शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अक्षयतृतीयेचा मुहूर्त, बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट; कोल्हापुरात वर्षभरात किती प्रकरणे आली उघडकीस.. वाचा

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: April 30, 2025 13:05 IST

इंदुमती गणेश कोल्हापूर : वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेली अक्षयतृतीया अल्पवयीन मुलींच्या बालपणाच्या मुळावर उठण्याची भीती महिला बालविकास ...

इंदुमती गणेशकोल्हापूर : वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेली अक्षयतृतीया अल्पवयीन मुलींच्या बालपणाच्या मुळावर उठण्याची भीती महिला बालविकास विभागासह बालविवाहाविरोधात काम करणाऱ्या संस्थांना आहे. यादिवशी दुर्गम तसेच सीमावर्तीय भागात मोठ्या प्रमाणात बालविवाह होण्याची शक्यता असल्याने गाव व तालुका पातळीवर बालसंरक्षण समित्यांना अलर्ट राहण्याची सूचना देण्यात आली आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यात बालविवाहाची ३८ प्रकरणे समोर आली आहेत, त्यापैकी २८ विवाह रोखण्यात यश आले आहे.कोल्हापूरसारख्या पुरोगामी व समृद्ध जिल्ह्यातदेखील विशेषत: दुर्गम भागात व कर्नाटक सीमाभागाजवळील गावांमध्ये संख्या अधिक आहे. बालविवाह रोखण्यासाठी ग्राम बालसंरक्षण समिती, बालकल्याण समिती, चाइल्डलाइन तसेच तालुकास्तरावर व जिल्हास्तरावरदेखील विविध समित्या कार्यरत आहेत. मात्र, आपल्याच गावचे आहेत, नातेवाईक आहेत, वाकड्यात कोण शिरणार, या विचाराने अनेकजण गप्प बसतात. त्रयस्थांकडून माहिती मिळाली तर बालविवाह रोखता येतो; पण घरातल्या घरातच विवाह करून मोकळे झाले की काही कळत नाही.

अक्षयतृतीयेवर वॉचउन्हाळ्यात तसेच अक्षयतृतीयेसारख्या दिवशी वेगळा मुहूर्त पाहावा लागत नाही. त्यामुळेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत त्यांनी यंत्रणांना अलर्ट राहायला सांगितले आहे. तसेच ग्रामसेवक, पोलिस पाटील, स्वयंसेवकांच्या टीमला धाडी टाकण्यास सांगितल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे यांनी दिली.

२८ बालविवाह रोखण्यात यशजिल्ह्यातील ३८ प्रकरणांपैकी २८ प्रकरणांतील बालविवाह रोखण्यात जिमाबा, स्थानिक प्रशासन व स्वयंसेवी संस्थांना यश आले आहे. मात्र, १० प्रकरणांत बालविवाह झाले असून, संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे.

बालविवाहाचे सर्वाधिक प्रमाण असलेले जिल्हे

  • परभणी : ४८ टक्के
  • बीड : ४३.७ टक्के
  • धुळे : ४०.५ टक्के
  • सोलापूर : ४०.३ टक्के
  • हिंगोली : ३७.१ टक्के

(याशिवाय नंदुरबार, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे.)

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापुरात बालविवाहाचे प्रमाण कमी असले तरी कर्नाटक सीमेवर हे प्रमाण ३० ते ४० टक्के इतके आहे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सीमाभागात बालविवाहाची शक्यता असल्याने धर्मगुरूंच्या माध्यमातून बालविवाहाविरोधात जनजागृती सुरू आहे. - रविना माने, सामाजिक कार्यकर्त्या, जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAkshaya Tritiyaअक्षय्य तृतीयाmarriageलग्न