शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अक्षयतृतीयेचा मुहूर्त, बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट; कोल्हापुरात वर्षभरात किती प्रकरणे आली उघडकीस.. वाचा

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: April 30, 2025 13:05 IST

इंदुमती गणेश कोल्हापूर : वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेली अक्षयतृतीया अल्पवयीन मुलींच्या बालपणाच्या मुळावर उठण्याची भीती महिला बालविकास ...

इंदुमती गणेशकोल्हापूर : वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेली अक्षयतृतीया अल्पवयीन मुलींच्या बालपणाच्या मुळावर उठण्याची भीती महिला बालविकास विभागासह बालविवाहाविरोधात काम करणाऱ्या संस्थांना आहे. यादिवशी दुर्गम तसेच सीमावर्तीय भागात मोठ्या प्रमाणात बालविवाह होण्याची शक्यता असल्याने गाव व तालुका पातळीवर बालसंरक्षण समित्यांना अलर्ट राहण्याची सूचना देण्यात आली आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यात बालविवाहाची ३८ प्रकरणे समोर आली आहेत, त्यापैकी २८ विवाह रोखण्यात यश आले आहे.कोल्हापूरसारख्या पुरोगामी व समृद्ध जिल्ह्यातदेखील विशेषत: दुर्गम भागात व कर्नाटक सीमाभागाजवळील गावांमध्ये संख्या अधिक आहे. बालविवाह रोखण्यासाठी ग्राम बालसंरक्षण समिती, बालकल्याण समिती, चाइल्डलाइन तसेच तालुकास्तरावर व जिल्हास्तरावरदेखील विविध समित्या कार्यरत आहेत. मात्र, आपल्याच गावचे आहेत, नातेवाईक आहेत, वाकड्यात कोण शिरणार, या विचाराने अनेकजण गप्प बसतात. त्रयस्थांकडून माहिती मिळाली तर बालविवाह रोखता येतो; पण घरातल्या घरातच विवाह करून मोकळे झाले की काही कळत नाही.

अक्षयतृतीयेवर वॉचउन्हाळ्यात तसेच अक्षयतृतीयेसारख्या दिवशी वेगळा मुहूर्त पाहावा लागत नाही. त्यामुळेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत त्यांनी यंत्रणांना अलर्ट राहायला सांगितले आहे. तसेच ग्रामसेवक, पोलिस पाटील, स्वयंसेवकांच्या टीमला धाडी टाकण्यास सांगितल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे यांनी दिली.

२८ बालविवाह रोखण्यात यशजिल्ह्यातील ३८ प्रकरणांपैकी २८ प्रकरणांतील बालविवाह रोखण्यात जिमाबा, स्थानिक प्रशासन व स्वयंसेवी संस्थांना यश आले आहे. मात्र, १० प्रकरणांत बालविवाह झाले असून, संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे.

बालविवाहाचे सर्वाधिक प्रमाण असलेले जिल्हे

  • परभणी : ४८ टक्के
  • बीड : ४३.७ टक्के
  • धुळे : ४०.५ टक्के
  • सोलापूर : ४०.३ टक्के
  • हिंगोली : ३७.१ टक्के

(याशिवाय नंदुरबार, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे.)

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापुरात बालविवाहाचे प्रमाण कमी असले तरी कर्नाटक सीमेवर हे प्रमाण ३० ते ४० टक्के इतके आहे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सीमाभागात बालविवाहाची शक्यता असल्याने धर्मगुरूंच्या माध्यमातून बालविवाहाविरोधात जनजागृती सुरू आहे. - रविना माने, सामाजिक कार्यकर्त्या, जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAkshaya Tritiyaअक्षय्य तृतीयाmarriageलग्न