शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

कोतवालांसाठी अखेर २८ दिवसांनंतर शासन हलले : मागण्यांबाबत आज होणार मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 01:02 IST

राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर गेल्या २८ दिवसांपासून ठिय्या आंदोलन करणाऱ्या कोतवालांकडे दुर्लक्ष करणाºया शासनाला अखेर जाग आली असून आज, गुरुवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात बैठक बोलावली आहे.

कोल्हापूर : राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर गेल्या २८ दिवसांपासून ठिय्या आंदोलन करणाऱ्या कोतवालांकडे दुर्लक्ष करणाºया शासनाला अखेर जाग आली असून आज, गुरुवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात बैठक बोलावली आहे. बैठकीला प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह कोतवाल संघटनेचे राज्याध्यक्ष प्रवीण कर्डक, संजय धरम, गणेश इंगोले उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत निर्णय अपेक्षित असल्याने राज्यभरातील कोतवालांचे लक्ष लागले आहे.

चतुर्थश्रेणीत समावेशाच्या मागणीसाठी ६ डिसेंबरपासून राज्यभरातील ३१ जिल्ह्यांतील १२ हजार कोतवाल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास बसले आहेत. या आंदोलनाला सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या आमदार, खासदारांनी भेट देऊन मागण्यांची दखल घेतली; पण आंदोलनाला विरोधी पक्षांची फूस आहे, असे सांगत महसूलमंत्री पाटील यांनी याकडे सुरुवातीपासून दुर्लक्ष केले. याचा निषेध म्हणून कोतवालांनी आंदोलनाची तीव्रता वाढविली.विविधप्रकारे आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता महिलांसह ठिय्या आंदोलन चालूच ठेवले आहे. ‘भीख मॉँगो’ आंदोलन करताना शासनाच्या विरोधात मुंडण आंदोलनही केले.सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागतही जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलनातच केले. तरीही शासन बधत नसल्याने वैतागलेल्या कोतवालांनी आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेतला. बुधवारी आंदोलनाच्या २८ व्या दिवशी कोतवालांनी शासनाच्या विरोधात ‘गोंधळ आंदोलन’ केले. जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग भांदिगरे यांनी बुधवारी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. तीव्रता वाढत असल्याने अखेर शासनाने याची दखल घेत आज दुपारी १२.३० वाजता मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले आहे. यात कोतवालांचा चतुर्थ श्रेणीत समावेश करण्यासह मानधनातील वाढ १४ हजारांच्या पुढे नेण्याचा महत्त्वपूर्ण विषय आहे.सरकारला भीती कशाची.?शासनाने २०१६ मध्ये नागपूर अधिवेशनावेळी या मागणीचा विचार करण्यासाठी पाच सदस्यीय समिती नेमली. त्यांनी आॅगस्ट २०१८ ला अहवाल दिला; परंतु त्यानंतर पुढे काही झालेले नाही. सध्या कोतवालांप्रमाणेच पोलीसपाटील, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स मानधनांवर काम करतात. कोतवालांना चतुर्थ श्रेणी देऊन त्यांना सरकारी कर्मचारी मानले, तर अन्य तीन घटकही तशीच मागणी करतील, याची भीती सरकारला वाटते; त्यामुळेच सरकार एवढे राज्यव्यापी आंदोलन करूनही त्यास जुमानायला तयार नाही.

मुख्य मागणी काय..?कोतवालांना १९६९ पूर्वी वतनदारी प्रमाणे कसण्यासाठी जमीन मिळत होती. त्यानंतर पगारी कोतवाल अशी पद्धत सुरू झाली. त्यावेळी ३५ रुपये मानधन होते, ते आज ५०१० आहे; परंतु एवढ्या तुटपुंज्या मानधनावर त्यांचा उदरनिर्वाह होत नाही, म्हणून त्यांचा चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये समावेश करावा, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. राज्यात १२६३७ व जिल्'ांत ४५० सज्जे व तेवढेच कोतवाल आहेत. कामाचे स्वरूप २४ तास असूनही प्रवास खर्च, दैनंदिन भत्ता दिला जात नाही.

 

गुजरातमध्ये १९८९ मध्येच कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सरकारने सामावून घेतले आहे. गावपातळीवर काम करणारा हा शासन यंत्रणेतील शेवटचा घटक आहे; परंतु सरकार त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला तयार नाही, हे संतापजनक आहे.- राजेंद्र पुजारी, कोतवाल संघर्ष समिती नेतेशासनाने बेदखल केले तरी आम्ही लढा सुरूच ठेवला आहे. आता बैठकीसाठी बोलावले आहे. तेथे आम्ही केलेल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनातून माघार घेतली जाणार नाही. गेली साडेचार वर्षे सरकारने फसवलेच आहे. आता पुन्हा ते होऊ देणार नाही. आजच्या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे; पण झाला नाही तर आंदोलन सुरूच राहणार आहे.- संदीप टिपुगडे, कोतवाल संघटना

टॅग्स :Strikeसंपkolhapurकोल्हापूरGovernmentसरकार