शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोतवालांसाठी अखेर २८ दिवसांनंतर शासन हलले : मागण्यांबाबत आज होणार मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 01:02 IST

राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर गेल्या २८ दिवसांपासून ठिय्या आंदोलन करणाऱ्या कोतवालांकडे दुर्लक्ष करणाºया शासनाला अखेर जाग आली असून आज, गुरुवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात बैठक बोलावली आहे.

कोल्हापूर : राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर गेल्या २८ दिवसांपासून ठिय्या आंदोलन करणाऱ्या कोतवालांकडे दुर्लक्ष करणाºया शासनाला अखेर जाग आली असून आज, गुरुवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात बैठक बोलावली आहे. बैठकीला प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह कोतवाल संघटनेचे राज्याध्यक्ष प्रवीण कर्डक, संजय धरम, गणेश इंगोले उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत निर्णय अपेक्षित असल्याने राज्यभरातील कोतवालांचे लक्ष लागले आहे.

चतुर्थश्रेणीत समावेशाच्या मागणीसाठी ६ डिसेंबरपासून राज्यभरातील ३१ जिल्ह्यांतील १२ हजार कोतवाल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास बसले आहेत. या आंदोलनाला सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या आमदार, खासदारांनी भेट देऊन मागण्यांची दखल घेतली; पण आंदोलनाला विरोधी पक्षांची फूस आहे, असे सांगत महसूलमंत्री पाटील यांनी याकडे सुरुवातीपासून दुर्लक्ष केले. याचा निषेध म्हणून कोतवालांनी आंदोलनाची तीव्रता वाढविली.विविधप्रकारे आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता महिलांसह ठिय्या आंदोलन चालूच ठेवले आहे. ‘भीख मॉँगो’ आंदोलन करताना शासनाच्या विरोधात मुंडण आंदोलनही केले.सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागतही जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलनातच केले. तरीही शासन बधत नसल्याने वैतागलेल्या कोतवालांनी आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेतला. बुधवारी आंदोलनाच्या २८ व्या दिवशी कोतवालांनी शासनाच्या विरोधात ‘गोंधळ आंदोलन’ केले. जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग भांदिगरे यांनी बुधवारी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. तीव्रता वाढत असल्याने अखेर शासनाने याची दखल घेत आज दुपारी १२.३० वाजता मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले आहे. यात कोतवालांचा चतुर्थ श्रेणीत समावेश करण्यासह मानधनातील वाढ १४ हजारांच्या पुढे नेण्याचा महत्त्वपूर्ण विषय आहे.सरकारला भीती कशाची.?शासनाने २०१६ मध्ये नागपूर अधिवेशनावेळी या मागणीचा विचार करण्यासाठी पाच सदस्यीय समिती नेमली. त्यांनी आॅगस्ट २०१८ ला अहवाल दिला; परंतु त्यानंतर पुढे काही झालेले नाही. सध्या कोतवालांप्रमाणेच पोलीसपाटील, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स मानधनांवर काम करतात. कोतवालांना चतुर्थ श्रेणी देऊन त्यांना सरकारी कर्मचारी मानले, तर अन्य तीन घटकही तशीच मागणी करतील, याची भीती सरकारला वाटते; त्यामुळेच सरकार एवढे राज्यव्यापी आंदोलन करूनही त्यास जुमानायला तयार नाही.

मुख्य मागणी काय..?कोतवालांना १९६९ पूर्वी वतनदारी प्रमाणे कसण्यासाठी जमीन मिळत होती. त्यानंतर पगारी कोतवाल अशी पद्धत सुरू झाली. त्यावेळी ३५ रुपये मानधन होते, ते आज ५०१० आहे; परंतु एवढ्या तुटपुंज्या मानधनावर त्यांचा उदरनिर्वाह होत नाही, म्हणून त्यांचा चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये समावेश करावा, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. राज्यात १२६३७ व जिल्'ांत ४५० सज्जे व तेवढेच कोतवाल आहेत. कामाचे स्वरूप २४ तास असूनही प्रवास खर्च, दैनंदिन भत्ता दिला जात नाही.

 

गुजरातमध्ये १९८९ मध्येच कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सरकारने सामावून घेतले आहे. गावपातळीवर काम करणारा हा शासन यंत्रणेतील शेवटचा घटक आहे; परंतु सरकार त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला तयार नाही, हे संतापजनक आहे.- राजेंद्र पुजारी, कोतवाल संघर्ष समिती नेतेशासनाने बेदखल केले तरी आम्ही लढा सुरूच ठेवला आहे. आता बैठकीसाठी बोलावले आहे. तेथे आम्ही केलेल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनातून माघार घेतली जाणार नाही. गेली साडेचार वर्षे सरकारने फसवलेच आहे. आता पुन्हा ते होऊ देणार नाही. आजच्या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे; पण झाला नाही तर आंदोलन सुरूच राहणार आहे.- संदीप टिपुगडे, कोतवाल संघटना

टॅग्स :Strikeसंपkolhapurकोल्हापूरGovernmentसरकार