शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस, पैलवानांच्या घशाला कोरड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 15:47 IST

कोल्हापूर : टी-२० विश्वचषक २०२४च्या विजेतेपदावर भारतीय संघाने आपले नाव कोरल्यानंतर भारतीय संघावर बक्षिसांचा अक्षरश: पाऊस पडत आहे. बीसीसीआयने ...

कोल्हापूर : टी-२० विश्वचषक २०२४च्या विजेतेपदावर भारतीय संघाने आपले नाव कोरल्यानंतर भारतीय संघावर बक्षिसांचा अक्षरश: पाऊस पडत आहे. बीसीसीआयने त्यांना १२५ कोटी रुपयांचे बक्षीस दिले. त्यानंतर राज्य सरकारने भारतीय संघासाठी पुन्हा ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. एकीकडे क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस पाडला जात असताना हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरीच्या मल्लांच्या घशाला कोरड पडली आहे. गेले दहा महिने त्यांचे तुटपुंजे मानधनही मिळालेले नाही. मानधनासह अन्य खेळांसाठी भरीव निधी देण्याची गरज आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघासाठी सरकारकडून ११ कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा केली. बीसीसीआयने त्यांना १२५ कोटींचे बक्षीस दिले. एकीकडे क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस पडत असताना राज्यातील हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी पैलवानांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यांचे गेले दहा महिने मानधन रखडले आहे. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी असे म्हटले जाते. खऱ्या अर्थाने छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी राजाश्रय देऊन या कलेला लोकप्रियता मिळवून दिली.गेल्या वीस वर्षात सरकार बदलले, क्रीडा खात्याचे अधिकारी आणि त्यांची मानसिकताही त्यांच्या बाबतीत बदलली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने मानधनाचा प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, सरकारकडून मानधन दिलेले नाही. कोल्हापूर जिल्ह्यात तर विभागीय क्रीडा सकुंलात जलतरण तलावासाठी चार कोटींहून अधिक पैसा पाण्यात गेला. मात्र, पैलवानांना सहा हजारांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांना राज्य शासन प्रतिमहिना सहा हजार रुपये इतके मानधन देते. मात्र, हे मानधन गेल्या दहा महिन्यांपासून मिळालेले नाही. यावरच निर्वाह असलेल्या मल्लांना हाल अपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. आयुष्यातील उमेदीची वर्षे कुस्तीमध्ये घालविलेल्या मल्लांना उतारवयात मानधनासाठी तंगविले जात आहे. राज्याचा क्रीडा विभाग या मल्लांच्या मागणीला दाद देत नाही. वारंवार पत्रव्यवहार, विनंती अर्ज करून ही मंडळी आता थकली आहेत.

रथी, महारथी पैलवानछत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे कोल्हापूरमध्ये पहिले ऑलिम्पिकला गेलेले दिनकरराव शिंदे, पहिले ऑलिम्पिकचे पदक विजेते खाशाबा जाधव, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारी, पहिले रुस्तम हिंद हरिश्चंद्र बिराजदार, पहिले डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर, पहिले महाराष्ट्र केसरी होऊन हिंदकेसरी झालेले दीनानाथ सिंह, हिंदकेसरी गणपतराव आंधळकर आबा, हिंदकेसरी हजरत पटेल, हिंदकेसरी मारुती माने, हिंदकेसरी विनोद चौगुले, हिंदकेसरी रुस्तम हिंद दादू चौगुले, डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार, कुस्तीसम्राट युवराज पाटील, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग असे एकापेक्षा एक पैलवान कोल्हापुरात घडले.

..ही कारणे देतातसरकारी सेवेत प्रशिक्षणार्थी कालावधी दोन वर्षाचा आहे. खेळाचा सराव आणि नोकरी यामुळे अनेकदा हा कालावधी पूर्ण होत नाही. हा कालावधी पूर्ण केला नसल्याने वेतन दिले जात नाही. सरकारी नियम आणि सरावाची सांगड बसत नाही. त्यात नव्याने आलेले सरकार खेळाडूंच्या बाबतीत नवीन परिपत्रक काढतात. त्यामुळे खेळाडूंची कोंडी होत आहे.

वेेळेत मानधन आणि शक्य झाल्यास वाढीव मानधन किमान जिवंतपणी हिंदकेसरींना मिळावे. अनेक नेते, मंत्री यांना भेटून पैलवांना मंडळी आता थकली आहेत. हिंदकेसरींना २५, महाराष्ट्र केसरींना २० आंतरराष्ट्रीय मल्लांना १५ आणि राष्ट्रीय मल्लांना १० हजार मानधन मिळावे. - दीनानाथ सिंह, हिंदकेसरीशासकीय सेवेत सामावून घेतले आहे. मात्र, गेली सात वर्षे मानधन मिळालेले नाही. मानधन मिळेल की नाही, याबाबत आता विचार करणेही सोडून दिले आहे. खेळांडूबाबत कोणालाही गांभीर्य नाही. नवे खेळाडू मानधन मिळत नाही, म्हणून अन्य ठिकाणी नोकरी करत असल्याचे चित्र आहे. - राही सरनोबत, आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू

टॅग्स :kolhapurकोल्हापूरT20 World Cupट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024IndiaभारतWrestlingकुस्तीGovernmentसरकार