शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पतीच्या निधनानंतर मंगळसूत्र तोडले नाही की कुंकू पुसले नाही, शुभांगी थाेरात यांचे बंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 11:42 IST

हेरवाड (ता.शिरोळ) ने विधवा प्रथेला मूठमाती देण्याचा निर्णय घेतल्यावर त्याचा राज्यभर गाजावाजा झाला, परंतु त्याअगोदर शुभांगी किशोर थोरात यांनी स्वत:सह आई व सासूच्या कृतीतूनच या प्रथेला फाटा दिला आहे.

विश्वास पाटील

कोल्हापूर : त्यांच्या पतीचे १ एप्रिलला अपघाती निधन झाले. त्यांनी मंगळसूत्र तोडू दिले नाही..जोडवीही काढू दिली नाहीत की, सौभाग्याचे लेणं म्हटले जात असलेले कुुंकूही पुसू दिले नाही, ही बंडखोर कृती केली आहे येथील शुभांगी किशोर थोरात यांनी.

हेरवाड (ता.शिरोळ) ने विधवा प्रथेला मूठमाती देण्याचा निर्णय घेतल्यावर त्याचा राज्यभर गाजावाजा झाला, परंतु त्याअगोदर थोरात यांनी स्वत:सह आई व सासूच्या कृतीतूनच या प्रथेला फाटा दिला आहे. हे धाडस करण्यासाठी त्यांना लंडनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेला मुलगा अभिषेक, सून, सासूबाई पार्वती थोरात व आई शिक्षिका असलेल्या सुशीला पाटील यांचा मोठा मानसिक आधार मिळाला.

घडले ते असे : थोरात कुटुंबीय मूळचे कराड तालुक्यातील कालवडेचे. किशोर विश्वनाथ थोरात हे वायुदलात होते. वीस वर्षे त्यांनी देशसेवा केला. निवृत्तीनंतर कोल्हापुरात क्रशर चौकात सुखासमाधानाचे जीवन जगत होते. ३० मार्चला ते गावी धार्मिक कार्यक्रमासाठी गेले असता त्यांच्या गाडीचा अपघात झाला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. ते स्वत: पुढारलेल्या विचारसरणीचे होते. नोकरीच्या निमित्ताने देशभर फिरलेले. त्यामुळे बुरसटलेल्या प्रथा परंपरांना त्यांचा विरोधच होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही या विचारधारेला धक्का लागू द्यायचा नाही, असा निर्णय शुभांगी थोरात यांनी घेतला.

त्यांनी पती निधनानंतर मंगळसूत्र तोडू दिले नाही. डोळ्यांत मणी घालण्याची पद्धत आहे म्हणून अगोदरच विकत मणी आणून ठेवला. जोडवी काढू दिली नाहीत. कुंकूही पुसू दिले नाही आणि बांगड्याही फोडू दिल्या नाहीत. पती निधनानंतरही त्यांनी हिरव्या साड्या नेसणे बंद केले नाही. सर्व विधी पाचव्या दिवशीच करून त्या १५ व्या दिवशी स्वत:च्या रेसक्रोर्स नाक्यावरील साडीच्या दुकानात यायला लागल्या. नात्यातील एका लग्नात त्यांना कुंकवाचा मान दिला नाही म्हटल्यावर तुम्ही असे करणार असाल तर मला लग्नाला बोलवू नका, असे त्यांनी बजावले व त्यात त्यांना यश आले.

चार वर्षापूर्वी आईलाही कुंकू पुसू दिले नाही

थोरात यांच्या आई सुशीला पाटील या कसबा वाळवे (ता.राधानगरी) येथील रघुनाथ न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका होत्या. शेती अधिकारी असलेल्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाल्यावर त्यांनी आईलाही कुंकू पुसू दिले नाही. उलट आईकडूनच कुुंकू लावून ओटी भरुन घेतली. जेव्हा मुलीनेच त्यांना कुंकू लावलं तेव्हा मला आज आरशात बघावं, असं वाटलं अशी त्यांच्या आईची भावना होती. नवा आत्मविश्वास देणारी ही कृती होती.

बाईच बाईचे खच्चीकरण करते असा अनुभव मला आला म्हणून मी स्वत: मुलाच्या लग्नात विधवा असलेल्या सासूबाईंच्या हस्तेच मुहूर्तमेढ रोवली. वास्तुशांतीमध्ये घराचे तोरणही त्यांच्याच हस्ते बांधले. आपणच कुटुंबापासून विधवा महिलांना सन्मान देण्यास सुरुवात करायला हवी. - शुभांगी थोरात

टॅग्स :kolhapurकोल्हापूर