शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

Kolhapur: अपघात, आत्महत्या, पलायन थांबेना; गत तीन वर्षातील आकडे चिंताजनक

By उद्धव गोडसे | Updated: January 6, 2025 14:09 IST

मुली पळून जाण्याने उसवली कुटुंबांची वीण

उद्धव गोडसेकोल्हापूर : गेल्या आठ-दहा वर्षांपासून अपघाती मृत्यूंची संख्या सातत्याने वाढत आहे. यासोबतच आत्महत्या आणि अल्पवयीन मुली घर सोडून पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात १,२०७ अपघाती मृत्यू झाले. ७६७ मुली घर सोडून पळाल्या, तर ४ हजार ७६७ जणांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. या तिन्ही समस्या गंभीर बनत आहेत. त्यामुळे हे रोखण्याचे आव्हान समाजासह सर्वच शासकीय यंत्रणांसमोर निर्माण झाले आहे.

तीन वर्षांत १,२०७ अपघाती मृत्यूवाहतूक गतिमान आणि सुरक्षित व्हावी, यासाठी रस्ते प्रशस्त केले जात आहेत. मात्र, रस्ते कामातील त्रुटी आणि वाहनधारकांच्या बेशिस्तीमुळे सुरक्षेचा मुद्दा बाजूला पडल्याचे दिसत आहे. किरकोळ आणि गंभीर अशा सर्वच प्रकारच्या अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यातून दरवर्षी हजारो लोकांना अपंगत्व येते. तीन वर्षात १,२०७ जणांनी आपले प्राण गमावल्याने सबंधितांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले.विशेष म्हणजे अनेक वाहनधारक विमा संरक्षण घेत नाहीत. त्यामुळे अपघातानंतर मृतांच्या नातेवाइकांना योग्य नुकसानभरपाई मिळत नाही. जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांची परवड होते. हे टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थांनी ब्लॅक स्पॉट निश्चित करून त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. तसेच वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांची संख्या कमी होऊ शकते.आत्महत्येची समस्या गंभीरशालेय विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत विविध वयोगटातील व्यक्ती क्षुल्लक कारणातून आत्महत्या करीत जगणे संपवत आहेत. विशेष म्हणजे यात तरुणांची संख्या लक्षणीय असल्याने चिंता वाढली आहे. अपयश, बेरोजगारी, आर्थिक चणचण, वाढते मानसिक ताणतणाव, कौटुंबीक वादातून आत्महत्या होत आहेत. आजाराला कंटाळून आत्महत्या करण्याचेही प्रमाण वाढत आहे.ही समस्या अतिशय गंभीर असूनही काही अपवाद वगळता पोलिस दप्तरी याची नोंद आकस्मिक मृत्यू अशी होते. त्यामुळे आत्महत्यांची नेमकी आकडेवारी समोर येत नाही. गळफास, बुडून मयत, तणनाशक प्राशन केल्यानंतर होणारे मृत्यू, पेटवून घेतल्यानंतर होणाऱ्या मृत्यूंच्या नोंदी आत्महत्या म्हणूनच होणे आवश्यक आहे. गेल्या तीन वर्षात आकस्मिक मृत्यू आणि आत्महत्या करणाऱ्यांची संख्या ४ हजार ७६७ एवढी आहे.

७६७ अल्पवयीन मुली पळाल्यागेल्यी तीन वर्षात जिल्ह्यातून ७६७ अल्पवयीन मुली पळाल्या. यातील ७१५ मुली सापडल्या असून, ५२ मुलींचा शोध सुरूच आहे. सोशल मीडियाचा गैरवापर, शारीरिक आकर्षण, प्रेमाचे आमिष, कुटुंबातील हरवलेला संवाद आणि स्वातंत्र्याचा गैरफायदा घेण्याच्या वृत्तीमुळे अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे.ही समस्या संपूर्ण कुटुंबावर परिणाम करते. समाजातील बदनामीमुळे कुटुंबाला मानसिक धक्का बसतो. घरातील इतर मुलींचे लग्न होण्यास अडचणी येतात. मुलींचे शिक्षण अर्ध्यावर सुटते. कुटुंबात विसंवाद वाढतो. मुलगा आणि मुलीच्या कुटुंबात वाद होतात. या समस्येवर वेळीच उपाय करण्याची गरज आहे, अन्यथा याचे परिणाम आणखी गंभीर होण्याचा धोका आहे.हे आकडे चिंताजनक

प्रकार - २०२४ - २०२३ - २०२२ - एकूण

  • आत्महत्या - १,६१० - १,५१३ - १,६४४ - ४,७६७
  • अपघात - ३६३ - ४१२ - ४३२ - १,२०७
  • मुली पळून जाणे - २६७ - २४० - २६० - ७६७
टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस