेक्शन्स तीन महिने तोडू नयेत, असे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी घेतल्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. या शेतकऱ्यांकडे चालू बिलाची तब्बल ३७० कोटी रुपये थकबाकी आहे.आर्थिक वर्षअखेर असल्याने महावितरण कंपनीकडून कृषी व अकृषक अशा सर्वच प्रकारांतील चालू वीजबिल थकित असलेल्या लोकांचा वीज पुरवठा बंद करण्याची धडक मोहीम सुरू होती. त्याविरोधात लोकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सोमवारी करवीर तालुक्यातील महे ग्रामस्थांनी पाणी योजनेचे वीज कनेक्शन तोडल्याने महावितरण कार्यालयात आंदोलन करून एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. राज्यभरातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड असल्यामुळे पिकांना आठवड्याला पाणी द्यावे लागत आहे.अशातच वीज कनेक्शन तोडल्यास हातात आलेले पीक वाळून जाण्याची भीती होती. या सगळ्याची दखल घेऊन शासनाने कनेक्शन तोडण्याच्या कारवाईस स्थगिती दिली.सध्या विजेच्या चालू बिलासाठी महावितरणची कोणतेही योजना नाही. त्यामुळे त्यांचे प्रबोधन करूनच वीजबिल भरून घ्यावे लागणार आहे. सप्टेंबर २०२० पूर्वीचे वीजबिल थकित असल्यास त्या शेतकऱ्यांसाठी ५० टक्के सवलत आहे. परंतु त्यासही शेतकऱ्यांकडून जेमतेमच प्रतिसाद आहे.

  • कोल्हापूर : १ लाख ४६ हजार कृषी ग्राहकांकडे ३८० कोटी थकबाकी. त्यातील १ लाख ९ हजार कृषी ग्राहकांनी भरले १६७ कोटी ७१ लाख.
  • सांगली : २ लाख ४० हजार कृषी ग्राहक. त्यांच्याकडे १२१९ कोटी रुपयांची थकबाकी. त्यातील १ लाख १५ हजार कृषी ग्राहकांनी भरले १६८ कोटी. 

चालू बिलाची थकबाकी

  • कोल्हापूर : कृषी ग्राहक ३६ हजार : थकित चालू बिल - ९० कोटी
  • सांगली : १ लाख २५ हजार : थकित चालू बिल : २८० कोटी.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीelectricityवीज